शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : लोक मास्क लावण्यास का टाळाटाळ करतात? 'ही' आहेत तीन कारणं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 10:02 IST

Coronavirus : मास्क न लावण्याची तीन कारणे लोकांकडून सांगण्यात आली आहेत. ही कारणे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला एका सर्वेक्षणातून समोर आली आहेत.

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) तिसर्‍या लाटेची चर्चा आहे. 4 जुलैला कोरोनाची तिसऱ्या लाट ठोठावल्याचा दावा, गेल्या सोमवारी एका नामांकित भौतिकशास्त्रज्ञाने असा दावाही केला होता. दरम्यान, सरकारने याबाबत अद्याप कोणतीही औपचारिक घोषणा केलेली नाही. मात्र, सरकार सतत सांगत आहे की, लोकांनी अजूनही कोरोना अॅप्रोप्रिएट बिव्हेवियर ठेवावे. असे न केल्यास कोरोना विरोधातील लढ्यात आतापर्यंत मिळविलेले यश वाया जाईल. कोरोना पुन्हा रोखण्यासाठी, मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंगचे पालण करणे आणि सॅनिटायझेशन करणे आवश्यक आहे.

दरम्यान, सरकारकडून कोरोना नियमांचे पालन करण्यात सांगण्यात आले असले तरीही काही लोक याकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात. लोक मास्क लावण्यास टाळाटाळ करतात. विशेष म्हणजे, मास्क न लावण्याची तीन कारणे लोकांकडून सांगण्यात आली आहेत. ही कारणे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका सर्वेक्षणातून समोर आली आहेत.

'ही' आहेत कारणे...1) लोकांचे मास्क न लावण्याचे पहिले कारण श्वास घेण्यास त्रास होतो. सर्वेक्षणात सामील झालेल्या लोकांचे म्हणणे आहे की, मास्क लावण्यानंतर त्यांना श्वास घेण्यात त्रास होत आहे. त्यामुळे ते मास्क लावत नाहीत.2) लोकांचे मास्क न लावण्याचे दुसरे कारण अस्वस्थतेशी संबंधित आहे. मास्क लावल्यामुळे त्यांना 'अस्वस्थ' किंवा 'अनकम्‍फर्टेबल' वाटते. मास्क लावल्यानंतर आराम वाटत नाही.3) तिसरे कारण म्हणजे बऱ्याच लोकांनी मास्क वापरण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. कारण ते सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करतात. त्यामुळे त्यांना मास्क लावण्याची जास्त गरज वाटत नाही.

सरकारची चिंता वाढलीआरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा इशारा लोक गांभीर्याने घेत नाहीत. मंत्रालय वारंवार सांगत आहे की कोरोना प्रोटोकॉलचे पालन केले नाही तर तिसरी लाट येऊ शकते. कोरोनावरील निर्बंध कमी केल्यानंतर बाजारपेठ आणि हिलस्टेशन्सवरील लोकांची गर्दी पाहून सरकारची चिंता वाढली आहे. अशा ठिकाणी लोक सोशल डिस्टंसिंगचे पालन करत नाहीत किंवा मास्क लावत नाहीत. जर लोकांचे वागणे असेच राहिले तर निर्बंधामध्ये दिलेली शिथिलता मागे घेतली जाईल, असे सरकारने म्हटले आहे.

कांवड यात्रा रद्दकोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंड सरकारने कांवड यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. लाखोंच्या गर्दीत कोरोना प्रोटोकॉलचे अनुसरण करणे अशक्य आहे. कांवड यात्रा सुपरप्रेडर होऊ शकते अशी भीती आहे, असे येथील राज्य सरकारने म्हटले आहे. तर यूपी सरकारने अद्याप यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य