शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अमेरिकेने भारतीयांना विमानातून हातपाय बांधून का पाठवलं? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिलं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 15:37 IST

S. Jaishankar News: अमेरिकन प्रशासनाने या भारतीय नागरिकांची पाठवणी करताना त्यांना संपूर्ण प्रवासादरम्यान हातापायात बेड्या घालून दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणी आज संसदेत गदारोळ माजल्यानंतर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी उत्तर दिलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यापासून अमेरिकेने देशात बेकायदेशीररीत्या घुसखोरी करणाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, बेकायदेशीररीत्या अमेरिकेत घुसलेल्या भारतीय नागरिकांपैकी काही जणांना अमेरिकन प्रशासनाने काल एका विशेष लष्करी विमानातून भारतात परत पाठवले होते. मात्र अमेरिकन प्रशासनाने या भारतीय नागरिकांची पाठवणी करताना त्यांना संपूर्ण प्रवासादरम्यान हातापायात बेड्या घालून दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणी आज संसदेत गदारोळ माजल्यानंतर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी उत्तर दिलं आहे.

एस. जयशंकर राज्यसभेत या प्रकरणी उत्तर देताना म्हणाले की, आपले नागरिक जर परदेशात बेकायदेशीरपणे राहत असल्याचे दिसून आले तर त्यांना परत आपल्याकडे घेणं ही सर्व देशांची जबाबदारी आहे. अमेरिकेमध्ये अशा बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या लोकांना माघारी पाठवण्याची प्रक्रिया तेथील इमिग्रेशन आणि कस्टम्स एन्फोर्समेंट ऑथॉरिटी करते.

भारतीय नागरिकांना हातपाय बांधून पाठवण्यात आल्याने निर्माण झालेल्या वादावर बोलताना जयशंकर यांनी सांगितले की, २०१२ पासून लागू झालेल्या एका नियमानुसार जेव्हा लोकांना विमानातून माघारी पाठवण्यात येतं, तेव्हा त्यांना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बांधून ठेवण्यात येतं. दरम्यान, आयसीईने दिलेल्या माहितीनुसार याबाबतीत महिला आणि मुलांना सवलत देत या प्रक्रियेपासून दूर ठेवलं जातं. म्हणजेच त्यांना बांधून ठेवलं जात नाही. जयशंकर यांनी पुढे सांगितले की, यापुढे अमेरिकेतून परत पाठवल्या जाणाऱ्या नागरिकांसोबत कुठल्याही प्रकारचा दुर्व्यवहार होऊ नये, यासाठी आम्ही अमेरिकन सरकारसोबत सातत्याने चर्चा करत आहोत.

दरम्यान, आज अमेरिकेतून माघारी पाठवण्यात आलेल्या नागरिकांच्या मुद्द्यावरून राज्यसभेमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला. या गोंधळादरम्यानच सभापती जगदीप धनखड यांनी या प्रकरणी मंत्र्यांनी स्षटीकरण देणं आवश्यक असल्याचे सांगितले. त्यानंतर एक. जयशंकर यंनी सभागृहात या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. 

टॅग्स :IndiaभारतUnited StatesअमेरिकाS. Jaishankarएस. जयशंकरRajya Sabhaराज्यसभा