शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 13:55 IST

याआधीही हिंदी आणि मराठी भाषेवरून अविमुक्तेश्वरानंद यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला होता

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठी विरुद्ध हिंदी भाषिक वाद सुरू आहेत. त्यातच मराठी भाषेवरून शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केलेले विधान चर्चेत आले आहे. मराठी भाषेच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यावेळी महाराष्ट्र अस्तित्वात नव्हता असं वक्तव्य अविमुक्तेश्वरानंद यांनी केले आहे. 

अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले की, मराठी भाषा आणि हिंदी भाषेला कधी राजभाषा म्हणून मान्यता मिळाली हे आपण पाहिले तर, ज्या संविधानात आज आपण राहतोय, त्यात हिंदी भाषेला आधी मान्यता दिली. देशाची राजभाषा म्हणून हिंदीला मंजुरी मिळाली. तेव्हा महाराष्ट्र प्रदेशच नव्हता. १९६० साली जेव्हा महाराष्ट्र बनला तेव्हा मराठीला महाराष्ट्राची राज्यभाषा घोषित केले गेले. 

तर  दहशतवादाला कोणताही रंग नसतो, तो दहशतवादच असतो. दहशतवादी येतात आणि घटना घडवून निघून जातात. तुम्ही दोषींना शोधू शकत नाही. मुंबईत ७ बॉम्बस्फोट झाले, पण तुम्ही आरोपींना शोधू शकले नाहीत. मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला, तुम्हाला आरोपी शोधता आले नाही असं म्हणत अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी तपास यंत्रणा आणि सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले. 

दरम्यान, भगवा दहशतवादी असला म्हणून त्याची पूजा करणार का? दहशतवाद हा दहशतवादीच असतो. रंग माणसांच्या जीवनात असतो, जेव्हा माणूस मरतो तेव्हा रंग निघून जातो. मेलेल्या माणसांचे फोटोही कलर ठेवत नाहीत, ते ब्लॅक अँन्ड व्हाईट केले जातात. फ्लॅशब्लॅक दाखवतानाही काळ्या रंगाचा दाखवतात. त्यामुळे दहशतवादाला रंग नसतो. दहशतवादामध्ये रंग शोधत असतात, ते दहशतवादाबद्दल पक्षपाती आहेत असा आरोपही अविमुक्तेश्वरानंद यांनी केला. 

ठाकरे कुटुंबावरही साधला होता निशाणा 

याआधीही हिंदी आणि मराठी भाषेवरून अविमुक्तेश्वरानंद यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला होता. आज जे लोक मराठीचा आग्रह धरत आहेत, त्यांचा इतिहास सर्वांसमोर आहे. त्यांच्याच पूर्वजांनी आपले चरित्र लिहिले आहे, आपल्या कुटुंबाचा इतिहास लिहिला आहे. ठाकरे महाराष्ट्राच्या बाहेरून आले होते. ठाकरे मगधमधून आले होते. तेव्हा तेही मराठी नव्हते. त्यांनाही मराठी येत नव्हती. तेव्हा महाराष्ट्राने त्यांना स्वीकारले. मगध येथून आलेल्या कुटुंबाचा स्वीकार केला. त्यांना मोठे मराठी भाषिक केले आणि तेच आता मराठीसाठी लढा देत आहेत. मगध येथील मागधी भाषा विसरले आणि मराठी स्मरणात राहिली. महाराष्ट्रातील लोकांनी आपल्या पूर्वजांना प्रेम दिले. ते आपण पुढे का नेत नाहीत. लोकांना एवढे प्रेम द्या की ते त्यांची भाषा विसरून मराठी स्वीकारतील. हा मार्ग तुम्ही का स्वीकारत नाही असा प्रश्न शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केला होता.

टॅग्स :hindiहिंदीmarathiमराठी