शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

विरोधी पक्ष एकत्र येत असताना भाजपाप्रणीत आघाडीत अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 05:55 IST

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीत सर्वच पक्षांचे खासदार आपापल्या नफा नुकसानीचा अंदाज घेत आहेत. काहींनी लढाईचे रणशिंग फुंकले आहे, तर काही पक्षांना जागावाटपाचा तिढा सुटण्याची प्रतीक्षा आहे.

- सुरेश भटेवरानवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीत सर्वच पक्षांचे खासदार आपापल्या नफा नुकसानीचा अंदाज घेत आहेत. काहींनी लढाईचे रणशिंग फुंकले आहे, तर काही पक्षांना जागावाटपाचा तिढा सुटण्याची प्रतीक्षा आहे. मात्र, त्याआधी मोदींवर आक्रमक हल्ले चढवीत राहुल गांधी प्रकाशात आले आणि गेल्या काही दिवसांत ममता बॅनर्जी, मायावती व अखिलेश यादवांनीही साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतले आहे.उत्तरप्रदेशात सप बसपची आघाडी भाजपला भुईसपाट करायला सरसावली आहे तर पाटण्यात काँग्रेसने आयोजित केलेल्या रॅलीनंतर बिहारमधे लालूप्रसाद व काँग्रेस आघाडीला यंदा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. बंगालमधे सीबीआयच्या अतिउत्साही कारवाईला ‘बंगाल विरुद्ध दिल्ली’ असे स्वरूप देण्यात ममता यशस्वी झाल्या. बहुतांश विरोधी पक्ष त्यांच्या पाठिशी उभे राहिले. अशा नाट्यपूर्ण घटनामुळे यंदाची निवडणूक केवळ पंतप्रधान मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी नसून त्रिशंकू लोकसभेची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या निवासस्थानी येणाºया विरोधी नेत्यांच्या चर्चेतून हाच सूर ऐकू येत आहे.माजी मुख्यमंत्री नारायण राणे तांत्रिकदृष्ट्या भाजपच्या जाहीरनामा समितीचे सदस्य आहेत. मात्र आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष यंदा स्वतंत्रपणे निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. एकूणच मोदी-शहा यांच्या जोडीला रालोआच्या घटक पक्षांना सांभाळता आले नसल्याचे दिसत आहे. पंतप्रधान मोदींनी विरोधकांच्या महाआघाडीची संभावना ‘महाभेसळ’ अशी केली. मात्र एनडीएच्या घटक पक्षांना एकत्र ठेवण्यात तेही अपयशी ठरले आहेत. निवडणुकीला थोडे दिवस उरल्याने जुन्या मित्रपक्षांना जवळ आणण्यात भाजपाची दमछाक सुरू आहे.स्थिती चांगली नसल्याचा खासगीत खुलासा- भाजपाला २0१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत २८२ जागा मिळाल्या तर सहयोगी पक्षांना ५४ जागा मिळाल्यामुळे एनडीएचे संख्याबळ ३३५ पर्यंत पोहोचले. यंदा एनडीएची स्थिती मजबूतनाही हे सत्ताधारी आघाडीचे खासदारही खासगीत सांगत आहेत.- एनडीएतून तेलगू देशम व कुशवाहांचा रालोसपा बाहेर पडले. शिवसेना, अकाली दल, अपना दल यांचेही भाजपाशी संबंध २0१४ इतके सौहार्दाचे राहिलेले नाहीत. गुरूद्वारा प्रकरणात हस्तक्षेपाबाबत अकाली दलाने अल्टिमेटम देत भाजपावर डोळे वटारले आहेत.- महाराष्ट्रात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही ‘आम्हाला कोणाकडूनही जागांची भीक नको, पूर्वीही आम्ही स्वतंत्र लढलोहोतो, यापुढेही लढायची तयारी आहे’, असे इशारे देत आहेत.

टॅग्स :BJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९