शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

लोकपालांना मुहूर्त केव्हा मिळणार? सुप्रीम कोर्टाने १० दिवसांत मागितले उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 01:18 IST

भ्रष्टाचाराविरुद्ध सशक्त यंत्रणा म्हणून गाजावाजा केलेल्या लोकपालांची नेमणूक करण्यास केव्हा मुहूर्त मिळणार, अशी विचारणा करून सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी या संदर्भात सरकारला १० दिवसांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

नवी दिल्ली : भ्रष्टाचाराविरुद्ध सशक्त यंत्रणा म्हणून गाजावाजा केलेल्या लोकपालांची नेमणूक करण्यास केव्हा मुहूर्त मिळणार, अशी विचारणा करून सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी या संदर्भात सरकारला १० दिवसांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.कायद्यात दुरुस्त्या न करताही लोकपालांची नियुक्ती करण्यात काहीच अडचण नाही, असा निकाल न्यायालयाने गेल्या वर्षी दिला होता. तरीही प्रत्यक्ष नेमणुकीच्या दृष्टीने काहीच हालचाल नसल्याने ‘कॉमन कॉज’ या स्वयंसेवी संस्थेने न्यायालयीन अवमान याचिका दाखल केली आहे. न्या. रंजन गोगोई व न्या. आर. भानुमती यांच्या खंडपीठापुढे ही याचिका आली तेव्हा अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ यांनी लोकपालांच्या नेमणुकीसंबंधी सरकारकडून त्यांना दिली गेलेली माहिती सादर केली. त्यावर न्यायालायाने असे निर्देश दिले की, सरकार नेमकी कोणती पावले केव्हा उचलणार आहे व लोकपाल केव्हा नेमले जाणार आहेत, याचे सविस्तर प्रतिज्ञापत्र १० दिवसांत सादर करावे.ख्यातनाम विधिज्ञांच्या निवडीने सबब दूरप्रकरणाची पुढील सुनावणी १७ जुलै रोजी ठेवण्यात आली. सध्याच्या लोकसभेत कोणीही मान्यताप्राप्त विरोधी पक्षनेता नसल्याने लोकपाल निवड समितीवरील ‘ख्यातनाम विधिज्ञ’ सदस्याची निवड रखडली आहे व निवड समिती अपूर्ण असल्याने लोकपालांचीही निवड करता येत नाही, अशी अडचण सरकार गेले कित्येक महिने सांगत होते. आता ख्यातनाम विधिज्ञ म्हणून मुकुल रोहटगी यांची नेमणूक झाल्याने ही सबब दूर झाली आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय