शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
2
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
3
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
4
जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल?
5
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!
6
Upcoming IPO: २१ वर्ष जुनी कंपनी IPO आणण्याच्या तयारीत, ८०० कोटी रुपये उभे करण्याची योजना
7
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
8
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
9
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
10
स्पाय कॅमेरा, ७४ तरुणींचे व्हिडिओ, खाजगी एअरलाइन्समधील पायलटचं धक्कादायक कृत्य, असं फुटलं बिंग   
11
बदला घेण्यासाठी बिहारी व्यक्तीनं रचला कांड; ऐन गणेशोत्सवात मुंबईत पसरवली दहशत, पोलिसांची झोप उडवली
12
तिला फोटोशूटसाठी भारतात पाठवण्यास राजी नाही पाकिस्तान; वर्ल्ड कप आधी घेतला मोठा निर्णय
13
“त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले”; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा निर्णय ! टॅरिफ पद्धतीत बदल, 'या' वस्तूंवर दिली सूट
15
किम जोंग उनला लादेनप्रमाणेच मारण्याची तयारी, सैनिकही पाठवले, पण एक चूक झाली आणि फसला अमेरिकेचा प्लॅन 
16
Mumbai: विद्यार्थी एक दिवस शिक्षकांच्या भूमिकेत; वर्गांवर घेतला तास!
17
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
18
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
19
UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
20
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक

धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 12:05 IST

जगदीप धनखड यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्यास अद्याप जवळपास २ वर्षे शिल्लक असतानाच राजीनामा दिला आहे. आपला कार्यकाळ पूर्ण न करणारे ते देशाचे सहावे उपराष्ट्रपती बनले आहेत. मात्र, आता त्यांच्या राजीनाम्यानंतर, 19 सप्टेंबरपूर्वी नव्या उपराष्ट्रपतींची निवड करणे आवश्यक आहे.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी अचानक आपल्या पदाचा राजीनामा देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिला आहे. मात्र यावरून, राजकीय वर्तुळात विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. धडखड यांनी आपला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवला. महत्वाचे म्हणजे, जगदीप धनखड यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्यास अद्याप जवळपास २ वर्षे शिल्लक असतानाच राजीनामा दिला आहे. आपला कार्यकाळ पूर्ण न करणारे ते देशाचे सहावे उपराष्ट्रपती बनले आहेत. मात्र, आता त्यांच्या राजीनाम्यानंतर, 19 सप्टेंबरपूर्वी नव्या उपराष्ट्रपतींची निवड करणे आवश्यक आहे.

धनखड यांच्यानंतर कोण सांभाळणार कामकाज? -जेव्हा उपराष्ट्रपती पद रिक्त असते तेव्हा राज्यसभेच्या अध्यक्षांचे काम थांबत नाही. संविधानाच्या कलम ९१ नुसार, राज्यसभेच्या उपाध्यक्षांना तात्पुरत्या स्वरुपात अध्यक्षांचे काम पाहण्याचा अधिकार आहे. अर्थात कोणत्याही कारणास्तव उपराष्ट्रपती पद रिक्त झाले तर राज्यसभेचे उपाध्यक्ष अध्यक्षांच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडू शकतात. संविधान त्यांना हा अधिकार देते.

19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणे का आवश्यक? - उपराष्ट्रपती धनखड यांचा राजीनामा म्हणजे आता नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणार. संविधानाचे कलम ६३ ते ७१ आणि उपराष्ट्रपती (निवडणूक) नियम १९७४ मध्ये उपराष्ट्रपतींच्या निवडीची प्रक्रिया सांगण्यात आली आहे. यानुसार, धनखड यांनी राजीनामा दिल्यापासून ६० दिवसांच्या आत अर्थात १९ सप्टेंबर २०२५ पूर्वी ही निवडणूक होणे आवश्यक आहे. याचाच अर्थ असा की, उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक लवकरच होऊ शकते. संसदेच्या दोन्ही सभागृहांतील सर्व सदस्य मिळून उपराष्ट्रपतीची निवड करतात. 

टॅग्स :jagdeep dhankharजगदीप धनखडRajya Sabhaराज्यसभा