शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

...तर राम मंदिर कधी बांंधणार? शंकराचार्यांचा सवाल : साईबाबा मंदिर बांधण्यावर केला प्रश्न उपस्थित

By admin | Updated: October 5, 2015 00:39 IST

जळगाव : देवाची उपासना सोडून आज सर्व जण मनुष्याची उपासना करीत आहे, सध्या सर्वत्र साईबाबा मंदिर उभे राहत आहे मात्र राम मंदिर कधी बांधणार? असा प्रश्न ज्योतिष व द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी केला आहे. आध्यात्मिक उत्थान मंडळाच्या जळगाव शाखेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते भक्तांना मार्गदर्शन करीत होते. त्यावेळी त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला.

जळगाव : देवाची उपासना सोडून आज सर्व जण मनुष्याची उपासना करीत आहे, सध्या सर्वत्र साईबाबा मंदिर उभे राहत आहे मात्र राम मंदिर कधी बांधणार? असा प्रश्न ज्योतिष व द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी केला आहे. आध्यात्मिक उत्थान मंडळाच्या जळगाव शाखेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते भक्तांना मार्गदर्शन करीत होते. त्यावेळी त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला.
भगवान श्रीराम, श्रीकृष्ण यांची भक्ती सोडून आज सर्वजण साईबाबाची भक्ती करीत आहे. देवाला सोडून मनुष्याची उपसाना करु नका असे सांगून त्यांनी साईबाबांचे डीएनए पहा असेही ते म्हणाले. भक्ताला कसलीच चिंता नसते, कारण देव त्यांच्यामागे असतो, असे सांगून त्यांनी सुरदास व श्रीकृष्णाचे उदाहरण दिले.
राम मंदिर न होण्यासाठी विदेशी शक्ती
देशात राम मंदिर होऊ नये म्हणून यामागे ब्रिटनच्या एका एजन्सीचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला. यासाठी त्यांनी माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांना हाताशी धरल्याचे सांगितले. त्यासाठी सिंग यांनी मंडळ आयोगाची स्थापना केली आणि हिंदूंमध्ये फूट पाडली, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे आज कुणीही साई मंदिर बांधत आहे आणि राम मंदिराकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. राम मंदिर बांधत नसाल तर आयोध्या धर्मस्थान कसे राहिल असा प्रश्न करत त्यांनी साई मंदिर बांधाल तर धर्मस्थान शिर्डी होईल असा इशारा दिला. मनात धर्म आस्था ठेवाल तर हिंदू धर्म राहिल आणि तरच देशात एकता राहिल, असेही ते म्हणाले. वेदशास्त्र मानते तोच खरा हिंदू असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांवर टीका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आज पुन्हा शंकराचार्यांनी वक्तव्य केले. त्यांना आम्ही केवळ ज्ञान देत आहे, त्यांनी देशाची संस्कृती समजली पाहिजे सांगून तुम्ही केवळ पाच वर्षांसाठी आहे, आम्ही नेहमीसाठी आहे, असा इशारा दिला.
आम्ही मुस्लीम विरोधी नाही. श्रीकृष्णाचे अनेक मुस्लीम भक्त होते . रामजन्मभूमी ही खरोखर रामाचीच जन्मभूमी असल्याचे स्पष्ट झाले असून या देशात बाबर कधी आलाच नाही व त्याने तेथे मशिद बांधली नाही, असे आता न्यायालयातही स्पष्ट केल्याचे त्यांनी सांगितले.