शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

नागरिकत्व कायद्यात मुस्लिम का नाहीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 06:31 IST

प. बंगाल भाजपचे उपाध्यक्ष चंद्र कुमार बोस यांचा प्रश्न : व्यवहार पारदर्शी असावा; भारताची तुलना इतर देशांशी नको

कोलकाता : नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्यामध्ये मुस्लिमांचा समावेश का केला गेला नाही, असा प्रश्न पश्चिम बंगाल भाजपचे उपाध्यक्ष चंद्र कुमार बोस यांनी सोमवारी विचारला. बोस हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतण्याचे नातू आहेत. चंद्र कुमार बोस यांनी टिष्ट्वटरवर म्हटले की, ‘नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा हा जर कोणत्याही धर्माशी संबंधित नाही तर आम्ही हिंदू, शीख, बौद्ध, ख्रिश्चन, पारसी आणि जैन यांचाच उल्लेख का करतो आहोत? मुस्लिमांचाही समावेश का केला गेलेला नाही? व्यवहार पारदर्शी असला पाहिजे.’ भारताची तुलना इतर देशांशी केली जायला नको, असे आवाहन बोस यांनी लोकांना केले आणि एक देश म्हणून सगळे धर्म आणि समाजांसाठी तो खुला असला पाहिजे, असे म्हटले.

भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी कोलकात्यात या कायद्याच्या समर्थनासाठी मेळावा घेतल्यानंतर बोस यांनी वरील भाष्य केले. बोस यांनी या मेळाव्याची प्रशंसा केली. ते म्हणाले, कोलकाताच्या लोकांनी त्याला उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला आणि या कायद्याचे फायदे काय आहेत हे लोकांना समजावून सांगण्यासाठी पक्षात बूथ पातळीवर दबावगट स्थापन केले गेले पाहिजेत.बोस म्हणाले की, ‘जर मुस्लिमांचा त्यांच्या देशात (होम कन्ट्री) छळ केला जात नसेल तर ते येणार नाहीत. त्यामुळे त्यांचा समावेश करण्यात काहीही नुकसान नाही. तथापि, हे काही संपूर्ण सत्य नाही. अफगाणिस्तान व पाकिस्तानात राहणाऱ्या बलूचबद्दल काय? पाकिस्तानात राहणाºया अहमदियांबद्दल काय? एका प्रश्नाच्या उत्तरात बोस म्हणाले की, छळ सिद्ध करून दाखवणे हे अशक्य आहे आणि ती गृहीत धरलेली कल्पना आहे. ते सगळ्यांसाठी खुले असले पाहिजे. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जी