शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

कोण होते बिंदेश्वर पाठक? ज्यांनी 'सुलभ शौचालय' संकल्पना पहिल्यांदा भारतात आणली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 17:25 IST

एका उच्च जातीतील पदवीधर मुलाने शौचालय क्षेत्रात काम करणे सोपे नव्हते. परंतु ते ध्येयापासून मागे हटले नाहीत.

नवी दिल्ली – जगाला शौचालयाचं महत्त्व समजून सांगणारे आणि कोट्यवधी लोकांचे जगणं सोप्पे करणारे सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांनी जगाचा निरोप घेतला. देशातील प्रत्येक शहरात आपण जे सुलभ शौचालय पाहतोय त्यात बिंदेश्वर पाठक यांचेच योगदान आहे. सुलभ शौचालयाला इंटरनॅशनल ब्रँड त्यांनी बनवले. बिहारच्या वैशाली जिल्ह्यात एका गावात १२ एप्रिल १९४३ रोजी पाठक यांचा जन्म झाला.

बिंदेश्वर पाठक अशा घरात वाढले जिथं ९ खोल्या होत्या. परंतु एकही शौचालय नव्हते. घरातील महिला सकाळी लवकर उठून बाहेर शेतावर जात. दिवसभर शौचास जाणे कठीण व्हायचे. त्यामुळे अनेक समस्या आणि आजार मागे लागायचे. हे चित्र बिंदेश्वर पाठक यांना अस्वस्थ करायचे. या समस्येवर तोडगा काढायचा असं त्यांनी ठरवलं. स्वच्छता क्षेत्रात काहीतरी नवीन करण्याचे ध्येय त्यांनी बाळगलं आणि देशात एक मोठा बदल घडला.

बिहार आणि उत्तर प्रदेशात पाठक यांनी शिक्षण घेतले होते. बनारस हिंदू विद्यापीठातून समाज शास्त्रात पदवी घेतली. त्यानंतर पटना विद्यापीठात मास्टर्स आणि पीएचडी पूर्ण केली. १९६८-६९ मध्ये बिहारमध्ये गांधी जन्म शताब्दी सोहळ्यात त्यांनी काम केले. या समितीत त्यांनी स्वस्त शौचालय तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम केले. त्याकाळी एका उच्च जातीतील पदवीधर मुलाने शौचालय क्षेत्रात काम करणे सोपे नव्हते. परंतु ते ध्येयापासून मागे हटले नाहीत.

देश शौचमुक्त करण्याच्या दिशेने ते काम करत होते. त्यामुळे त्यांचे वडील नाराज झाले. पाठक यांचे सासरेही शौचालयाच्या कामाने रागात होते. तुझा चेहरा पुन्हा कधी दाखवू नको असं सासऱ्यांनी जावयाला म्हटलं. माझ्या मुलीचे आयुष्य खराब केले. इतके शाब्दिक बाण बिंदेश्वर पाठक यांनी झेलले तरी गांधीजी स्वप्न साकार करतोय असं ते म्हणायचे.

१९७० मध्ये बिंदेश्वर पाठक यांनी सुलभ इंटरनॅशनलची स्थापना केली. ही एक सामाजिक संघटना होती. सुलभ इंटरनॅशनलने २ खड्ड्यांचे फ्लॅश टॉयलेट विकसित केले. डिस्पोजल कम्पोस्ट शौचालयाचा अविष्कार त्यांनी केला. हे काम त्यांनी इतक्या कमी खर्चात आसपास मिळणाऱ्या सामानातून केले. त्यानंतर देशभरात सुलभ शौचालय बनवण्यास सुरूवात केली. पाठक यांच्या कामगिरीने भारतात त्यांना पद्धभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.