शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

...जेव्हा ममता बॅनर्जी भाजपच्या कार्यालयाचा घेतात ताबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 12:39 IST

लोकसभा निवडणुकीत भाजप आणि तृणमूल कॉंग्रेस यांच्यातील राजकीय युद्ध व हिंसाचाराच्या घटनेने पश्चिम बंगाल चर्चेत आले होते.

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल कांग्रेसच्या अध्यक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील राजकीय वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आता थेट एकमेकांचे पक्ष कार्यालय त्याब्यात घेण्यासाठी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मारामारीवर उतरले आहेत. तृणमूल कांग्रेसच्या कार्यालयावर भाजपने आपले कार्यालय थाटले असल्याचा दावा तृणमूल कांग्रेसकडून करण्यात येत आहे. शुक्रवारी ममता बॅनर्जी यांनी भाजपचे कार्यालायचे  कुलूप तोडून आपल्या त्याब्यात घेत, तिथे आपल्या पक्षाचे कार्यालय सुरु केलं. उत्तर २४ परगना येथील ही घटना आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजप आणि तृणमूल कॉंग्रेस यांच्यातील राजकीय युद्ध व हिंसाचाराच्या घटनेने पश्चिम बंगाल चर्चेत आले होते. निवडणुका संपल्यानंतर ही येथील राजकीय युद्ध थांबताना दिसत नाही. आता तर दोन्ही पक्षातील कार्यकर्ते एकेमेकांचे पक्ष कार्यालायचा ताबा मिळवण्यासाठी हाणामारीवर उतरले असल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. त्यातच, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी उत्तर 24 परगना येथील भाजपच्या कार्यालयाचे कुलूप तोडून आपल्या त्याब्यात घेतले. भाजपच्या कार्यालयवरील  भाजपचे चिन्ह आणि भगवा कलर मिटवण्याचे आदेश दिले. त्यांनतर त्यांनी स्वतः आपल्या पक्षाचे चिन्ह काढत भाजपच्या त्या कार्यालयाला आपल्या पक्षाचे नाव दिले.

दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये 'जय श्री राम' ह्या घोषणांमुळे राजकीय वातावरण तापत असताना पहायला मिळत आहे.'जय श्री राम'च्या घोषणा देणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भडकल्या असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, आता, त्याला उत्तर देत भाजपकडून 'जय श्री राम' लिहलेले 10 लाख पोस्टकार्ड ममतांना पाठवले जाणार आहेत. तर, ममता बॅनर्जी यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, असा टोला भाजपकडून लगावण्यात आला आहे.

भाजप आणि ममता यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. पश्चिम बंगालमधील अमित शहां यांच्या रोड शो मध्ये झालेल्या राड्यानंतर हे वाद अधिकच पेटले होते. त्यामुळे येणाऱ्या काळात हे राजकीय युद्ध अधिकच पेटणार असल्याचे दिसत आहे.