शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

कोण आहे दिव्या द्विवेदी?; त्यांनी असं काय म्हटलं ज्याने सोशल मीडियात लोक संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 13:33 IST

अनेकांनी त्यांच्यावर सनातन धर्माचा अपमान केल्याचा आरोप केला असून ती जागतिक व्यासपीठावर भारताविरुद्ध द्वेष पसरवत असल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली – आयआयटी दिल्लीतील एका प्रोफेसरनं केलेल्या विधानावरून सोशल मीडियात संताप व्यक्त करण्यात येत आहे. एका परदेशी न्यूज चॅनेलला प्रोफेसरने ही मुलाखत दिली. भविष्यात भारतात हिंदुत्व राहणार नाही असं विधान प्रोफेसर दिव्या द्विवेदी यांनी केले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एका परदेशी न्यूज चॅनेलवर जी-२० शिखर संमेलनावरील डिबेटमध्ये त्या सहभागी झाल्या होत्या.

आयआयटी दिल्लीतील प्रोफेसर दिव्या द्विवेदी यांनी फ्रान्स २४ ला म्हटलं की, दोन भारत आहेत - एक म्हणजे भूतकाळातील भारत, बहुसंख्य लोकांवर अत्याचार करणारी वर्णद्वेषी जातिव्यवस्था... आणि मग भविष्याचा भारत आहे, ज्यामध्ये जातीचे अत्याचार आणि हिंदुत्व असणार नाही. समतावादी भारत असेल. हाच तो भारत आहे जो अजून दिसला नाही पण पुढे येण्यास आतुर आहे. त्यांची मुलाखत अनेकांनी व्हायरल केली आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी विचारांचे लोक संतापले आहेत.

फ्रान्स २४ च्या पत्रकाराने भारताच्या आर्थिक विकासाची चर्चा करताना एका रिक्षाचालकाचे उदाहरण दिले. ज्याला तंत्रज्ञानामुळे फायदा झाला, तेव्हा दिव्या द्विवेदी म्हणाल्या की, अशाप्रकारचे किस्से माध्यमांमध्ये आहेत. '३०० वर्षांहून अधिक काळ, भारताला वर्णद्वेषी जातिव्यवस्थेने अडकवलं आहे. जिथे १०% उच्च जातीतील अल्पसंख्याक ९०% शक्तिशाली पदांवर आहेत. हे आजही सुरू आहे. भारतात जातीय अत्याचार, बहिष्कार आणि धर्म म्हणून हिंदू धर्मातील खोट्या रुढीमुळे वाढल्या आहेत. द्विवेदी यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी त्यांच्यावर सनातन धर्माचा अपमान केल्याचा आरोप केला असून ती जागतिक व्यासपीठावर भारताविरुद्ध द्वेष पसरवत असल्याचे म्हटले आहे.

कोण आहे दिव्या द्विवेदी?

आयआयटी दिल्लीची दिव्या द्विवेदी ही मूळची अलाहाबादची आहे. द्विवेदी यांनी सांगितले, 'जी२० शिखर परिषद ही तुलनेने श्रीमंत देश आणि गरीब देशांची परिषद आहे. जीडीपी हे जगात कुठेही प्रगतीचे एकमेव माप नाही. श्रीमंत देशांमध्येही हवामान बदल आणि उजव्या विचारसरणीच्या राजकारणामुळे गरीबी आहे. गरिबी हा जागतिक चिंतेचा विषय असला पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय मंचांनी हे वास्तव स्वीकारले पाहिजे.

'भारतात एकीकडे वंशपरंपरागत हक्क, प्रतिष्ठा आणि समृद्धी आहे आणि दुसरीकडे जन्म, गरिबी आणि जातीच्या आधारावर भेदभाव केला जातो. याकडे लक्ष वेधणे ही माझी मजबुरी आणि बौद्धिक कर्तव्य आहे असं त्यांनी म्हटलं. त्यानंतर माझ्या वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आल्याने आपण त्रस्त आहोत. देशात योग्य बोलण्यावर आक्षेप घेतला जात आहे, याचे मला दुःख आहे असं दिव्या द्विवेदी म्हणाल्या.

टॅग्स :Hinduहिंदू