शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
2
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
5
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
6
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
7
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
8
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
9
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
10
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
11
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
12
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
13
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
14
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
15
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
16
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
17
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
18
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
19
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना
20
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य

...तर काश्मीरमध्ये चिनी सैन्य घुसवू

By admin | Updated: July 11, 2017 06:24 IST

पाकिस्तानने हस्तक्षेपाची विनंती केल्यास पाकिस्तानच्या दिशेने तिसऱ्या देशाचे सैन्य काश्मिरात घुसखोरी करू शकते

बीजिंग : पाकिस्तानने हस्तक्षेपाची विनंती केल्यास पाकिस्तानच्या दिशेने तिसऱ्या देशाचे सैन्य काश्मिरात घुसखोरी करू शकते, असा इशारा देत आम्हीच तेथून काश्मीरमध्ये घुसू, असे चीनच्या सरकारी माध्यमांनी सूचित केले आहे. सिक्किमजवळील डोकलामच्या मुद्द्यावरून भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झालेला असतानाच चीनने प्रथमच या वादात काश्मीरमध्ये घुसण्याची अप्रत्यक्ष भाषा सुरू केली आहे. चीनने तिसऱ्या देशाचे सैन्य असा उल्लेख केला असला तरी त्या देशाची स्वत:च तिथून काश्मिरात घुसण्याची तयारी असल्याचे मानले जाते. एकीकडे भारत व पाकिस्तान संबंध तणावाचे आहेत आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सातत्याने पाकिस्तानी लष्कर भारताच्या दिशेने गोळीबार व तोफांचे मारे करीत आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांना भारतात घुसण्यास मदत करणे आणि काश्मीरमधील अतिरेक्यांना सततची मदत हाही पाकिस्तानच्या कारवायांचा भाग आहे. त्यातच भारत व अमेरिका संबंध वृद्धिंगत होत असल्याने पाकिस्तान व चीन दोघेही अस्वस्थ आहेत. पाकमधील अनेक प्रकल्पांमध्ये सध्या चीनची गुंतवणूक असून, हे दोन्ही देश आता मित्रच बनले आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने विनंती केल्यास काश्मीरमध्ये घुसण्याची धमकी देणे, याला बराच अर्थ आहे. सरकारी मालकीच्या ‘ग्लोबल टाइम्स’ या वृत्तपत्राने म्हटले आहे की, ज्या प्रकारे डोकलाममध्ये चीनचे रस्त्याचे काम भारतीय सैन्याने रोखले आहे, ते पाहता पाकिस्तानच्या विनंतीवरून काश्मीरमध्ये तिसऱ्या देशाचे (पान ९ वर)(पान १ वरून) सैन्य घुसू शकते. भारताकडून भूतानचे क्षेत्र वाचविण्याचा प्रयत्न होत असेल तर, तो त्यांच्या क्षेत्रापर्यंतच मर्यादित असायला हवा. वादग्रस्त क्षेत्रासाठी नकोय. अन्यथा, भारताच्याच तर्काने कृती करायची झाल्यास तिसऱ्या देशाचे सैन्य काश्मीरसह वादग्रस्त क्षेत्रात घुसू शकते. या लेखात म्हटले आहे की, भारतीय सैनिकांनी भूतानला मदत करण्याच्या नावाखाली चीनच्या डोकलाम भागात प्रवेश केला आहे. भारताकडून दुसऱ्या देशाच्या अंतर्गत प्रश्नात दखल न देण्याचे सांगितले जात असले तरी त्यांच्याकडून संयुक्त राष्ट्राच्या घोषणापत्राचे उल्लंघन होत आहे. भारताने सिक्किमवरही असाच ताबा मिळविला आहे. भारताला अशी भीती आहे की, चीन सैन्याच्या बळावर पूर्वोत्तर भारताला मुख्य भारतापासून वेगळे करेल. (वृत्तसंस्था)>चीनच्या राजदूतांना राहुल गांधी भेटल्याने वादळनवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चीनच्या भारतातील राजदूतांच्या घेतलेल्या भेटीवरून काँग्रेसवर भाजपाने हल्ला चढविला असून, काँग्रेसनेही तशाच कडक भाषेत भाजपा व मोदी सरकारवर प्रतिहल्ला केला आहे. शनिवारी गांधी आणि चीनचे भारतातील राजदूत लुओ ज्हाओहुई यांची भेट झाली. त्यावरून भाजपाने राहुल यांच्यावर हल्ले सुरू केले. काँगे्रसनेही त्याला तसेच उत्तर देताना चीनने द्विपक्षीय चर्चेला नकार दिल्यानंतरही जर्मनीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या भेटीसाठी का गेले, असा प्रश्न विचारला आहे. >भारताने भूतानचा मान ठेवावा!लेखात असेही म्हटले आहे की, चीनचे रस्त्याचे काम म्हणजे भारताविरुद्धचा भूराजकीय उद्देश असल्याचे भारताचे म्हणणे आहे. मात्र, भारत स्वत: असे करण्यास अक्षम असल्यामुळेच चीनचे काम त्यांनी रोखले आहे. भारताची कृती ही आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करणारी आहे. चीन आणि भुतान यांच्यातील वाद दोन्ही पक्षांनी सोडवायला हवा आणि भारताने भुतानच्या सार्वभौमत्वाचा सन्मान करायला हवा.