शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

अमेरिकेने भारतीयांना विमानातून हातपाय बांधून का पाठवलं? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिलं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 15:37 IST

S. Jaishankar News: अमेरिकन प्रशासनाने या भारतीय नागरिकांची पाठवणी करताना त्यांना संपूर्ण प्रवासादरम्यान हातापायात बेड्या घालून दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणी आज संसदेत गदारोळ माजल्यानंतर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी उत्तर दिलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यापासून अमेरिकेने देशात बेकायदेशीररीत्या घुसखोरी करणाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, बेकायदेशीररीत्या अमेरिकेत घुसलेल्या भारतीय नागरिकांपैकी काही जणांना अमेरिकन प्रशासनाने काल एका विशेष लष्करी विमानातून भारतात परत पाठवले होते. मात्र अमेरिकन प्रशासनाने या भारतीय नागरिकांची पाठवणी करताना त्यांना संपूर्ण प्रवासादरम्यान हातापायात बेड्या घालून दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणी आज संसदेत गदारोळ माजल्यानंतर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी उत्तर दिलं आहे.

एस. जयशंकर राज्यसभेत या प्रकरणी उत्तर देताना म्हणाले की, आपले नागरिक जर परदेशात बेकायदेशीरपणे राहत असल्याचे दिसून आले तर त्यांना परत आपल्याकडे घेणं ही सर्व देशांची जबाबदारी आहे. अमेरिकेमध्ये अशा बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या लोकांना माघारी पाठवण्याची प्रक्रिया तेथील इमिग्रेशन आणि कस्टम्स एन्फोर्समेंट ऑथॉरिटी करते.

भारतीय नागरिकांना हातपाय बांधून पाठवण्यात आल्याने निर्माण झालेल्या वादावर बोलताना जयशंकर यांनी सांगितले की, २०१२ पासून लागू झालेल्या एका नियमानुसार जेव्हा लोकांना विमानातून माघारी पाठवण्यात येतं, तेव्हा त्यांना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बांधून ठेवण्यात येतं. दरम्यान, आयसीईने दिलेल्या माहितीनुसार याबाबतीत महिला आणि मुलांना सवलत देत या प्रक्रियेपासून दूर ठेवलं जातं. म्हणजेच त्यांना बांधून ठेवलं जात नाही. जयशंकर यांनी पुढे सांगितले की, यापुढे अमेरिकेतून परत पाठवल्या जाणाऱ्या नागरिकांसोबत कुठल्याही प्रकारचा दुर्व्यवहार होऊ नये, यासाठी आम्ही अमेरिकन सरकारसोबत सातत्याने चर्चा करत आहोत.

दरम्यान, आज अमेरिकेतून माघारी पाठवण्यात आलेल्या नागरिकांच्या मुद्द्यावरून राज्यसभेमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला. या गोंधळादरम्यानच सभापती जगदीप धनखड यांनी या प्रकरणी मंत्र्यांनी स्षटीकरण देणं आवश्यक असल्याचे सांगितले. त्यानंतर एक. जयशंकर यंनी सभागृहात या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. 

टॅग्स :IndiaभारतUnited StatesअमेरिकाS. Jaishankarएस. जयशंकरRajya Sabhaराज्यसभा