शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
5
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
6
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
7
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
8
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
9
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
10
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
11
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
12
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
13
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
14
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
15
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
16
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
17
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
18
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
19
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
20
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते

क्या बात है...  कुटुंबात 5 मुली, 3 IAS-IRS अधिकारी तर 2 इंजिनिअर

By महेश गलांडे | Updated: December 12, 2020 17:13 IST

उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील चंद्रसेन सागर आणि मीना देवी यांना पहिले कन्यारत्न प्राप्त झाले. त्यानंतर, एका पाठोपाठ एक अशा 5 मुली कुटुंबात जन्मास आल्या.

ठळक मुद्देफरीदपूर तालुक्यातील या कुटुंबात 5 मुलींचा जन्म झाल्यानंतरही आनंद होता. पण, गावातील आणि समाजातील काही लोकांकडून मुलींच्या जन्मामुळे टोमणे मारण्यात येत होते

बरेली - मुलगी नको मुलगा पाहिजे, वंशाला दिवा पाहिजे, अशी धारणा समाजामध्ये आहे. मुलाच्या जन्मासाठी आजही महिलांना दोन पेक्षा जास्त अपत्यांना जन्म द्यावा लागतो. स्त्री भ्रूण हत्यासारख्या घटना आजही आपल्या समाजात घडताना दिसत आहे. मात्र, उत्तर प्रदेशातील एका कुटुंबांतील मुलींनी मुलीही मुलांपेक्षा कमी नाहीत, मुलीही मुलांप्रमाणेच, त्यांच्यापेक्षाही मोठं यश मिळवू शकतात हे दाखवून दिलंय. येथील एकाच कुटुंबातील 5 मुलींपैकी 2 आयएएस अधिकारी व 1 मुलगी आयआरएस अधिकारी आहेत. तर, उर्वरीत दोन मुली इंजिनिअर बनून नोकरी करत आहेत. 

उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील चंद्रसेन सागर आणि मीना देवी यांना पहिले कन्यारत्न प्राप्त झाले. त्यानंतर, एका पाठोपाठ एक अशा 5 मुली कुटुंबात जन्मास आल्या. फरीदपूर तालुक्यातील या कुटुंबात 5 मुलींचा जन्म झाल्यानंतरही आनंद होता. पण, गावातील आणि समाजातील काही लोकांकडून मुलींच्या जन्मामुळे टोमणे मारण्यात येत होते. 5 मुली झाल्यामुळे समाज व नातेवाईकांकडून खासगीत बोलताना, काय मुलींना आयएएस बनवणार आहात का? असंही बोललं जात. मात्र, कुटुंबीयांनी मुलींना उच्च शिक्षण देत ते खरं करुन दाखवलं. चंद्रसेन यांच्या 5 पैकी तीन मुलींनी युपीएससी परीक्षा पास केली आहे. 

चंद्रसेन सागर यांच्या 5 मुलींपैकी 3 मुलींनी युपीएससी परीक्षा पास केली असून दोन मुली आयएएस अधिकारी आहेत. तर, तिसरी मुलगी आयआरएस अधिकारी आहे. विशेष म्हणजे इतर दोन मुलींनीही इंजिनिअरची पदवी घेतली असून त्याही इंजिनिअर बनल्या आहेत. मुलींच्या आयएएस बनण्यात मुलींनी घेतलेल्या कष्टाचे आणि तिच्या आईने दिलेल्या काबाडकष्टाचं मोठं योगदान असल्याचं वडिल चंद्रसेन सागर यांनी म्हटलं. 

चंद्रसेन यांच्या मुलींच्या शिक्षणाची सुरुवात बरेली येथील सेंट मारिय कॉलेजमधून झाली. त्यानंतर, उत्तराखंड, इलाहाबाद आणि दिल्ली येथे जाऊन पुढील उच्च शिक्षण घेतले. तिन्ही बहिणींनी दिल्लीत राहून आपलं युपीएससी स्पर्धा परिक्षेचं शिक्षण घेतलं. चंद्रसेन यांची पहिली मुलगी अर्जित 2009 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली. त्यानंतर, मुंबईतील जॉईंट कमिश्नर कस्टम कार्यालयात रुजू झाली. अर्जित यांचे लग्न आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे झाली असून तिचे पतीही आयएएस अधिकारी आहेत. 6 वर्षानंतर म्हणजेच 2015 मध्ये चंद्रसेन यांच्या दुसऱ्या मुलीनेही आयएएस परीक्षा उत्तीर्ण केली. अर्पित असं तिचे नाव असून त्या सध्या वालसाड येथे डीडीओ पदावर कार्यरत आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या नंबरच्या दोन्ही मुली इंजिनिअर असून त्या मुंबई आणि दिल्लीत जॉब करत आहेत. 

चंद्रसेन आणि मीना यांच्या 5 व्या नंबरच्या मुलीनेही युपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे. आकृतीने 2016 साली दुसऱ्या प्रयत्नात ही परीक्षा पास केली. सध्या ती पाणी महामंडळाच्या संचालपदी रुजू आहेत. चंद्रसेन यांच्या मुलींना त्यांच्या मामापासूनच युपीएससी परीक्षा देण्याची प्रेरणा मिळाली. त्यांचे मामा अनिल कुमार हे 1995 सालच्या युपीएससी परीक्षेतून आयपीएस अधिकारी बनले होते. त्यामुळे, आपणही आपल्या मामाप्रमाणेच मोठं अधिकारी व्हायचं असं स्वप्न या मुलींनी पाहिलं होतं. मामा अनिल कुमार यांनीही आपल्या भाच्चींना मदत आणि मार्गदर्शन केले, त्यामुळेच मुलींनीही आई-वडिलांचं आणि त्यांचं स्वप्न सत्यात उतरवून दाखवलं.  

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगUttar Pradeshउत्तर प्रदेशWomenमहिलाexamपरीक्षा