शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

...अन् विशाल ददलानीला मागावी लागली होती मुनी तरुण सागर यांची माफी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 14:04 IST

तरुण सागर यांच्या हरयाणा विधानसभेतील भाषणावर केली होती टीका

नवी दिल्ली: जैन मुनी तरुण सागर यांचं आज मध्यरात्री निधन झालं. वयाच्या 51 व्या वर्षी त्यांनी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अतिशय नाजूक होती. त्यांची प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी त्यांच्या अनुयायांकडून प्रार्थना केल्या जात होत्या. मात्र ते उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. आज मध्यरात्री तीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.तरुण सागर यांच्या अनुयायांची संख्या लाखोंच्या घरात आहे. ते त्यांच्या कडव्या विचारासांठी आणि परखड बोलण्यासाठी ओळखले जायचे. दोन वर्षांपूर्वी हरयाणाचे शिक्षणमंत्री रामविलास शर्मा यांनी तरुण सागर यांना विधानसभेत आमंत्रित केलं होतं. त्यावेळी तरुण सागर यांनी विधानसभेला संबोधित केलं होतं. जैन परंपरेनुसार, तरुण सागर कपड्यांशिवाय हरयाणाच्या विधानसभेत पोहोचले. यावरुन संगीतकार विशाल ददलानीनं ट्विटरवर नाराजी व्यक्त केली होती. 'जर तुम्ही अशा व्यक्तींना निवडून देत असाल, तर यासाठी तुम्हीच जबाबदार आहात,' असं ददलानीनं ट्विटमध्ये म्हटलं होतं. नो अच्छे दिन जस्ट नो कच्छे दिन, असंही त्यानं ट्विटमध्ये म्हटलं होतं.विशाल ददलानीच्या या ट्विटनंतर अनेकांनी त्याच्यावर टीका केली. यानंतर ददलानीनं तरुण सागर यांची भेट घेतली आणि कान धरुन त्यांची माफी मागितली. जैन धर्माच्या परंपरेनुसार अशाप्रकारे माफी मागितली जाते. आपल्या कडव्या प्रवचनांसाठी ओळखल्या जाणाऱ्या तरुण सागर यांचा जन्म 1967 मध्ये मध्य प्रदेशच्या दमोह जिल्ह्यात झाला. त्यांचं मूळ नाव पवन कुमार जैन असं होतं. जैन मुनी होण्यासाठी त्यांनी 13 व्या वर्षी घरी सोडलं आणि 8 मार्च 1981 रोजी दिक्षा घेतली.  

टॅग्स :Tarun Sagarतरुण सागरVishal Dadlaniविशाल ददलानी