शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
3
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
4
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
5
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
6
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
7
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
8
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
9
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
10
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
11
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
12
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
13
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
14
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
15
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
16
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
17
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
18
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
19
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
20
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम

कोण कापतंय महिलांची वेणी? जाणून घ्या 'चोटी गँग'च्या 5 रहस्यमय गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 15:05 IST

राजस्थान, हरियाणा आणि दिल्ली येथे महिलांना बेशुद्ध करुन रहस्यमयरित्या त्यांची वेणी कापली जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यातील रहस्यमय बाब अशी आहे की बहुतांश महिलांनी असेच सांगितले आहे की त्यांना बेशुद्ध करुन वेणी कापली जात आहे.  

नवी दिल्ली, दि. 3 - राजस्थान, हरियाणा आणि दिल्ली येथे महिलांना बेशुद्ध करुन रहस्यमयरित्या त्यांची वेणी कापली जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यातील रहस्यमय बाब अशी आहे की बहुतांश महिलांनी असेच सांगितले आहे की त्यांना बेशुद्ध करुन वेणी कापली जात आहे.  वेणी कापणारी व्यक्ती कोण आहे? कशी दिसते? याबाबतची माहिती अद्याप कुणालाही समजू शकलेले नाही. या घटनेमुळे पोलीसदेखील चक्रावले आहेत. प्रकरणाचा छडा लावण्यात   त्यांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे हे प्रकरण त्यांच्यासमोरील एक आव्हान बनले आहे. दरम्यान, आतापर्यंत या घटनेतील 50 प्रकरणं समोर आली आहेत. 

चोटी गँगच्या 5 रहस्यमय गोष्टी  1. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वात आधी राजस्थानमधील गावांमध्ये महिलांची वेणी कापली जात असल्याच्या घटना समोर येऊ लागल्या. यानंतर हरियाणातील झज्जर, मेवात, रोहतक अन्य जिल्ह्यांतील गावांमध्ये महिलांची वेणी कापली जाऊ लागली. हळू-हळू ही घटना गुरुग्राम आणि दिल्लीतील गावांमध्ये घडू लागल्या. 

2. या प्रकरणाचा तपास करणा-या पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळी कोणताही पुरावा मिळत नाही. महिलांच्या मेडिकल टेस्टमध्येही कोणतीही असामान्य अशा गोष्टीही आढळून आलेल्या नाहीत. शिवाय, महिलांसोबत असणा-या किंवा राहणा-या एकाही व्यक्तीनं  वेणी कापणा-या व्यक्तीला पाहिलेले नाही. 

 3. सर्व जण आपापल्या म्हणण्यानुसार या घटनेमागे वेगवेगळे अंदाज लावत आहेत. कुणी म्हणत आहे की यामागे एखाद्या टोळीचा हात असेल तर तांत्रिक-मांत्रिकाचाही हात असल्याचे काहींचं म्हणणे आहे. 

4. दरम्यान, वेणी कापण्याच्या घटनेमागे नेमके कोण आहे? याची ठोस माहिती किंवा एखादा पुरावा अद्यापपर्यंत मिळालेला नाही. मात्र यावरुन लोकांमध्ये अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे. 

5. आतापर्यंत या घटनेतील 50 प्रकरणे समोर आली आहेत. ताजं उदाहरण द्यायचे झाले तर रविवारी ( 30 जुलै ) दिल्लीतील कगनहेरी गावातील विमलेश आणि मनोज यांच्या आईंची वेणी कापण्यात आली. विमलेशनं सांगितले की, रविवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास आईचे डोके अचानक दुखू लागले, यामुळे ती झोपून गेली.  तिला जाग आल्यानंतर तिनं पाहिलं की कुणी तरी तिची वेणी कापली आहे.  अशाच पद्धतीने मनोजच्या आईचीही वेणी दोनदा कापण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण गावात दहशत पसरली आहे.  

धक्कादायक ! वेणी कापणारी चेटकीण समजून झालेल्या मारहाणीत वृद्धेचा मृत्यू

दरम्यान,  उत्तर प्रदेशातही अशा प्रकारची घटना घडल्याचे वृत्त समोर आले आहे. मात्र या घटनेची माहिती मिळताच काही जणांनी एका वृद्ध महिलेला वेणी कापणारी चेटकीण समजून तिला जबर मारहाण केली. या वृद्ध महिलेला एवढी मारहाण करण्यात आली की तिचा यात मृत्यू झाला.  आग्रामधील फतेहबाद येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. 

फतेहबादमधील मगटई गावात रात्री उशीरा एका महिलेची वेणी कापली गेली होती. सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर एका वृद्ध महिलेला फिरताना पाहून स्थानिकांनी तिच्यावर संशय घेतला. या महिलेला अमानुष मारहाण करण्यात आली. जखमी अवस्थेत महिलेला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तोपर्यत तिचा मृत्यू झाला होता.  

मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचं नाव माना देवी असे होते. त्या शौचास गेलेल्या त्या रात्रीच्या अंधारात रस्ता भरकटल्या व दुस-या वस्तीत पोहोचल्या. यावेळी एका तरुणीने त्यांना पाहताच आरडाओरड सुरू केला. आरडाओरड ऐकून गावकरी जमा झाले आणि चेटकीण असल्याचं समजून मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेनंतर महिलेच्या कुटुंबीयांनी मृतदेह पोलीस ठाण्यात नेला आणि न्यायाची मागणी केली. आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी कुटुंबीय करत आहेत. पोलीस या घटनेचा तपास करत असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.  

काय आहे नेमकं प्रकरण?देशातील चार राज्यांमध्ये महिलांची वेणी कापणाऱ्या मांजरीची दहशत पसरली आहे. उत्तरप्रदेश आणि राजस्थानमध्ये महिलांनी अनोखळी व्यक्तीकडून त्यांचे केस कापण्यात येत आहेत असा दावा केला आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणामध्ये 17 अशा घटना घडल्याचे समोर आले आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये 5 आणि दिल्लीमध्ये 3 घटना घडल्या आहेत. महिलांचे केस कापल्याच्या या घटनांचा छडा लावण्यास पोलीस आणि प्रशासनला अद्याप यश आले नाही. 

घराबाहेर लटकवले लिंबू, कांदे आणि नीम काही ठिकाणी या घटनेला अंधश्रद्धेचे स्वरुप प्राप्त झाले आहे. खासकरुन छोट्या गावांमध्ये हा प्रकार भानामतीचा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येथील लोकांनी आपल्या घराबाहेर लिंबू, कांदे आणि नीम यांसारख्या वस्तू लटकवल्या आहेत. उत्तरप्रदेशातील मथुरामध्ये नगला शीशराम गावातील लोकांनी घराच्या दरवाज्यावर कांदे लावले आहेत. 

महिलांनी वेणी बांधणंच दिले सोडून केस कापण्याच्या अशा घटनांमुळे काही भागातल्या महिलांनी वेणी बांधणंच सोडून दिल्याचे सांगण्याच येते. इतकंच नाही, तर दिवस मावळल्यानंतर महिला घरातून बाहेर पडत नाहीत.