शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
3
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
4
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
5
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
6
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
7
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
8
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
9
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
10
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
11
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
13
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
14
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
15
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
16
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
18
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
19
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
20
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

प्राणप्रतिष्ठेला काँग्रेसमधून नेमके कोण जाणार? अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 06:15 IST

त्यामुळे राम मंदिराचे श्रेय काँग्रेसने घ्यावे, असे काँग्रेसमधील अनेकांना वाटते.

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली ( Marathi News ): अयोध्येत राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा समारंभात उपस्थित राहण्याबाबत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि  प्रियांका गांधी यांनी अद्याप कुठलीही माहिती दिलेली नाही. 

राममंदिर न्यास आणि विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते. त्यानंतर पक्षाने एक निवेदन जारी केले की, एक शिष्टमंडळ अयोध्येला जाईल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांच्या नजीकच्या सूत्रांनी सांगितले की, अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही; कारण, त्यांच्या प्रकृतीच्या काही तक्रारी आहेत.

राममंदिराचे श्रेय कुणाचे?

फेब्रुवारी १९८६ मध्ये राजीव गांधी यांच्या सरकारच्या काळात अयोध्येतील वादग्रस्त जागेचे दरवाजे उघडण्यात आले होते. राजीव गांधी यांनी ऑक्टोबर १९८९ मध्ये फैजाबाद येथून त्यांच्या निवडणूक मोहिमेची सुरुवात केली होती. मणिशंकर अय्यर यांनी लिहिलेल्या त्यांच्या भाषणात ‘रामराज्य’ असा अलिखित संदर्भ दिला. एवढेच नव्हे तर, त्यांच्या सरकारनेच विहिंप नेते अशोक सिंघल यांना नोव्हेंबर १९८९ मध्ये शिलान्यासाची परवानगी दिली होती. त्यामुळे राम मंदिराचे श्रेय काँग्रेसने घ्यावे, असे काँग्रेसमधील अनेकांना वाटते.

 

टॅग्स :congressकाँग्रेसRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या