शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 21:23 IST

Pakistan News: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तानमधील सरकार आणि लष्कराची त्रेधा उडालेली आहे. भारतीय सैन्यदलं पहलगामचा बदला घेण्यासाठी कधीही हल्ला करतील, अशी भीती पाकिस्तानमधील सत्ताधारी आणि लष्कराला वाटत आहे.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तानमधील सरकार आणि लष्कराची त्रेधा उडालेली आहे. भारतीय सैन्यदलं पहलगामचा बदला घेण्यासाठी कधीही हल्ला करतील, अशी भीती पाकिस्तानमधील सत्ताधारी आणि लष्कराला वाटत आहे. पाकिस्तानमधील नेते, मुत्सद्दी आणि पत्रकार हल्ल्याबाबत वेगवेगळे दावे करत आहेत. दरम्यान, दिल्लीमध्ये पाकिस्तानचे उच्चायुक्त राहिलेले माजी मुत्सद्दी अब्दुल बासित यांनी भारताकडून पाकिस्तानवर करण्यात येणाऱ्या हल्ल्याबाबत नवी तारीख जाहीर केली आहे.

भारत पाकिस्तानवर १० किंवा ११ मे रोजी हल्ला करू शकतो असा दावा अब्दुल बासित यांनी ट्विट करत केला आहे. भारत १० आणि ११ मेरोजी पाकिस्तानविरोधात मर्यादित लष्करी कारवाई करू शकतो. तत्पूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इसाक डार आणि संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारत ३६ ते ४८ तासांमध्ये हल्ला करू शकतो, असा दावा केला होता.

दरम्यान, अब्दुल बासित यांनी केलेला दावा हा पाकिस्तानकडून चालवण्यात येणाऱ्या प्रोपेगेंडा वॉरचा भाग असू शकतो, कारण भारत पाकिस्तानविरुद्ध कोणत्या प्रकारची कारवाई करणार आहे, त्याची तारीख काय असेल आणि ही कारवाई कुठे होईल, याबाबत काही मोजक्या लोकांशिवाय फार कुणाला माहिती असण्याची शक्यता नाही आहे.

गेल्या महिन्यात २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला करून २६ पर्यटकांची हत्या केली होती. त्यानंतर या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे तपासामधून समोर आले होते. तेव्हापासूनच पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी देशभरातून होत आहे.  

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारतwarयुद्ध