शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

अब की बार सामान्यांच्या खिशावर भार! घाऊक महागाईचा दर 10 टक्क्यांच्या पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 17:48 IST

Wholesale Price Based Inflation At 10.49% in April : घाऊक बाजारात महागाई दर पाहता चिंता वाढली आहेत. मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यातील महागाई दर वाढला आहे.

नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या, ऑक्सिजनचा मोठा तुटवडा, बेड्सची कमतरता अशा अनेक समस्यांचा लोकांना सामना करावा लागत आहे. याच दरम्यान सर्वसामान्यांच्या खिशाला आता आणखी कात्री लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. हातवरचं पोट असणाऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. अशातच सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे. 

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाकडून घाऊक महागाईच्या दराची आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. घाऊक बाजारात महागाई दर पाहता चिंता वाढली आहेत. मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यातील महागाई दर वाढला आहे. मार्च महिन्यात महागाई दर हा 7.39 टक्के इतका होता. तर एप्रिलमध्ये या दराने रेकॉर्ड मोडला आहे. महागाई दर तब्बल 10.49 टक्क्यांवर पोहोचला आहे. महागाई दरात एका महिन्यात जवळपास 3.1 टक्क्यांची वाढ झाली आहे. कच्चं तेल आणि पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती वाढल्याने हा महागाई दर वाढल्याचं सांगण्यात येत आहे. 

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या महिन्यांची आकडेवारी दिली आहे. फेब्रुवारीत महागाई दर 4.83 टक्के इतका होता. त्यानंतर मार्च महिन्यात महागाई दर  2.56 टक्क्यांनी वाढला आणि 7.39 टक्क्यांवर पोहोचला. तर मार्च महिन्याच्या तुलनेत महागाई दर 3.1 टक्क्यांनी वाढला असून तो आता 10.49 टक्क्यांवर पोहोचला आहे. डाळी, फळं, अंडी-मांस, पेट्रोल आणि एलपीजी यांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. तर गहू, तांदूळ, भाज्या, कांदे-बटाटे यांच्या किंमतीत घट झाल्याचं दिसून आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :InflationमहागाईIndiaभारत