शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

कायदे मागे घेतल्याने कुणाचे नुकसान?; आंदोलक शेतकऱ्यांचा सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2021 06:55 IST

जिंकूनच परत जाणार

शीलेश शर्मा नवी  दिल्ली :  ही  लढाई  आता  केवळ शेतकऱ्यांची राहिलेली नाही.  ही  लढाई  आता  श्रीमंत  आणि  गरीब यांच्यातील आहे,  असे  म्हणणे  आहे  मुरादाबादचे  शेतकरी धर्म  पाल  यांचे.  गत  २८  दिवसांपासून  ते  गाझीपूर सीमेवर आंदोलन  करत  आहेत.  नवे  कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आणण्यात  आले  आहेत,  असे  सरकार सांगत  आहे.  मात्र, कायदे मागे घेतल्याने कुणाचे नुकसान होणार  आहे  हे  सरकारने स्पष्ट करावे,  असे  शेतकऱ्यांचे  मत  आहे.

शेतकऱ्यांचे  असे  म्हणणे  आहे  की, आम्हाला फायदा  नको  आहे.  मग  सरकारकडून  ही  जबरदस्ती  का  केली  जात  आहे.  गाझीपूर सीमेवर केवळ उत्तर  प्रदेशातूनच  नव्हे तर, राजस्थान, महाराष्ट्र  आणि  कर्नाटक यासारख्या राज्यातून शेतकरी आलेले आहेत.  हे  तीन  कायदे मागे घेतल्याशिवाय येथून हटणार नाहीत,  असे  ते  सांगत आहेत. उत्तर प्रदेशातील शेतकरी गुरुदयाल  म्हणतात की, येथे भंडार भरलेले  आहे.  सरकार आम्हाला  कधीपर्यंत  बसून ठेवणार  आहे.  

फुटणार नाहीत,  तुटणार  नाहीत...

गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांसाठी तात्पुरते निवारे उभारण्यात  आले  आहेत.  या  तंबूंची  संख्या जवळपास  ५००  आहे.  प्रत्येक तंबूत  २०  ते  २५  शेतकऱ्यांना राहण्याची व्यवस्था  आहे.  महिलांसाठी चारही बाजूने  बंद  एक  मोठा  तंबू  उभारण्यात  आला  आहे.  यात  ५००  महिलांची व्यवस्था करण्यात  आली  आहे.  

कपडे धुण्यासाठी  वॉशिंग  मशिन  आहेत.  जीवनाश्यक  वस्तू मोफत दिल्या  जात  आहेत. येथे रक्तदान  शिबिरेही  होत  आहेत.  औषधांचे  काउंटर  आहे.  ॲम्बुलन्स  तयार आहेत. डॉक्टरही उपलब्ध आहेत.  शीख  समुदायाच्या महिला येथे येऊन भोजन बनविण्यात  मदत  करत  आहेत. सर्वांचा  एकच  सूर  आहे  की, येथून  जिंकूनच  परत  जाणार आहोत. अन्यथा, येथेच बसून राहणार आहोत. फुटणार नाहीत,  तुटणार  नाहीत.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी