शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागरिकत्व कायद्यात मुस्लिम का नाहीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 06:31 IST

प. बंगाल भाजपचे उपाध्यक्ष चंद्र कुमार बोस यांचा प्रश्न : व्यवहार पारदर्शी असावा; भारताची तुलना इतर देशांशी नको

कोलकाता : नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्यामध्ये मुस्लिमांचा समावेश का केला गेला नाही, असा प्रश्न पश्चिम बंगाल भाजपचे उपाध्यक्ष चंद्र कुमार बोस यांनी सोमवारी विचारला. बोस हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतण्याचे नातू आहेत. चंद्र कुमार बोस यांनी टिष्ट्वटरवर म्हटले की, ‘नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा हा जर कोणत्याही धर्माशी संबंधित नाही तर आम्ही हिंदू, शीख, बौद्ध, ख्रिश्चन, पारसी आणि जैन यांचाच उल्लेख का करतो आहोत? मुस्लिमांचाही समावेश का केला गेलेला नाही? व्यवहार पारदर्शी असला पाहिजे.’ भारताची तुलना इतर देशांशी केली जायला नको, असे आवाहन बोस यांनी लोकांना केले आणि एक देश म्हणून सगळे धर्म आणि समाजांसाठी तो खुला असला पाहिजे, असे म्हटले.

भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी कोलकात्यात या कायद्याच्या समर्थनासाठी मेळावा घेतल्यानंतर बोस यांनी वरील भाष्य केले. बोस यांनी या मेळाव्याची प्रशंसा केली. ते म्हणाले, कोलकाताच्या लोकांनी त्याला उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला आणि या कायद्याचे फायदे काय आहेत हे लोकांना समजावून सांगण्यासाठी पक्षात बूथ पातळीवर दबावगट स्थापन केले गेले पाहिजेत.बोस म्हणाले की, ‘जर मुस्लिमांचा त्यांच्या देशात (होम कन्ट्री) छळ केला जात नसेल तर ते येणार नाहीत. त्यामुळे त्यांचा समावेश करण्यात काहीही नुकसान नाही. तथापि, हे काही संपूर्ण सत्य नाही. अफगाणिस्तान व पाकिस्तानात राहणाऱ्या बलूचबद्दल काय? पाकिस्तानात राहणाºया अहमदियांबद्दल काय? एका प्रश्नाच्या उत्तरात बोस म्हणाले की, छळ सिद्ध करून दाखवणे हे अशक्य आहे आणि ती गृहीत धरलेली कल्पना आहे. ते सगळ्यांसाठी खुले असले पाहिजे. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जी