शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 21:23 IST

Pakistan News: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तानमधील सरकार आणि लष्कराची त्रेधा उडालेली आहे. भारतीय सैन्यदलं पहलगामचा बदला घेण्यासाठी कधीही हल्ला करतील, अशी भीती पाकिस्तानमधील सत्ताधारी आणि लष्कराला वाटत आहे.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तानमधील सरकार आणि लष्कराची त्रेधा उडालेली आहे. भारतीय सैन्यदलं पहलगामचा बदला घेण्यासाठी कधीही हल्ला करतील, अशी भीती पाकिस्तानमधील सत्ताधारी आणि लष्कराला वाटत आहे. पाकिस्तानमधील नेते, मुत्सद्दी आणि पत्रकार हल्ल्याबाबत वेगवेगळे दावे करत आहेत. दरम्यान, दिल्लीमध्ये पाकिस्तानचे उच्चायुक्त राहिलेले माजी मुत्सद्दी अब्दुल बासित यांनी भारताकडून पाकिस्तानवर करण्यात येणाऱ्या हल्ल्याबाबत नवी तारीख जाहीर केली आहे.

भारत पाकिस्तानवर १० किंवा ११ मे रोजी हल्ला करू शकतो असा दावा अब्दुल बासित यांनी ट्विट करत केला आहे. भारत १० आणि ११ मेरोजी पाकिस्तानविरोधात मर्यादित लष्करी कारवाई करू शकतो. तत्पूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इसाक डार आणि संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारत ३६ ते ४८ तासांमध्ये हल्ला करू शकतो, असा दावा केला होता.

दरम्यान, अब्दुल बासित यांनी केलेला दावा हा पाकिस्तानकडून चालवण्यात येणाऱ्या प्रोपेगेंडा वॉरचा भाग असू शकतो, कारण भारत पाकिस्तानविरुद्ध कोणत्या प्रकारची कारवाई करणार आहे, त्याची तारीख काय असेल आणि ही कारवाई कुठे होईल, याबाबत काही मोजक्या लोकांशिवाय फार कुणाला माहिती असण्याची शक्यता नाही आहे.

गेल्या महिन्यात २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला करून २६ पर्यटकांची हत्या केली होती. त्यानंतर या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे तपासामधून समोर आले होते. तेव्हापासूनच पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी देशभरातून होत आहे.  

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारतwarयुद्ध