शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

...जेव्हा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले 'मी शिकलेला अध्यक्ष आहे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 19:34 IST

लोकसभेच्या सुरू असलेल्या अधिवेशनात आज एक वेगळाच किस्सा घडला आहे.

नवी दिल्ली : लोकसभेच्या सुरू असलेल्या अधिवेशनात आज एक वेगळाच किस्सा घडला आहे. लोकसभेच्या अध्यक्षांनाच ते शिकलेले आहेत असे सांगावे लागले आहे. 

आपचे खासदार भगवंत मान यांनी लोकसभेमध्ये दुसऱ्या देशांमधील भारतीय दुतावासांतील भारतीयांना कोणत्या समस्या आहेत, याबाबत बोलण्यास सुरूवात केली. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान यांना बसण्यास सांगितले. त्यांनी सांगितले की, शून्य प्रहरामध्ये जर तुम्ही विषय बदलणार असाल तर आधी माझी परवानगी घ्यावी लागेल. तुम्हाला पंजाबमधील शिक्षकांच्या पगाराबाबत बोलण्यासाठी विषय दिला होता. मी शिकलेला अध्यक्ष आहे. जर कोणी खासदार शून्य प्रहरात विषय बदलत असेल तर माझी परवानगी घ्यावी. 

यानंतर मान यांनी पुन्हा उभे राहत अध्यक्षांकडे परवानगी मागितली. बिर्ला यांनी परवानगी दिली. बिर्ला यांनी आज सलग साडेतीन तास बसून कामकाज पाहिले. यासाठी त्यांना खासदारांनी शाबासकीही दिली. त्यांनी नवीन सदस्यांसह जास्तीत जास्त खासदारांना बोलण्याची संधी दिली आहे. 

संसदेत दोन्ही सभागृहांमध्ये प्रश्नोत्तराच्या तासानंतर लगेचच शून्य प्रहराची वेळ असते. हा वेळ 12 पासून 1 वाजेपर्यंत असतो. दुपारी 12 वाजता सुरु झाल्याने यास शून्य प्रहर म्हटले जाते. शून्य प्रहराची सुरूवात 1960 च्या दशकात झाली. यामध्ये पूर्वसूचना न दिलेले पण उशिर न करण्यासारखे महत्वाचे विषय चर्चेस घेतले जातात. हे विषय दहा दिवसांच्या आगाऊ सूचनेशिवाय मांडले जातात.  हे अधिवेशन 26 जुलैपर्यंत चालणार आहे.  

टॅग्स :om birlaओम बिर्लाlok sabhaलोकसभाAAPआप