शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

विरोधी पक्ष एकत्र येत असताना भाजपाप्रणीत आघाडीत अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 05:55 IST

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीत सर्वच पक्षांचे खासदार आपापल्या नफा नुकसानीचा अंदाज घेत आहेत. काहींनी लढाईचे रणशिंग फुंकले आहे, तर काही पक्षांना जागावाटपाचा तिढा सुटण्याची प्रतीक्षा आहे.

- सुरेश भटेवरानवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीत सर्वच पक्षांचे खासदार आपापल्या नफा नुकसानीचा अंदाज घेत आहेत. काहींनी लढाईचे रणशिंग फुंकले आहे, तर काही पक्षांना जागावाटपाचा तिढा सुटण्याची प्रतीक्षा आहे. मात्र, त्याआधी मोदींवर आक्रमक हल्ले चढवीत राहुल गांधी प्रकाशात आले आणि गेल्या काही दिवसांत ममता बॅनर्जी, मायावती व अखिलेश यादवांनीही साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतले आहे.उत्तरप्रदेशात सप बसपची आघाडी भाजपला भुईसपाट करायला सरसावली आहे तर पाटण्यात काँग्रेसने आयोजित केलेल्या रॅलीनंतर बिहारमधे लालूप्रसाद व काँग्रेस आघाडीला यंदा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. बंगालमधे सीबीआयच्या अतिउत्साही कारवाईला ‘बंगाल विरुद्ध दिल्ली’ असे स्वरूप देण्यात ममता यशस्वी झाल्या. बहुतांश विरोधी पक्ष त्यांच्या पाठिशी उभे राहिले. अशा नाट्यपूर्ण घटनामुळे यंदाची निवडणूक केवळ पंतप्रधान मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी नसून त्रिशंकू लोकसभेची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या निवासस्थानी येणाºया विरोधी नेत्यांच्या चर्चेतून हाच सूर ऐकू येत आहे.माजी मुख्यमंत्री नारायण राणे तांत्रिकदृष्ट्या भाजपच्या जाहीरनामा समितीचे सदस्य आहेत. मात्र आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष यंदा स्वतंत्रपणे निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. एकूणच मोदी-शहा यांच्या जोडीला रालोआच्या घटक पक्षांना सांभाळता आले नसल्याचे दिसत आहे. पंतप्रधान मोदींनी विरोधकांच्या महाआघाडीची संभावना ‘महाभेसळ’ अशी केली. मात्र एनडीएच्या घटक पक्षांना एकत्र ठेवण्यात तेही अपयशी ठरले आहेत. निवडणुकीला थोडे दिवस उरल्याने जुन्या मित्रपक्षांना जवळ आणण्यात भाजपाची दमछाक सुरू आहे.स्थिती चांगली नसल्याचा खासगीत खुलासा- भाजपाला २0१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत २८२ जागा मिळाल्या तर सहयोगी पक्षांना ५४ जागा मिळाल्यामुळे एनडीएचे संख्याबळ ३३५ पर्यंत पोहोचले. यंदा एनडीएची स्थिती मजबूतनाही हे सत्ताधारी आघाडीचे खासदारही खासगीत सांगत आहेत.- एनडीएतून तेलगू देशम व कुशवाहांचा रालोसपा बाहेर पडले. शिवसेना, अकाली दल, अपना दल यांचेही भाजपाशी संबंध २0१४ इतके सौहार्दाचे राहिलेले नाहीत. गुरूद्वारा प्रकरणात हस्तक्षेपाबाबत अकाली दलाने अल्टिमेटम देत भाजपावर डोळे वटारले आहेत.- महाराष्ट्रात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही ‘आम्हाला कोणाकडूनही जागांची भीक नको, पूर्वीही आम्ही स्वतंत्र लढलोहोतो, यापुढेही लढायची तयारी आहे’, असे इशारे देत आहेत.

टॅग्स :BJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९