शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
2
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
3
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
6
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
7
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
8
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
9
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
10
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
11
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
12
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
13
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
14
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
15
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
16
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
17
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
18
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
19
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
20
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले

भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 21:23 IST

Pakistan News: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तानमधील सरकार आणि लष्कराची त्रेधा उडालेली आहे. भारतीय सैन्यदलं पहलगामचा बदला घेण्यासाठी कधीही हल्ला करतील, अशी भीती पाकिस्तानमधील सत्ताधारी आणि लष्कराला वाटत आहे.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तानमधील सरकार आणि लष्कराची त्रेधा उडालेली आहे. भारतीय सैन्यदलं पहलगामचा बदला घेण्यासाठी कधीही हल्ला करतील, अशी भीती पाकिस्तानमधील सत्ताधारी आणि लष्कराला वाटत आहे. पाकिस्तानमधील नेते, मुत्सद्दी आणि पत्रकार हल्ल्याबाबत वेगवेगळे दावे करत आहेत. दरम्यान, दिल्लीमध्ये पाकिस्तानचे उच्चायुक्त राहिलेले माजी मुत्सद्दी अब्दुल बासित यांनी भारताकडून पाकिस्तानवर करण्यात येणाऱ्या हल्ल्याबाबत नवी तारीख जाहीर केली आहे.

भारत पाकिस्तानवर १० किंवा ११ मे रोजी हल्ला करू शकतो असा दावा अब्दुल बासित यांनी ट्विट करत केला आहे. भारत १० आणि ११ मेरोजी पाकिस्तानविरोधात मर्यादित लष्करी कारवाई करू शकतो. तत्पूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इसाक डार आणि संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारत ३६ ते ४८ तासांमध्ये हल्ला करू शकतो, असा दावा केला होता.

दरम्यान, अब्दुल बासित यांनी केलेला दावा हा पाकिस्तानकडून चालवण्यात येणाऱ्या प्रोपेगेंडा वॉरचा भाग असू शकतो, कारण भारत पाकिस्तानविरुद्ध कोणत्या प्रकारची कारवाई करणार आहे, त्याची तारीख काय असेल आणि ही कारवाई कुठे होईल, याबाबत काही मोजक्या लोकांशिवाय फार कुणाला माहिती असण्याची शक्यता नाही आहे.

गेल्या महिन्यात २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला करून २६ पर्यटकांची हत्या केली होती. त्यानंतर या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे तपासामधून समोर आले होते. तेव्हापासूनच पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी देशभरातून होत आहे.  

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारतwarयुद्ध