शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

प्राणप्रतिष्ठेला काँग्रेसमधून नेमके कोण जाणार? अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 06:15 IST

त्यामुळे राम मंदिराचे श्रेय काँग्रेसने घ्यावे, असे काँग्रेसमधील अनेकांना वाटते.

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली ( Marathi News ): अयोध्येत राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा समारंभात उपस्थित राहण्याबाबत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि  प्रियांका गांधी यांनी अद्याप कुठलीही माहिती दिलेली नाही. 

राममंदिर न्यास आणि विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते. त्यानंतर पक्षाने एक निवेदन जारी केले की, एक शिष्टमंडळ अयोध्येला जाईल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांच्या नजीकच्या सूत्रांनी सांगितले की, अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही; कारण, त्यांच्या प्रकृतीच्या काही तक्रारी आहेत.

राममंदिराचे श्रेय कुणाचे?

फेब्रुवारी १९८६ मध्ये राजीव गांधी यांच्या सरकारच्या काळात अयोध्येतील वादग्रस्त जागेचे दरवाजे उघडण्यात आले होते. राजीव गांधी यांनी ऑक्टोबर १९८९ मध्ये फैजाबाद येथून त्यांच्या निवडणूक मोहिमेची सुरुवात केली होती. मणिशंकर अय्यर यांनी लिहिलेल्या त्यांच्या भाषणात ‘रामराज्य’ असा अलिखित संदर्भ दिला. एवढेच नव्हे तर, त्यांच्या सरकारनेच विहिंप नेते अशोक सिंघल यांना नोव्हेंबर १९८९ मध्ये शिलान्यासाची परवानगी दिली होती. त्यामुळे राम मंदिराचे श्रेय काँग्रेसने घ्यावे, असे काँग्रेसमधील अनेकांना वाटते.

 

टॅग्स :congressकाँग्रेसRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या