शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

कोण कापतंय महिलांची वेणी? जाणून घ्या 'चोटी गँग'च्या 5 रहस्यमय गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 15:05 IST

राजस्थान, हरियाणा आणि दिल्ली येथे महिलांना बेशुद्ध करुन रहस्यमयरित्या त्यांची वेणी कापली जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यातील रहस्यमय बाब अशी आहे की बहुतांश महिलांनी असेच सांगितले आहे की त्यांना बेशुद्ध करुन वेणी कापली जात आहे.  

नवी दिल्ली, दि. 3 - राजस्थान, हरियाणा आणि दिल्ली येथे महिलांना बेशुद्ध करुन रहस्यमयरित्या त्यांची वेणी कापली जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यातील रहस्यमय बाब अशी आहे की बहुतांश महिलांनी असेच सांगितले आहे की त्यांना बेशुद्ध करुन वेणी कापली जात आहे.  वेणी कापणारी व्यक्ती कोण आहे? कशी दिसते? याबाबतची माहिती अद्याप कुणालाही समजू शकलेले नाही. या घटनेमुळे पोलीसदेखील चक्रावले आहेत. प्रकरणाचा छडा लावण्यात   त्यांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे हे प्रकरण त्यांच्यासमोरील एक आव्हान बनले आहे. दरम्यान, आतापर्यंत या घटनेतील 50 प्रकरणं समोर आली आहेत. 

चोटी गँगच्या 5 रहस्यमय गोष्टी  1. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वात आधी राजस्थानमधील गावांमध्ये महिलांची वेणी कापली जात असल्याच्या घटना समोर येऊ लागल्या. यानंतर हरियाणातील झज्जर, मेवात, रोहतक अन्य जिल्ह्यांतील गावांमध्ये महिलांची वेणी कापली जाऊ लागली. हळू-हळू ही घटना गुरुग्राम आणि दिल्लीतील गावांमध्ये घडू लागल्या. 

2. या प्रकरणाचा तपास करणा-या पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळी कोणताही पुरावा मिळत नाही. महिलांच्या मेडिकल टेस्टमध्येही कोणतीही असामान्य अशा गोष्टीही आढळून आलेल्या नाहीत. शिवाय, महिलांसोबत असणा-या किंवा राहणा-या एकाही व्यक्तीनं  वेणी कापणा-या व्यक्तीला पाहिलेले नाही. 

 3. सर्व जण आपापल्या म्हणण्यानुसार या घटनेमागे वेगवेगळे अंदाज लावत आहेत. कुणी म्हणत आहे की यामागे एखाद्या टोळीचा हात असेल तर तांत्रिक-मांत्रिकाचाही हात असल्याचे काहींचं म्हणणे आहे. 

4. दरम्यान, वेणी कापण्याच्या घटनेमागे नेमके कोण आहे? याची ठोस माहिती किंवा एखादा पुरावा अद्यापपर्यंत मिळालेला नाही. मात्र यावरुन लोकांमध्ये अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे. 

5. आतापर्यंत या घटनेतील 50 प्रकरणे समोर आली आहेत. ताजं उदाहरण द्यायचे झाले तर रविवारी ( 30 जुलै ) दिल्लीतील कगनहेरी गावातील विमलेश आणि मनोज यांच्या आईंची वेणी कापण्यात आली. विमलेशनं सांगितले की, रविवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास आईचे डोके अचानक दुखू लागले, यामुळे ती झोपून गेली.  तिला जाग आल्यानंतर तिनं पाहिलं की कुणी तरी तिची वेणी कापली आहे.  अशाच पद्धतीने मनोजच्या आईचीही वेणी दोनदा कापण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण गावात दहशत पसरली आहे.  

धक्कादायक ! वेणी कापणारी चेटकीण समजून झालेल्या मारहाणीत वृद्धेचा मृत्यू

दरम्यान,  उत्तर प्रदेशातही अशा प्रकारची घटना घडल्याचे वृत्त समोर आले आहे. मात्र या घटनेची माहिती मिळताच काही जणांनी एका वृद्ध महिलेला वेणी कापणारी चेटकीण समजून तिला जबर मारहाण केली. या वृद्ध महिलेला एवढी मारहाण करण्यात आली की तिचा यात मृत्यू झाला.  आग्रामधील फतेहबाद येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. 

फतेहबादमधील मगटई गावात रात्री उशीरा एका महिलेची वेणी कापली गेली होती. सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर एका वृद्ध महिलेला फिरताना पाहून स्थानिकांनी तिच्यावर संशय घेतला. या महिलेला अमानुष मारहाण करण्यात आली. जखमी अवस्थेत महिलेला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तोपर्यत तिचा मृत्यू झाला होता.  

मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचं नाव माना देवी असे होते. त्या शौचास गेलेल्या त्या रात्रीच्या अंधारात रस्ता भरकटल्या व दुस-या वस्तीत पोहोचल्या. यावेळी एका तरुणीने त्यांना पाहताच आरडाओरड सुरू केला. आरडाओरड ऐकून गावकरी जमा झाले आणि चेटकीण असल्याचं समजून मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेनंतर महिलेच्या कुटुंबीयांनी मृतदेह पोलीस ठाण्यात नेला आणि न्यायाची मागणी केली. आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी कुटुंबीय करत आहेत. पोलीस या घटनेचा तपास करत असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.  

काय आहे नेमकं प्रकरण?देशातील चार राज्यांमध्ये महिलांची वेणी कापणाऱ्या मांजरीची दहशत पसरली आहे. उत्तरप्रदेश आणि राजस्थानमध्ये महिलांनी अनोखळी व्यक्तीकडून त्यांचे केस कापण्यात येत आहेत असा दावा केला आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणामध्ये 17 अशा घटना घडल्याचे समोर आले आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये 5 आणि दिल्लीमध्ये 3 घटना घडल्या आहेत. महिलांचे केस कापल्याच्या या घटनांचा छडा लावण्यास पोलीस आणि प्रशासनला अद्याप यश आले नाही. 

घराबाहेर लटकवले लिंबू, कांदे आणि नीम काही ठिकाणी या घटनेला अंधश्रद्धेचे स्वरुप प्राप्त झाले आहे. खासकरुन छोट्या गावांमध्ये हा प्रकार भानामतीचा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येथील लोकांनी आपल्या घराबाहेर लिंबू, कांदे आणि नीम यांसारख्या वस्तू लटकवल्या आहेत. उत्तरप्रदेशातील मथुरामध्ये नगला शीशराम गावातील लोकांनी घराच्या दरवाज्यावर कांदे लावले आहेत. 

महिलांनी वेणी बांधणंच दिले सोडून केस कापण्याच्या अशा घटनांमुळे काही भागातल्या महिलांनी वेणी बांधणंच सोडून दिल्याचे सांगण्याच येते. इतकंच नाही, तर दिवस मावळल्यानंतर महिला घरातून बाहेर पडत नाहीत.