शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
5
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
6
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
7
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
10
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
11
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
12
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
13
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
14
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
15
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
16
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
17
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
18
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
19
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
20
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 06:54 IST

भारतीयांची उत्पत्ती नवपाषाणकालीन इराणी शेतकरी, युरेशियन स्टेपीमधील पशुपालक, आणि दक्षिण आशियातील आदिम शिकारी या तीन मानवसमूहांपासून झाली आहे.

नवी दिल्ली : आजच्या भारतीयांच्या आनुवंशिक रचनेचा उगम कुठे आहे, यावर महत्त्वपूर्ण शोधाचा खुलासा झाला आहे. भारतीयांची उत्पत्ती नवपाषाणकालीन इराणी शेतकरी, युरेशियन स्टेपीमधील पशुपालक, आणि दक्षिण आशियातील आदिम शिकारी या तीन मानवसमूहांपासून झाली आहे, असे दिल्लीतील एम्स आणि कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथील शास्त्रज्ञांच्या संयुक्त संशोधनातून समोर आले आहे. सर्वाधिक आनुवंशिक वैविध्य आढळते भारतीयांत

या संशोधनानुसार, जगभरातील गैर-अफ्रिकन लोकांमध्ये भारतीयांमध्ये सर्वाधिक आनुवंशिक विविधता आढळते. संशोधक प्रिया मूरजानी (कॅलिफोर्निया विद्यापीठ) यांनी सांगितले की, हजारो वर्षांतील स्थलांतर, सामाजिक रचना आणि मानवी संपर्क यांमुळे भारतीयांच्या जनुक रचनेवर मोठा प्रभाव पडला आहे.

आजच्या काळातील आरोग्यावर कोणता होतो परिणाम?

या प्राचीन मानवसमूहांकडून वारशाने मिळालेली ही जनुकीय माहिती भारतीय लोकांची रोगप्रतिकारशक्ती कशी घडते, कोणते आजार भारतीयांना अधिक होतात यावर प्रकाश टाकते. त्यामुळे भविष्यात संपूर्ण भारतीय उपखंडासाठी अधिक प्रभावी वैद्यकीय उपाययोजना आखता येऊ शकतील.

रक्तात कुणाचा वारसा अधिक?

भारतीयांच्या गुणसूत्रांच्या अभ्यासात एक चित्तथरारक बाब समोर आली ती ही की, भारतीयांमध्ये निएंडरथल आणि डेनिसोवन या लुप्त झालेल्या प्राचीन मानवप्रजातींचे गुणधर्म आजही मोठ्या प्रमाणात आहेत. निएंडरथल हे मानवाशी अगदी जवळच्या पण आता लुप्त झालेल्या प्रजातीचे प्रतिनिधी आहेत. ते चाळीस ते चार लाख वर्षांपूर्वी मध्य आशियामध्ये राहत होते. 

शास्त्रज्ञ लॉरिट्स स्कोव यांच्या मते, भारतीयांच्या डीएनए नमुन्यांमधून ५० टक्के निएंडरथल आणि २० टक्के डेनिसोवन गुणसूत्रांची पुनर्रचना करण्यात संशोधक यशस्वी झाले.  डेनिसोवन हा प्राचीन मानवी समूह प्रामुख्याने आशियात होता आणि निएंडरथलप्रमाणेच २०,००० ते ५०,००० वर्षांपूर्वी ते नामशेष झाले.

भारतीयांच्या आनुवंशिक इतिहासातील अनेक रहस्यांवर प्रकाश

हे संशोधन प्रसिद्ध ‘सेल’ या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाले असून, यामुळे भारतीयांच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आनुवंशिक इतिहासातील अनेक रहस्यांवर प्रकाश पडतो. नवपाषाण काळात शेतीची सुरुवात झाली व मानवाने दगडी हत्यारे, उपकरणांचा वापर करण्यास सुरुवात केली होती.

टॅग्स :AIIMS hospitalएम्स रुग्णालयuniversityविद्यापीठhistoryइतिहास