शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 12:05 IST

जगदीप धनखड यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्यास अद्याप जवळपास २ वर्षे शिल्लक असतानाच राजीनामा दिला आहे. आपला कार्यकाळ पूर्ण न करणारे ते देशाचे सहावे उपराष्ट्रपती बनले आहेत. मात्र, आता त्यांच्या राजीनाम्यानंतर, 19 सप्टेंबरपूर्वी नव्या उपराष्ट्रपतींची निवड करणे आवश्यक आहे.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी अचानक आपल्या पदाचा राजीनामा देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिला आहे. मात्र यावरून, राजकीय वर्तुळात विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. धडखड यांनी आपला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवला. महत्वाचे म्हणजे, जगदीप धनखड यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्यास अद्याप जवळपास २ वर्षे शिल्लक असतानाच राजीनामा दिला आहे. आपला कार्यकाळ पूर्ण न करणारे ते देशाचे सहावे उपराष्ट्रपती बनले आहेत. मात्र, आता त्यांच्या राजीनाम्यानंतर, 19 सप्टेंबरपूर्वी नव्या उपराष्ट्रपतींची निवड करणे आवश्यक आहे.

धनखड यांच्यानंतर कोण सांभाळणार कामकाज? -जेव्हा उपराष्ट्रपती पद रिक्त असते तेव्हा राज्यसभेच्या अध्यक्षांचे काम थांबत नाही. संविधानाच्या कलम ९१ नुसार, राज्यसभेच्या उपाध्यक्षांना तात्पुरत्या स्वरुपात अध्यक्षांचे काम पाहण्याचा अधिकार आहे. अर्थात कोणत्याही कारणास्तव उपराष्ट्रपती पद रिक्त झाले तर राज्यसभेचे उपाध्यक्ष अध्यक्षांच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडू शकतात. संविधान त्यांना हा अधिकार देते.

19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणे का आवश्यक? - उपराष्ट्रपती धनखड यांचा राजीनामा म्हणजे आता नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणार. संविधानाचे कलम ६३ ते ७१ आणि उपराष्ट्रपती (निवडणूक) नियम १९७४ मध्ये उपराष्ट्रपतींच्या निवडीची प्रक्रिया सांगण्यात आली आहे. यानुसार, धनखड यांनी राजीनामा दिल्यापासून ६० दिवसांच्या आत अर्थात १९ सप्टेंबर २०२५ पूर्वी ही निवडणूक होणे आवश्यक आहे. याचाच अर्थ असा की, उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक लवकरच होऊ शकते. संसदेच्या दोन्ही सभागृहांतील सर्व सदस्य मिळून उपराष्ट्रपतीची निवड करतात. 

टॅग्स :jagdeep dhankharजगदीप धनखडRajya Sabhaराज्यसभा