शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

दिल्लीत कुणाचे सरकार? ५ फेब्रुवारीला विधानसभेसाठी मतदान, फैसला ८ तारखेला होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 06:01 IST

२०१५ आणि २०२२ च्या तुलनेत यावेळी आठवडाभर आधीच निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. निकालही आठवडाभर आधीच लागतील.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून मतमोजणी ८ फेब्रुवारीला होईल. ही घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी मंगळवारी केली. ३३ दिवस ही प्रक्रिया चालेल. २०१५ आणि २०२२ च्या तुलनेत यावेळी आठवडाभर आधीच निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. निकालही आठवडाभर आधीच लागतील.

राजीवकुमार म्हणाले की, जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे यासाठी मतदान बुधवारी ठेवले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा अनुभव लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. 

‘४.५ कोटी व्हीव्हीपॅट स्लिप मोजल्या; एकाही मताची तफावत नाही’

ईव्हीएम तसेच व्हीव्हीपॅट स्लिप्स यांच्या मोजणीत एकाही मताची तफावत आढळलेली नाही, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी सांगितले. निवडणूक प्रक्रिया विश्वासार्ह आहे, असे ते म्हणाले. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून पाच व्हीव्हीपॅटमधील स्लिपची मोजणी करावी, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने २०१९मध्ये दिला होता. त्यानंतर ६७ हजारहून अधिक व्हीव्हीपॅट चाचण्या झाल्या. त्यात ४.५ कोटी व्हीव्हीपॅट स्लिप मोजल्या गेल्या; पण, एकाही मताची तफावत आढळली नाही, असा दावा त्यांनी केला. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांनंतर ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या विश्वासार्हतेवर विरोधकांनी बोट ठेवले. ईव्हीएममध्ये फेरफार करण्यात आल्याची शंकाही उपस्थित झाली. हे आरोप फेटाळताना ते म्हणाले की, जुन्या व्हीव्हीपॅट मशीनमध्ये तांत्रिक बिघाड वा मॉक पोलची माहिती न हटविल्यामुळे किरकोळ त्रुटी येऊ शकतात. त्या लगेच दूर करण्यात येतात.

नेत्यांच्या हेलिकॉप्टर तपासणीबद्दल...

महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये नेत्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी झाल्यामुळे त्याबद्दल सवाल विचारण्यात आले होते. तसेच मतदान अधिकाऱ्यांना धमक्या देण्याचे प्रकार घडले होते. स्टार प्रचारक व राजकीय नेत्यांनी आचारसंहिता पाळणे हे त्यांचे कर्तव्य आहे. तसे न झाल्यास आयोग कडक कारवाई करेल, असा इशारा राजीवकुमार यांनी दिला.

ईव्हीएमविरोधात नेते उच्च न्यायालयात 

ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित करत, तसेच मतदार यादीत फेरफार झाल्याचा आरोप करत मविआ उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अनेक पराभूत उमेदवारांनी व्यक्तिगत याचिका दाखल केल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयात ३८, औरंगाबाद खंडपीठात १७ तर नागपूर खंडपीठात १२ याचिका आत्तापर्यंत दाखल करण्यात आल्या असून आणखी याचिका दाखल होणार असल्याची शक्यता आहे.

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVotingमतदानdelhiदिल्ली