शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

कायदे मागे घेतल्याने कुणाचे नुकसान?; आंदोलक शेतकऱ्यांचा सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2021 06:55 IST

जिंकूनच परत जाणार

शीलेश शर्मा नवी  दिल्ली :  ही  लढाई  आता  केवळ शेतकऱ्यांची राहिलेली नाही.  ही  लढाई  आता  श्रीमंत  आणि  गरीब यांच्यातील आहे,  असे  म्हणणे  आहे  मुरादाबादचे  शेतकरी धर्म  पाल  यांचे.  गत  २८  दिवसांपासून  ते  गाझीपूर सीमेवर आंदोलन  करत  आहेत.  नवे  कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आणण्यात  आले  आहेत,  असे  सरकार सांगत  आहे.  मात्र, कायदे मागे घेतल्याने कुणाचे नुकसान होणार  आहे  हे  सरकारने स्पष्ट करावे,  असे  शेतकऱ्यांचे  मत  आहे.

शेतकऱ्यांचे  असे  म्हणणे  आहे  की, आम्हाला फायदा  नको  आहे.  मग  सरकारकडून  ही  जबरदस्ती  का  केली  जात  आहे.  गाझीपूर सीमेवर केवळ उत्तर  प्रदेशातूनच  नव्हे तर, राजस्थान, महाराष्ट्र  आणि  कर्नाटक यासारख्या राज्यातून शेतकरी आलेले आहेत.  हे  तीन  कायदे मागे घेतल्याशिवाय येथून हटणार नाहीत,  असे  ते  सांगत आहेत. उत्तर प्रदेशातील शेतकरी गुरुदयाल  म्हणतात की, येथे भंडार भरलेले  आहे.  सरकार आम्हाला  कधीपर्यंत  बसून ठेवणार  आहे.  

फुटणार नाहीत,  तुटणार  नाहीत...

गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांसाठी तात्पुरते निवारे उभारण्यात  आले  आहेत.  या  तंबूंची  संख्या जवळपास  ५००  आहे.  प्रत्येक तंबूत  २०  ते  २५  शेतकऱ्यांना राहण्याची व्यवस्था  आहे.  महिलांसाठी चारही बाजूने  बंद  एक  मोठा  तंबू  उभारण्यात  आला  आहे.  यात  ५००  महिलांची व्यवस्था करण्यात  आली  आहे.  

कपडे धुण्यासाठी  वॉशिंग  मशिन  आहेत.  जीवनाश्यक  वस्तू मोफत दिल्या  जात  आहेत. येथे रक्तदान  शिबिरेही  होत  आहेत.  औषधांचे  काउंटर  आहे.  ॲम्बुलन्स  तयार आहेत. डॉक्टरही उपलब्ध आहेत.  शीख  समुदायाच्या महिला येथे येऊन भोजन बनविण्यात  मदत  करत  आहेत. सर्वांचा  एकच  सूर  आहे  की, येथून  जिंकूनच  परत  जाणार आहोत. अन्यथा, येथेच बसून राहणार आहोत. फुटणार नाहीत,  तुटणार  नाहीत.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी