शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कायदे मागे घेतल्याने कुणाचे नुकसान?; आंदोलक शेतकऱ्यांचा सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2021 06:55 IST

जिंकूनच परत जाणार

शीलेश शर्मा नवी  दिल्ली :  ही  लढाई  आता  केवळ शेतकऱ्यांची राहिलेली नाही.  ही  लढाई  आता  श्रीमंत  आणि  गरीब यांच्यातील आहे,  असे  म्हणणे  आहे  मुरादाबादचे  शेतकरी धर्म  पाल  यांचे.  गत  २८  दिवसांपासून  ते  गाझीपूर सीमेवर आंदोलन  करत  आहेत.  नवे  कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आणण्यात  आले  आहेत,  असे  सरकार सांगत  आहे.  मात्र, कायदे मागे घेतल्याने कुणाचे नुकसान होणार  आहे  हे  सरकारने स्पष्ट करावे,  असे  शेतकऱ्यांचे  मत  आहे.

शेतकऱ्यांचे  असे  म्हणणे  आहे  की, आम्हाला फायदा  नको  आहे.  मग  सरकारकडून  ही  जबरदस्ती  का  केली  जात  आहे.  गाझीपूर सीमेवर केवळ उत्तर  प्रदेशातूनच  नव्हे तर, राजस्थान, महाराष्ट्र  आणि  कर्नाटक यासारख्या राज्यातून शेतकरी आलेले आहेत.  हे  तीन  कायदे मागे घेतल्याशिवाय येथून हटणार नाहीत,  असे  ते  सांगत आहेत. उत्तर प्रदेशातील शेतकरी गुरुदयाल  म्हणतात की, येथे भंडार भरलेले  आहे.  सरकार आम्हाला  कधीपर्यंत  बसून ठेवणार  आहे.  

फुटणार नाहीत,  तुटणार  नाहीत...

गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांसाठी तात्पुरते निवारे उभारण्यात  आले  आहेत.  या  तंबूंची  संख्या जवळपास  ५००  आहे.  प्रत्येक तंबूत  २०  ते  २५  शेतकऱ्यांना राहण्याची व्यवस्था  आहे.  महिलांसाठी चारही बाजूने  बंद  एक  मोठा  तंबू  उभारण्यात  आला  आहे.  यात  ५००  महिलांची व्यवस्था करण्यात  आली  आहे.  

कपडे धुण्यासाठी  वॉशिंग  मशिन  आहेत.  जीवनाश्यक  वस्तू मोफत दिल्या  जात  आहेत. येथे रक्तदान  शिबिरेही  होत  आहेत.  औषधांचे  काउंटर  आहे.  ॲम्बुलन्स  तयार आहेत. डॉक्टरही उपलब्ध आहेत.  शीख  समुदायाच्या महिला येथे येऊन भोजन बनविण्यात  मदत  करत  आहेत. सर्वांचा  एकच  सूर  आहे  की, येथून  जिंकूनच  परत  जाणार आहोत. अन्यथा, येथेच बसून राहणार आहोत. फुटणार नाहीत,  तुटणार  नाहीत.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी