शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

Indian Railways : रेल्वेचं तिकीट बुक करताना 'या' महत्वाच्या गोष्टीवर ठेवा लक्ष!; रेल्वेनं केलं अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 13:45 IST

रेल्वेच्या वेळेसंदर्भात माहिती देण्यासाठी रेल्वेने संबंधित प्रवाशाच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर रेल्वेच्या वेळेत झालेल्या बदलांचा SMS पाठवणेही सुरू केले आहे.

ठळक मुद्देरेल्वे प्रवास करण्यासाठी तिकीट बुक करताना आवश्यक माहितीसह मोबाईल नंबर टाकायला विसरू नका.भारतीय रेल्वेकडून रेल्वेच्या वेळापत्रकात बदल केला जात आहे. ज्या कोलांनी तिकीट बुक करताना आपला नंबर दिलेला नाही, त्यांना रेल्वेच्या वेळापत्रकात करण्यात आलेल्या बदलाची माहिती मिळू शकत नाही.

नवी दिल्ली -रेल्वे प्रवास करण्यासाठी तिकीट बुक करताना आवश्यक माहितीसह मोबाईल नंबर टाकायला विसरू नका. भारतीय रेल्वेने (Indian Railways) यासंदर्भात प्रवाशांना सूचना दिल्या आहेत. रेल्वे तिकीट घेताना संपूर्ण माहिसीसह आपला मोबाईल नंबरही टाका. जेणे करून रेल्वेकडून देण्यात येणारे अपडेट मिळण्यास आपल्याला त्रास होणार नाही, असे रेल्वेने म्हटले आहे.

भारतीय रेल्वेकडून रेल्वेच्या वेळापत्रकात बदल केला जात आहे. यामुळे ज्या कोलांनी तिकीट बुक करताना आपला नंबर दिलेला नाही, त्यांना रेल्वेच्या वेळापत्रकात करण्यात आलेल्या बदलाची माहिती मिळू शकत नाही. अशात प्रवाशांना ट्रेन सुटण्यासारख्या त्रासालाही सामोरे जावे लागू शकते. रेल्वेच्या वेळेसंदर्भात माहिती देण्यासाठी रेल्वेने संबंधित प्रवाशाच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर रेल्वेच्या वेळेत झालेल्या बदलांचा SMS पाठवणेही सुरू केले आहे.

रेल्वेकडून सांगण्यात आले आहे, की काही प्रवासी एजन्ट्सच्या माध्यमाने तिकीट बुक करतात. यामुळे अनेक वेळा पीआरएस सिस्टिममध्ये प्रवाशांचा मोबाईल नंबर उपब्ध नसल्याने असुविधा निर्माण होते. यामुळे रेल्वेने एखाद्या रेल्वेची वेळ बदलली अथवा एखादी रेल्वे रद्द केली तर त्याची माहिती प्रवाशांना एसएमएसच्या माध्यमाने मिळू शकत नाही. यामुळे त्यांना अनेक वेळा त्रास सहन करावा लागतो.

रेल्वेने प्रवाशांना विनंती केली आहे, की प्रवासासाठी तिकीट बुक करताना रिझर्व्हेशन फॉर्ममध्ये मोबाईल नंबर लिहावा. जेनेकरून रेल्वेसंदर्भातील महत्वाची माहिती एसएमएसच्या माध्यमाने मिळू शकेल. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेpassengerप्रवासी