शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

...जेव्हा ममता बॅनर्जी भाजपच्या कार्यालयाचा घेतात ताबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 12:39 IST

लोकसभा निवडणुकीत भाजप आणि तृणमूल कॉंग्रेस यांच्यातील राजकीय युद्ध व हिंसाचाराच्या घटनेने पश्चिम बंगाल चर्चेत आले होते.

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल कांग्रेसच्या अध्यक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील राजकीय वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आता थेट एकमेकांचे पक्ष कार्यालय त्याब्यात घेण्यासाठी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मारामारीवर उतरले आहेत. तृणमूल कांग्रेसच्या कार्यालयावर भाजपने आपले कार्यालय थाटले असल्याचा दावा तृणमूल कांग्रेसकडून करण्यात येत आहे. शुक्रवारी ममता बॅनर्जी यांनी भाजपचे कार्यालायचे  कुलूप तोडून आपल्या त्याब्यात घेत, तिथे आपल्या पक्षाचे कार्यालय सुरु केलं. उत्तर २४ परगना येथील ही घटना आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजप आणि तृणमूल कॉंग्रेस यांच्यातील राजकीय युद्ध व हिंसाचाराच्या घटनेने पश्चिम बंगाल चर्चेत आले होते. निवडणुका संपल्यानंतर ही येथील राजकीय युद्ध थांबताना दिसत नाही. आता तर दोन्ही पक्षातील कार्यकर्ते एकेमेकांचे पक्ष कार्यालायचा ताबा मिळवण्यासाठी हाणामारीवर उतरले असल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. त्यातच, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी उत्तर 24 परगना येथील भाजपच्या कार्यालयाचे कुलूप तोडून आपल्या त्याब्यात घेतले. भाजपच्या कार्यालयवरील  भाजपचे चिन्ह आणि भगवा कलर मिटवण्याचे आदेश दिले. त्यांनतर त्यांनी स्वतः आपल्या पक्षाचे चिन्ह काढत भाजपच्या त्या कार्यालयाला आपल्या पक्षाचे नाव दिले.

दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये 'जय श्री राम' ह्या घोषणांमुळे राजकीय वातावरण तापत असताना पहायला मिळत आहे.'जय श्री राम'च्या घोषणा देणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भडकल्या असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, आता, त्याला उत्तर देत भाजपकडून 'जय श्री राम' लिहलेले 10 लाख पोस्टकार्ड ममतांना पाठवले जाणार आहेत. तर, ममता बॅनर्जी यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, असा टोला भाजपकडून लगावण्यात आला आहे.

भाजप आणि ममता यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. पश्चिम बंगालमधील अमित शहां यांच्या रोड शो मध्ये झालेल्या राड्यानंतर हे वाद अधिकच पेटले होते. त्यामुळे येणाऱ्या काळात हे राजकीय युद्ध अधिकच पेटणार असल्याचे दिसत आहे.