शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 13:55 IST

याआधीही हिंदी आणि मराठी भाषेवरून अविमुक्तेश्वरानंद यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला होता

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठी विरुद्ध हिंदी भाषिक वाद सुरू आहेत. त्यातच मराठी भाषेवरून शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केलेले विधान चर्चेत आले आहे. मराठी भाषेच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यावेळी महाराष्ट्र अस्तित्वात नव्हता असं वक्तव्य अविमुक्तेश्वरानंद यांनी केले आहे. 

अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले की, मराठी भाषा आणि हिंदी भाषेला कधी राजभाषा म्हणून मान्यता मिळाली हे आपण पाहिले तर, ज्या संविधानात आज आपण राहतोय, त्यात हिंदी भाषेला आधी मान्यता दिली. देशाची राजभाषा म्हणून हिंदीला मंजुरी मिळाली. तेव्हा महाराष्ट्र प्रदेशच नव्हता. १९६० साली जेव्हा महाराष्ट्र बनला तेव्हा मराठीला महाराष्ट्राची राज्यभाषा घोषित केले गेले. 

तर  दहशतवादाला कोणताही रंग नसतो, तो दहशतवादच असतो. दहशतवादी येतात आणि घटना घडवून निघून जातात. तुम्ही दोषींना शोधू शकत नाही. मुंबईत ७ बॉम्बस्फोट झाले, पण तुम्ही आरोपींना शोधू शकले नाहीत. मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला, तुम्हाला आरोपी शोधता आले नाही असं म्हणत अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी तपास यंत्रणा आणि सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले. 

दरम्यान, भगवा दहशतवादी असला म्हणून त्याची पूजा करणार का? दहशतवाद हा दहशतवादीच असतो. रंग माणसांच्या जीवनात असतो, जेव्हा माणूस मरतो तेव्हा रंग निघून जातो. मेलेल्या माणसांचे फोटोही कलर ठेवत नाहीत, ते ब्लॅक अँन्ड व्हाईट केले जातात. फ्लॅशब्लॅक दाखवतानाही काळ्या रंगाचा दाखवतात. त्यामुळे दहशतवादाला रंग नसतो. दहशतवादामध्ये रंग शोधत असतात, ते दहशतवादाबद्दल पक्षपाती आहेत असा आरोपही अविमुक्तेश्वरानंद यांनी केला. 

ठाकरे कुटुंबावरही साधला होता निशाणा 

याआधीही हिंदी आणि मराठी भाषेवरून अविमुक्तेश्वरानंद यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला होता. आज जे लोक मराठीचा आग्रह धरत आहेत, त्यांचा इतिहास सर्वांसमोर आहे. त्यांच्याच पूर्वजांनी आपले चरित्र लिहिले आहे, आपल्या कुटुंबाचा इतिहास लिहिला आहे. ठाकरे महाराष्ट्राच्या बाहेरून आले होते. ठाकरे मगधमधून आले होते. तेव्हा तेही मराठी नव्हते. त्यांनाही मराठी येत नव्हती. तेव्हा महाराष्ट्राने त्यांना स्वीकारले. मगध येथून आलेल्या कुटुंबाचा स्वीकार केला. त्यांना मोठे मराठी भाषिक केले आणि तेच आता मराठीसाठी लढा देत आहेत. मगध येथील मागधी भाषा विसरले आणि मराठी स्मरणात राहिली. महाराष्ट्रातील लोकांनी आपल्या पूर्वजांना प्रेम दिले. ते आपण पुढे का नेत नाहीत. लोकांना एवढे प्रेम द्या की ते त्यांची भाषा विसरून मराठी स्वीकारतील. हा मार्ग तुम्ही का स्वीकारत नाही असा प्रश्न शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केला होता.

टॅग्स :hindiहिंदीmarathiमराठी