शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

...तर राम मंदिर कधी बांंधणार? शंकराचार्यांचा सवाल : साईबाबा मंदिर बांधण्यावर केला प्रश्न उपस्थित

By admin | Updated: October 5, 2015 00:39 IST

जळगाव : देवाची उपासना सोडून आज सर्व जण मनुष्याची उपासना करीत आहे, सध्या सर्वत्र साईबाबा मंदिर उभे राहत आहे मात्र राम मंदिर कधी बांधणार? असा प्रश्न ज्योतिष व द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी केला आहे. आध्यात्मिक उत्थान मंडळाच्या जळगाव शाखेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते भक्तांना मार्गदर्शन करीत होते. त्यावेळी त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला.

जळगाव : देवाची उपासना सोडून आज सर्व जण मनुष्याची उपासना करीत आहे, सध्या सर्वत्र साईबाबा मंदिर उभे राहत आहे मात्र राम मंदिर कधी बांधणार? असा प्रश्न ज्योतिष व द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी केला आहे. आध्यात्मिक उत्थान मंडळाच्या जळगाव शाखेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते भक्तांना मार्गदर्शन करीत होते. त्यावेळी त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला.
भगवान श्रीराम, श्रीकृष्ण यांची भक्ती सोडून आज सर्वजण साईबाबाची भक्ती करीत आहे. देवाला सोडून मनुष्याची उपसाना करु नका असे सांगून त्यांनी साईबाबांचे डीएनए पहा असेही ते म्हणाले. भक्ताला कसलीच चिंता नसते, कारण देव त्यांच्यामागे असतो, असे सांगून त्यांनी सुरदास व श्रीकृष्णाचे उदाहरण दिले.
राम मंदिर न होण्यासाठी विदेशी शक्ती
देशात राम मंदिर होऊ नये म्हणून यामागे ब्रिटनच्या एका एजन्सीचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला. यासाठी त्यांनी माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांना हाताशी धरल्याचे सांगितले. त्यासाठी सिंग यांनी मंडळ आयोगाची स्थापना केली आणि हिंदूंमध्ये फूट पाडली, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे आज कुणीही साई मंदिर बांधत आहे आणि राम मंदिराकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. राम मंदिर बांधत नसाल तर आयोध्या धर्मस्थान कसे राहिल असा प्रश्न करत त्यांनी साई मंदिर बांधाल तर धर्मस्थान शिर्डी होईल असा इशारा दिला. मनात धर्म आस्था ठेवाल तर हिंदू धर्म राहिल आणि तरच देशात एकता राहिल, असेही ते म्हणाले. वेदशास्त्र मानते तोच खरा हिंदू असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांवर टीका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आज पुन्हा शंकराचार्यांनी वक्तव्य केले. त्यांना आम्ही केवळ ज्ञान देत आहे, त्यांनी देशाची संस्कृती समजली पाहिजे सांगून तुम्ही केवळ पाच वर्षांसाठी आहे, आम्ही नेहमीसाठी आहे, असा इशारा दिला.
आम्ही मुस्लीम विरोधी नाही. श्रीकृष्णाचे अनेक मुस्लीम भक्त होते . रामजन्मभूमी ही खरोखर रामाचीच जन्मभूमी असल्याचे स्पष्ट झाले असून या देशात बाबर कधी आलाच नाही व त्याने तेथे मशिद बांधली नाही, असे आता न्यायालयातही स्पष्ट केल्याचे त्यांनी सांगितले.