शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

Coronavirus : लोक मास्क लावण्यास का टाळाटाळ करतात? 'ही' आहेत तीन कारणं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 10:02 IST

Coronavirus : मास्क न लावण्याची तीन कारणे लोकांकडून सांगण्यात आली आहेत. ही कारणे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला एका सर्वेक्षणातून समोर आली आहेत.

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) तिसर्‍या लाटेची चर्चा आहे. 4 जुलैला कोरोनाची तिसऱ्या लाट ठोठावल्याचा दावा, गेल्या सोमवारी एका नामांकित भौतिकशास्त्रज्ञाने असा दावाही केला होता. दरम्यान, सरकारने याबाबत अद्याप कोणतीही औपचारिक घोषणा केलेली नाही. मात्र, सरकार सतत सांगत आहे की, लोकांनी अजूनही कोरोना अॅप्रोप्रिएट बिव्हेवियर ठेवावे. असे न केल्यास कोरोना विरोधातील लढ्यात आतापर्यंत मिळविलेले यश वाया जाईल. कोरोना पुन्हा रोखण्यासाठी, मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंगचे पालण करणे आणि सॅनिटायझेशन करणे आवश्यक आहे.

दरम्यान, सरकारकडून कोरोना नियमांचे पालन करण्यात सांगण्यात आले असले तरीही काही लोक याकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात. लोक मास्क लावण्यास टाळाटाळ करतात. विशेष म्हणजे, मास्क न लावण्याची तीन कारणे लोकांकडून सांगण्यात आली आहेत. ही कारणे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका सर्वेक्षणातून समोर आली आहेत.

'ही' आहेत कारणे...1) लोकांचे मास्क न लावण्याचे पहिले कारण श्वास घेण्यास त्रास होतो. सर्वेक्षणात सामील झालेल्या लोकांचे म्हणणे आहे की, मास्क लावण्यानंतर त्यांना श्वास घेण्यात त्रास होत आहे. त्यामुळे ते मास्क लावत नाहीत.2) लोकांचे मास्क न लावण्याचे दुसरे कारण अस्वस्थतेशी संबंधित आहे. मास्क लावल्यामुळे त्यांना 'अस्वस्थ' किंवा 'अनकम्‍फर्टेबल' वाटते. मास्क लावल्यानंतर आराम वाटत नाही.3) तिसरे कारण म्हणजे बऱ्याच लोकांनी मास्क वापरण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. कारण ते सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करतात. त्यामुळे त्यांना मास्क लावण्याची जास्त गरज वाटत नाही.

सरकारची चिंता वाढलीआरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा इशारा लोक गांभीर्याने घेत नाहीत. मंत्रालय वारंवार सांगत आहे की कोरोना प्रोटोकॉलचे पालन केले नाही तर तिसरी लाट येऊ शकते. कोरोनावरील निर्बंध कमी केल्यानंतर बाजारपेठ आणि हिलस्टेशन्सवरील लोकांची गर्दी पाहून सरकारची चिंता वाढली आहे. अशा ठिकाणी लोक सोशल डिस्टंसिंगचे पालन करत नाहीत किंवा मास्क लावत नाहीत. जर लोकांचे वागणे असेच राहिले तर निर्बंधामध्ये दिलेली शिथिलता मागे घेतली जाईल, असे सरकारने म्हटले आहे.

कांवड यात्रा रद्दकोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंड सरकारने कांवड यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. लाखोंच्या गर्दीत कोरोना प्रोटोकॉलचे अनुसरण करणे अशक्य आहे. कांवड यात्रा सुपरप्रेडर होऊ शकते अशी भीती आहे, असे येथील राज्य सरकारने म्हटले आहे. तर यूपी सरकारने अद्याप यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य