शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

विरोधी पक्ष एकत्र येत असताना भाजपाप्रणीत आघाडीत अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 05:55 IST

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीत सर्वच पक्षांचे खासदार आपापल्या नफा नुकसानीचा अंदाज घेत आहेत. काहींनी लढाईचे रणशिंग फुंकले आहे, तर काही पक्षांना जागावाटपाचा तिढा सुटण्याची प्रतीक्षा आहे.

- सुरेश भटेवरानवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीत सर्वच पक्षांचे खासदार आपापल्या नफा नुकसानीचा अंदाज घेत आहेत. काहींनी लढाईचे रणशिंग फुंकले आहे, तर काही पक्षांना जागावाटपाचा तिढा सुटण्याची प्रतीक्षा आहे. मात्र, त्याआधी मोदींवर आक्रमक हल्ले चढवीत राहुल गांधी प्रकाशात आले आणि गेल्या काही दिवसांत ममता बॅनर्जी, मायावती व अखिलेश यादवांनीही साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतले आहे.उत्तरप्रदेशात सप बसपची आघाडी भाजपला भुईसपाट करायला सरसावली आहे तर पाटण्यात काँग्रेसने आयोजित केलेल्या रॅलीनंतर बिहारमधे लालूप्रसाद व काँग्रेस आघाडीला यंदा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. बंगालमधे सीबीआयच्या अतिउत्साही कारवाईला ‘बंगाल विरुद्ध दिल्ली’ असे स्वरूप देण्यात ममता यशस्वी झाल्या. बहुतांश विरोधी पक्ष त्यांच्या पाठिशी उभे राहिले. अशा नाट्यपूर्ण घटनामुळे यंदाची निवडणूक केवळ पंतप्रधान मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी नसून त्रिशंकू लोकसभेची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या निवासस्थानी येणाºया विरोधी नेत्यांच्या चर्चेतून हाच सूर ऐकू येत आहे.माजी मुख्यमंत्री नारायण राणे तांत्रिकदृष्ट्या भाजपच्या जाहीरनामा समितीचे सदस्य आहेत. मात्र आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष यंदा स्वतंत्रपणे निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. एकूणच मोदी-शहा यांच्या जोडीला रालोआच्या घटक पक्षांना सांभाळता आले नसल्याचे दिसत आहे. पंतप्रधान मोदींनी विरोधकांच्या महाआघाडीची संभावना ‘महाभेसळ’ अशी केली. मात्र एनडीएच्या घटक पक्षांना एकत्र ठेवण्यात तेही अपयशी ठरले आहेत. निवडणुकीला थोडे दिवस उरल्याने जुन्या मित्रपक्षांना जवळ आणण्यात भाजपाची दमछाक सुरू आहे.स्थिती चांगली नसल्याचा खासगीत खुलासा- भाजपाला २0१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत २८२ जागा मिळाल्या तर सहयोगी पक्षांना ५४ जागा मिळाल्यामुळे एनडीएचे संख्याबळ ३३५ पर्यंत पोहोचले. यंदा एनडीएची स्थिती मजबूतनाही हे सत्ताधारी आघाडीचे खासदारही खासगीत सांगत आहेत.- एनडीएतून तेलगू देशम व कुशवाहांचा रालोसपा बाहेर पडले. शिवसेना, अकाली दल, अपना दल यांचेही भाजपाशी संबंध २0१४ इतके सौहार्दाचे राहिलेले नाहीत. गुरूद्वारा प्रकरणात हस्तक्षेपाबाबत अकाली दलाने अल्टिमेटम देत भाजपावर डोळे वटारले आहेत.- महाराष्ट्रात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही ‘आम्हाला कोणाकडूनही जागांची भीक नको, पूर्वीही आम्ही स्वतंत्र लढलोहोतो, यापुढेही लढायची तयारी आहे’, असे इशारे देत आहेत.

टॅग्स :BJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९