शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
3
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
4
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
5
सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
6
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
9
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
10
Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल
11
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
12
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
13
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
14
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
15
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
16
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
17
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
18
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
19
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
20
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?

तुमची बांधिलकी किती ? एअर इंडियाच्या वैमानिकाने खासदाराला सुनावलं

By admin | Updated: December 29, 2016 12:38 IST

एअर इंडियाच्या शुभाशीष मजूमदार यांनी उड्डाणमंत्री गजपती राजू यांना पत्र पाठवून खासदारांच्या बांधिलकीवर प्रश्चचिन्ह उपस्थित केलं आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - एअर इंडियाच्या एका वरिष्ठ वैमानिकाने खासदारांच्या बांधिलकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री अशोक गजपती राजू यांनी एअर इंडियाच्या कर्मचा-यांच्या बांधिलकीमध्ये काहीतरी कमतरता आहे, ज्यामुळे खासगी एअरलाइन्सपेक्षा ते मागे आहेत असं वक्तव्य करत नाराजी व्यक्त केली होती.. गजपती राजू यांच्या या वक्तव्यावर नाराज झालेल्या एअर इंडियाच्या शुभाशीष मजूमदार यांनी गजपती राजू यांना पत्र पाठवून खासदारांच्या बांधिलकीवर प्रश्चचिन्ह उपस्थित केलं आहे. 
 
 
या पत्राला 'Lagging In Inspiration, Not Commitment' म्हणजेच 'प्रेरणेची कमतरता आहे, बांधिलकीची नाही' असं शिर्षक देण्यात आलं आहे. 'एअर इंडियाचा एक वचनबद्द कर्मचारी, प्रामाणिक टॅक्सपेअर आणि देशभक्त नागरिक असल्याच्या नात्याने एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांचं कामकाज पुर्णपणे अयशस्वी राहिलं. लोकसभेच्या कामकाजाचे 92 तास वाया गेले, मुश्किलीने काही काम झालं असेल. तुमच्या सहका-यांनी घोषणाबाजी करत, पोस्टर दाखवत, गोंधळ घालत कामकाजात अडथळा आणला', असं पत्रात लिहिण्यात आलं आहे. 
 
 
पत्रात पुढे लिहिण्यात आलं आहे की, 'इतर देशांशी तुलना करत आपल्या देशातील नेता बांधिलकीमध्ये खूप मागे असल्याचं पाहून आम्ही एअर इंडियाचे कर्मचारी खूप दुखी: आहोत'. 'जर आम्ही कर्मचारी नेते आणि खासदारांप्रमाणे वागलो असतो तर आमच्यावर लगेच निलंबनाची कारवाई नसती करण्यात आली, पण नक्कीच सुनावण्यात आलं असतं', असा टोला पत्रातून लगावण्यात आला आहे. 'देशाच्या एअरलाइन्सचे कर्मचारी आणि भारताचे नागरिक या नात्याने आम्ही अपेक्षा करतो की आमचे नेता आत्मपरिक्षण करतील आणि एक उदाहरण उभं करतील', अशी आशा शुभाशीष मजूमदार यांनी व्यक्त केली आहे.
 
एअर इंडियाच्या दुस-या कर्मचा-याने गजपती राजू यांच्या वक्तव्याला सकारात्मकपणे घेतलं पाहिजे, प्रवाशांच्या चांगल्या सोयींसाठी अजून प्रयत्न केले पाहिजेत असं म्हटलं आहे. तसंच गजपती राजू यांच्या वक्तव्यामुळे एअर इंडियाचे अनेक कर्मचारी नाराज असल्याचंही ते बोलले आहेत. एअर इंडियाने मात्र शुभाशीष मजूमदार यांचं हे वैयक्तिक मत असून यासंबंधी आम्हाला काहीच बोलायचं नसल्याचं सांगितलं आहे.
 
एअर इंडियाचे कर्मचारी प्रतिस्पर्धी विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेच्या तुलनेत मागे आहेत. कंपनी टिकून राहिली तरच नोकरी सुरक्षित राहील, अशा शब्दांत नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांनी संकेत दिले.
 
गजपती राजू म्हणाले, स्पर्धक कंपन्यांच्या काही कर्मचाऱ्यांनी दाखवलेली निष्ठा आणि एअर इंडियाच्या काही कर्मचाऱ्यांनी दाखवलेली निष्ठा यात काही अंतर आहे. ही संतुष्टता एअर इंडियातील नोकरीची काळजी नसण्याच्या भावनेतून निर्माण झाली आहे का असे विचारता गजपती राजू म्हणाले की नोकरीची हमी आहे पण जो पर्यंत एअर इंडिया टिकून आहे तोपर्यंतच. जेथे संस्था टिकून राहतात तेथेच नोकरीही टिकून राहते. जेव्हा संस्थाच राहात नाही तेव्हा तुमच्या नोकरीचे काय होणार असा प्रश्न त्यांनी विचारला होता.