शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

सीरियात सत्तापालट! २४ वर्षांनी असद सरकार कोसळल्यानं भारतावर काय परिणाम होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 14:43 IST

सीरियानेही काश्मीर प्रश्नावर भारताला पाठिंबा दिला आहे. सीरिया काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय असल्याचं सांगत होते. भारताने संयुक्त राष्ट्रात सीरियावर लादलेल्या निर्बंधांना पाठिंबा देण्यास नकार दिला होता. 

नवी दिल्ली - २४ वर्ष सत्तेत राहणाऱ्या बशर अल असदला सीरिया सोडून पळून जावं लागलं आहे. राष्ट्रपती असद त्यांच्या कुटुंबासह रशियाला आश्रयास गेले आहेत. २०११ पासून सीरियात असद यांच्याविरोधात बंड सुरू होते. आता सीरियात बंडखोरांनी कब्जा केला आहे. बंडखोर गटाचे तहरीर अल शाम यांनी २७ नोव्हेंबरला असद यांच्याविरोधात युद्ध पुकारलं होते. त्यानंतर ११ दिवसांत असद यांना सत्ता गमवावी लागली. सीरियाच्या सत्तेवर ५३ वर्षापासून असद कुटुंबाचं वर्चस्व राहिले होते. बशर अल असद यांच्या आधी त्यांचे वडील हाफिद अल असद यांनी २९ वर्ष सीरियात राज्य केले होते.

सीरियात असद सरकार कोसळल्याने याठिकाणचे राजकीय समीकरण बदलले आहे. त्यात अरब वर्ल्ड आणि मध्य पूर्व भारतासोबतच्य संबंधांवरही परिणाम होऊ शकतो. असद यांच्या सत्तेतून जाण्यामुळे भारतावर परिणाम होण्याचा अंदाज आहे कारण भारत आणि सीरिया यांच्यात ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध होते. बशर अल असद यांच्या सरकारने हे संबंध आणखी मजबूत केले होते. भारत आणि सीरिया यांच्यात कायम चांगले संबंध राहिलेत. सीरियात गृहयुद्धावेळी भारताने असद सरकार आणि बंडखोर या दोघांचा निषेध केला होता.

पॅलेस्टाईनचा मुद्दा आणि गोलान हाइट्सवरील सीरियाच्या दाव्याला भारताने आंतरराष्ट्रीय मंचांवर पाठिंबा दिला होता. सीरियानेही काश्मीर प्रश्नावर भारताला पाठिंबा दिला आहे. सीरिया काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय असल्याचं सांगत होते. भारताने संयुक्त राष्ट्रात सीरियावर लादलेल्या निर्बंधांना पाठिंबा देण्यास नकार दिला होता. कोविडच्या वेळी भारताने सीरियावर लादलेले निर्बंध शिथिल करण्याबद्दलही बोलले होते.गृह युद्धाच्या काळात जेव्हा जगभरातील देशांनी सीरियाला एकटे पाडले आणि अरब लीगमधूनही बाहेर काढले, तेव्हाही भारताने आपले संबंध कायम ठेवले आणि दमास्कसमध्ये आपला दूतावास कायम ठेवला.

सीरियाच्या विकासातही भारताने खूप मदत केली आहे. भारताने त्यांना त्याठिकाणी एका पॉवर प्लांटसाठी २४ कोटी डॉलर कर्ज दिले होते. भारताने आयटी पायाभूत सुविधांमध्येही गुंतवणूक केली आहे. याशिवाय भारताने स्टील प्लांट आणि तेल क्षेत्रातही पैसा गुंतवला आहे. त्यामुळे असाद शासनाचं पतन आणि त्यानंतरच्या अनिश्चिततेमुळे भारताच्या राजकीय, आर्थिक हितसंबंधांची चिंता वाढली आहे. सर्वात मोठा धोका हयात तहरीर अल-शाम (HTS) कडून आहे. एचटीएस ही कट्टर इस्लामिक संघटना आहे, ज्याला अनेक देशांनी दहशतवादी संघटना घोषित केले आहे. एचटीएसचा अल-कायदाशीही संबंध आहे. एचटीएसच्या वाढीमुळे सीरियामध्ये इस्लामिक स्टेटचा पुन्हा उदय होण्याचा धोकाही वाढला आहे.

भारतावर काय होणार परिणाम?

सीरियाच्या तेल क्षेत्रात भारताची दोन मोठी गुंतवणूक आहे. पहिला- ओएनजीसी आणि आयपीआर इंटरनॅशनल यांच्यात २००४ मध्ये करार झाला. दुसरे- सीरियातील कॅनेडियन फर्ममध्ये ओएनजीसी आणि चीनच्या सीएनपीसीचा ३७% हिस्सा. सीरियातील तिशरीन थर्मल पॉवर प्लांटच्या पुनर्रचनेसाठी भारताने २४ कोटी डॉलर्सचे क्रेडिट देखील दिले होते. एवढेच नाही तर भारत-मिडल ईस्ट-युरोप कॉरिडॉरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची तयारीही भारत करत आहे. या प्रकल्पात सीरियाचाही समावेश आहे.

टॅग्स :SyriaसीरियाIndiaभारत