शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

स्वत:चे नाव काय असावे, हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार - केरळ हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 23:14 IST

नाव ही व्यक्तीची अभिव्यक्ती; वाजवी कारणाखेरीज सरकार त्यात अडथळे आणू शकत नाही

कोची : स्वत:ला काही तरी नाव असणे आणि ते नाव आपल्याला हव्या त्या प्रकारे जगापुढे व्यक्त करणे हा भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि आयुष्य स्वत:ला हवे तसे जगण्याच्या मूलभूत अधिकाराचाच एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीस आपले नाव बदलायचे असेल तर सरकार, रास्त व वाजवी कारणाखेरीज, त्यात अडथळे आणू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे.

कशिश गुप्ता या विद्यार्थिनीने केलेल्या याचिकेवर हा निकाल देताना न्या. बेचू कुरियन थॉमस यांनी म्हटले की, चार शतकांपूर्वी विल्यम शेक्सपिअरने ‘रोमिओ अ‍ॅण्ड ज्युलिएट’ या त्याच्या नाटकात ‘नावात काय विशेष आहे?’ असा प्रश्न उपस्थित केला होता; पण आताच्या काळात हाच प्रश्न विचारला तर ‘नावातच सर्व काही आहे’ असे त्याचे उत्तर द्यावे लागेल.

न्यायालयाने म्हटले की, स्वत:चे नाव ही प्रत्येक व्यक्तीची अगदी खासगी बाब असते. नावातून त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, ओळख व वेगळेपण व्यक्त होत असते. कोणतीही व्यक्ती तिच्या नावानेच जगापुढे जात असते. व्यक्तीच्या सामाजिक व्यवहारांचा तिचे नाव हाच पाया असतो. लोकशाहीमध्ये आपले नाव आपल्याला हवे त्या प्रकारे समाजापुढे अभिव्यक्त करणे हा त्या व्यक्तीचा मूलभूत अधिकार ठरतो. विद्यार्थिनीचे नाव बदलण्यास ‘सीबीएसई’ने का दिला नकार?कशिश गुप्ता ही ‘सीबीएसई’ची इयत्ता १२ वीची परीक्षा दिलेली विद्यार्थिनी आहे. इयत्ता १० वीपर्यंत कोची येथील चिन्मय विद्यालयात शिकत असताना तिचे नाव डिंकी गुप्ता असे होते. इयत्ता ११ वीची परीक्षा तिने डिंकी गुप्ता या नावानेच दिली; पण इयत्ता १२ वीच्या परीक्षेच्या आधी तिने स्वत:चे नाव कशिश असे बदलून घेतले. सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून नावातील हा बदल केरळ सरकारच्या राजपत्रात रीतसर प्रसिद्ध झाला.शाळेने त्यांच्या रेकॉर्डमध्ये तिचे नाव बदलले व तिला ‘सीबीएसई’कडून इयत्ता १२ वीच्या परीक्षेचे ‘हॉल तिकीट’ही या बदललेल्या नावाचे देण्यात आले. परंतु तिचे इयत्ता ११ वीचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका ‘डिंकी’ या जुन्याच नावाची होती. ती नव्या नावानुसार बदलून घेण्यासाठी तिने शाळेमार्फत अर्ज केला; परंतु एकदा निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याही परीक्षेच्या प्रमाणपत्रातील व गुणपत्रिकेतील नाव बदलता येत नाही, या नियमावर बोट ठेवून ‘सीबीएसई’ने नाव बदलण्यास नकार दिला.12 वीचा निकाल लवकरच जाहीर होईल व कशिशला पुढील प्रवेशासाठी सर्व प्रमाणपत्रे व गुणपत्रिका द्याव्या लागतील. नावातील तफावतीमुळे तिला खूप अडचणी येतील, हे लक्षात घेऊन न्यायालयाने उन्हाळी सुटी व ‘लॉकडाऊन’ असूनही तिच्या याचिकेवर तातडीने ‘व्हिडिओ सुनावणी’ घेऊन वरीलप्रमाणे निकाल दिला. ‘सीबीएसई’ने कशिशला सुधारित नावाचे प्रमाणपत्र व गुणपत्रक सहा आठवड्यांत जारी करावे, असा आदेश दिला गेला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय