शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

Venkaiah Naidu: "PM मोदींचा फोन आला अन् मला रडूच फुटलं..." व्यंकय्या नायडूंनी सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 23:28 IST

"मला फार वाईट वाटत होतं..."; वाचा नक्की काय होता तो प्रसंग

Venkaiah Naidu Pm Narendra Modi: राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांना सोमवारी संसदेत निरोप देण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निरोप घेत नायडू यांच्या कार्यकाळातीत आठवणींना उजाळा दिला. पंतप्रधान म्हणाले की, सभागृहासाठी हे खूप भावनिक क्षण आहेत. या सभागृहाचे नेतृत्व करण्याची तुमची जबाबदारी तुम्ही योग्य प्रकारे पार पाडलीत. आताही जबाबदारी म्हणून निरोप घेत असाल तरी तुमच्या अनुभवांचा लाभ आम्हाला भविष्यात दीर्घकाळ मिळत राहील अशी आशा आहे. याच वेळी व्यंकय्या नायडू यांनीही निरोप समारंभाच्या औचित्याने या कार्यक्रमात एक किस्सा सांगितला.

पंतप्रधान मोदींचा तो फोन आला अन्...

व्यंकय्या नायडू म्हणाले की, मी माझ्या आयुष्यात कधीही कोणाच्या पाया पडलो नाही. त्यांनी ५ वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोन कॉलची आठवण सांगितली. जेव्हा पक्षाने नायडू यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड केली होती त्यावेळची ही गोष्ट होती. नायडू म्हणाले की, ज्या दिवशी पंतप्रधान मोदींनी फोन करून सांगितले की माझी उपराष्ट्रपती पदी निवड होत आहे, तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं. मला रडू फुटलं त्याचं कारण मला फार वाईट वाटत होतं. आणि वाईट एकाच गोष्टीचं वाटत होतं ते म्हणजे मला माझा पक्ष सोडावा लागणार होता आणि म्हणूनच मी दु:खी झालो होतो.

व्यंकय्या नायडू म्हणाले की, लोकशाहीमध्ये बहुमत नेहमीच असते. परंतु विरोधकांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे आणि सरकारने त्यांना पुढे येऊ दिले पाहिजे. लोकशाहीत शेवटी बहुमत निर्णय घेते. राजकारणात कधीही शॉर्टकट नसतात. तुम्हाला संयम आणि कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. लोकांपर्यंत जा, त्यांना जागरूक करा आणि इतरांचे म्हणणे ऐका. तुष्टीकरण करू नका, त्याउलट सर्वांचाच आदर करा, असा मोलाचा सल्ला त्यांनी साऱ्यांना दिला.

"मी माझी जबाबदारी सांभाळण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. मी दक्षिण, उत्तर, पूर्व, पश्चिम, ईशान्य अशा सर्व पैलूंना सामावून घेण्याचा आणि संधी देण्याचा प्रयत्न केला. तुमच्यापैकी प्रत्येकाला वेळ दिला. आमच्यावर वरिष्ठ सभागृहाची मोठी जबाबदारी आहे. संपूर्ण जग पाहत असते. भारत पुढे जात आहे. त्यामुळे मी राज्यसभेच्या खासदारांना आवाहन करतो की त्यांनी सदाचार, प्रतिष्ठा आणि शिष्टाचार राखावे, जेणेकरून सभागृहाची प्रतिमा आणि प्रतिष्ठा कायम राखली जाईल", असे व्यंकय्या नायडू यांनी जाता-जाता सांगितले.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूNarendra Modiनरेंद्र मोदीRajya Sabhaराज्यसभाBJPभाजपा