शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
5
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
6
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
7
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
8
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
9
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
10
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
12
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
13
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
14
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
15
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
16
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
17
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
18
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
19
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
20
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'

अग्निशमन विभाग सुसज्ज केव्हा होणार?

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

शहराचा विकास : उंच इमारतीत आग लागल्यास नियंत्रण यंत्रणा नाही

शहराचा विकास : उंच इमारतीत आग लागल्यास नियंत्रण यंत्रणा नाही
नागपूर : विस्तारासोबतच शहरात टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. परंतु महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे १५-२० वर्षापूर्वी जी यंत्रणा होती तीच आजही आहे. शहरात २०-२२ मीटर उंचीच्या इमारतीत आग लागल्यास ती आटोक्यात आणणारी यंत्रणा या विभागाकडे नाही. हा विभाग सुसज्ज केव्हा होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आपत्ती व्यवस्थापनावर दरवर्षी चर्चा होते. पावसाळा व उन्हाळ्याच्या दिवसात आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क असल्याचा दावा केला जातो. परंतु अग्निशमन विभागाकडे सक्षम यंत्रणा नसल्याने उंच इमातीला आग लागल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
१५ वर्षापूर्वी शहरात पाच अग्निशमन केंद्रे होती. विभागात ३०० कर्मचारी व अधिकारी होते. मागील काही वर्षात शहराचा विस्तार होऊ न लोकसंख्या ३० लाखांवर गेली आहे. १० अग्निशमन केंद्रे झाली परंतु विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांची संख्या मात्र आजही तितकीच आहे.
शहरात हुडकेश्वर, नरसाळा भागाचा समावेश करण्यात आला आहे. मिहान सारखे मोठे प्रकल्प उभे राहात आहेत. एम्प्रेस सिटी, आनंदम् यासारख्या टोलेजंग इमारती उभारण्यात आलेल्या आहेत. बैद्यनाथ चौकाच्या बाजूला भव्य मॉल्स व निवासी संकुल उभारले जात आहे. सोबतच शहरात ४५ ते ६० मीटर उंचीच्या इमारती उभ्या राहात आहेत. परंतु अशा इमारतीच्या वरच्या माळ्यावर आग लागल्यास ती आटोक्यात आणता येणारी टीटीएलसारखी यंत्रणा अग्निशमन विभागाकडे नाही. (प्रतिनिधी)
चौकट...
प्रस्ताव प्रलंबित
शहराचा होत असलेला विकास विचारात घेता अग्निशमन विभागाने टीटीएल यंत्र खरेदीचा राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. परंतु मागील काही वर्षापासून तो प्रलंबित आहे. यावर पाच कोटीचा खर्च अपेक्षित आहे. याबाबत दोनदा ग्लोबल निविदा काढण्यात आल्या. आता तिसऱ्यांना निविदा काढण्यात आली. पण पुढे काय हा प्रश्न कायम आहे.
चौकट...
२५० अधिकारी व कर्मचाऱ्यांची गरज
अग्निशमन विभागाला ५० अधिकारी व २०० कर्मचाऱ्यांची गरज आहे. तसेच शहराचा विस्तार व लोकसंख्या विचारात घेता अत्याधुनिक यंत्रणेची गरज आहे. विभागाला वर्षाला पाच कोटी मिळतात परंतु याचा योग्य प्रकारे विनियोग होत नसल्याचे चित्र आहे.