शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

रिजिजू यांच्यानंतर पुढचा नंबर कुणाचा? मोठ्या फेरबदलाचे संकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 07:46 IST

पंतप्रधानांनी रिजिजू यांच्याकडून कायदा मंत्रालय हिसकावून मोठ्या फेरबदलाचे संकेत दिलेत. डझनभर मंत्री असे आहेत ज्यांच्या कामावर पंतप्रधान समाधानी नाहीत.

संजय शर्मा -

नवी दिल्ली : किरेन रिजिजू यांना कायदा मंत्रालयातून हटवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ फेरबदलाला सुरुवात केली आहे, लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल पाहायला मिळू शकतात. 

पंतप्रधानांनी रिजिजू यांच्याकडून कायदा मंत्रालय हिसकावून मोठ्या फेरबदलाचे संकेत दिलेत. डझनभर मंत्री असे आहेत ज्यांच्या कामावर पंतप्रधान समाधानी नाहीत. पीएमओ गेल्या दोन महिन्यांपासून मंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करत असून, मूल्यमापनाच्या आधारे फेरबदलाचा निर्णय घेतला जाणार आहे.मंत्रिमंडळातून कोणाकोणाला डच्चू मिळणार याची अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती; पण डच्चू मिळेल, हे कोणालाच माहीत नाही. याचे कारण म्हणजे राजकीय अपरिहार्यता. म्हणजे कामगिरी शून्य असली तरी राजकीय अपरिहार्यतेमुळे अनेक नेते मंत्रिपदी राहतील. रालोआला मजबूत करण्यासाठी काही मंत्रिपदे मित्रपक्षांनाही दिली जाणार आहेत. फेरबदलाबाबत मे च्या शेवटच्या आठवड्यात बैठक होणार आहे.

विरोधक म्हणतात...किरेन रिजिजू हे विधि खात्याचे अपयशी ठरलेले मंत्री होते, अशी टीका काँग्रेससहित अन्य विरोधी पक्षांनी केली आहे. काँग्रेसचे खासदार मणिकम टागोर यांनी सांगितले की, विधि खाते हाताळण्यात अपयशी ठरलेल्या रिजिजू यांना तेथून हटवून पृथ्वी विज्ञान खाते देण्यात आले आहे. या खात्यात ते काय करणार हा प्रश्नच आहे. कायद्यांमागील विज्ञान समजून घेणे अजिबात सोपे नाही. आता रिजिजू विज्ञानाच्या नियमांशी दोन हात करण्याचा प्रयत्न करतील असे सिब्बल यांनी  म्हटले आहे.महाराष्ट्राबाबतचा निकाल भोवला का? महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकताच जो निकाल दिला, त्यामुळे तर रिजिजू यांच्याकडून विधि खाते काढून घेतले नसेल ना, असा सवाल उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या व राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी उपस्थित केला आहे. अदानी प्रकरणाचा सेबीकडून सुरू असलेला तपास हेही रिजिजूंबाबतच्या निर्णयामागचे कारण असेल का, असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.  

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा