शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

कोण आहे दिव्या द्विवेदी?; त्यांनी असं काय म्हटलं ज्याने सोशल मीडियात लोक संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 13:33 IST

अनेकांनी त्यांच्यावर सनातन धर्माचा अपमान केल्याचा आरोप केला असून ती जागतिक व्यासपीठावर भारताविरुद्ध द्वेष पसरवत असल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली – आयआयटी दिल्लीतील एका प्रोफेसरनं केलेल्या विधानावरून सोशल मीडियात संताप व्यक्त करण्यात येत आहे. एका परदेशी न्यूज चॅनेलला प्रोफेसरने ही मुलाखत दिली. भविष्यात भारतात हिंदुत्व राहणार नाही असं विधान प्रोफेसर दिव्या द्विवेदी यांनी केले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एका परदेशी न्यूज चॅनेलवर जी-२० शिखर संमेलनावरील डिबेटमध्ये त्या सहभागी झाल्या होत्या.

आयआयटी दिल्लीतील प्रोफेसर दिव्या द्विवेदी यांनी फ्रान्स २४ ला म्हटलं की, दोन भारत आहेत - एक म्हणजे भूतकाळातील भारत, बहुसंख्य लोकांवर अत्याचार करणारी वर्णद्वेषी जातिव्यवस्था... आणि मग भविष्याचा भारत आहे, ज्यामध्ये जातीचे अत्याचार आणि हिंदुत्व असणार नाही. समतावादी भारत असेल. हाच तो भारत आहे जो अजून दिसला नाही पण पुढे येण्यास आतुर आहे. त्यांची मुलाखत अनेकांनी व्हायरल केली आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी विचारांचे लोक संतापले आहेत.

फ्रान्स २४ च्या पत्रकाराने भारताच्या आर्थिक विकासाची चर्चा करताना एका रिक्षाचालकाचे उदाहरण दिले. ज्याला तंत्रज्ञानामुळे फायदा झाला, तेव्हा दिव्या द्विवेदी म्हणाल्या की, अशाप्रकारचे किस्से माध्यमांमध्ये आहेत. '३०० वर्षांहून अधिक काळ, भारताला वर्णद्वेषी जातिव्यवस्थेने अडकवलं आहे. जिथे १०% उच्च जातीतील अल्पसंख्याक ९०% शक्तिशाली पदांवर आहेत. हे आजही सुरू आहे. भारतात जातीय अत्याचार, बहिष्कार आणि धर्म म्हणून हिंदू धर्मातील खोट्या रुढीमुळे वाढल्या आहेत. द्विवेदी यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी त्यांच्यावर सनातन धर्माचा अपमान केल्याचा आरोप केला असून ती जागतिक व्यासपीठावर भारताविरुद्ध द्वेष पसरवत असल्याचे म्हटले आहे.

कोण आहे दिव्या द्विवेदी?

आयआयटी दिल्लीची दिव्या द्विवेदी ही मूळची अलाहाबादची आहे. द्विवेदी यांनी सांगितले, 'जी२० शिखर परिषद ही तुलनेने श्रीमंत देश आणि गरीब देशांची परिषद आहे. जीडीपी हे जगात कुठेही प्रगतीचे एकमेव माप नाही. श्रीमंत देशांमध्येही हवामान बदल आणि उजव्या विचारसरणीच्या राजकारणामुळे गरीबी आहे. गरिबी हा जागतिक चिंतेचा विषय असला पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय मंचांनी हे वास्तव स्वीकारले पाहिजे.

'भारतात एकीकडे वंशपरंपरागत हक्क, प्रतिष्ठा आणि समृद्धी आहे आणि दुसरीकडे जन्म, गरिबी आणि जातीच्या आधारावर भेदभाव केला जातो. याकडे लक्ष वेधणे ही माझी मजबुरी आणि बौद्धिक कर्तव्य आहे असं त्यांनी म्हटलं. त्यानंतर माझ्या वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आल्याने आपण त्रस्त आहोत. देशात योग्य बोलण्यावर आक्षेप घेतला जात आहे, याचे मला दुःख आहे असं दिव्या द्विवेदी म्हणाल्या.

टॅग्स :Hinduहिंदू