शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

बारावीच्या निकालाचे निकष काय असणार?; पालक, विद्यार्थ्यांची वाढली धाकधूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 08:47 IST

अंतिम निकाल हा अंतर्गत गुणांच्या आधारे जाहीर होणार असला तरी त्याचे नेमके निकष काय असतील, हे अजून स्पष्ट नसल्याने पालक, विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे.

मुंबई : बारावीची परीक्षा रद्द झाल्याने राज्य मंडळाच्या १४ लाख विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अंतिम निकाल हा अंतर्गत गुणांच्या आधारे जाहीर होणार असला तरी त्याचे नेमके निकष काय असतील, हे अजून स्पष्ट नसल्याने पालक, विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे.अकरावीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे सीईटी द्यावी लागेल का, ती ऐच्छिक असेल का, विशेष म्हणजे ती आम्हाला ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे त्याची असेल की ज्या विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यापीठाची असेल, असे प्रश्न बारावी वाणिज्य शाखेच्या आणि गोखले महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या प्रेरणा कळंबे हिने उपस्थित केले.परीक्षाच होणार नसल्याने फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयांत चांगले गुण मिळविण्याची संधी नाही आणि अंतर्गत मूल्यमापन कोणत्या निकषांवर होणार हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे चिंता वाटत असल्याचे अभियांत्रिकीला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या शौमिकने सांगितले.जेव्हा आम्ही अकरावी आणि बारावीच्या वर्षात अंतर्गत परीक्षा किंवा अंतर्गत मूल्यमापनासाठी गृहपाठ, व्यवसाय दिले तेव्हा आम्हाला कल्पना नव्हती की या परीक्षांचे गुण थेट आमच्या पदवी प्रवेशासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. या कारणास्तव अंतर्गत मूल्यमापनाचे निकष काय असणार याबद्दल उत्सुकता असल्याचे मत कला शाखेच्या महेश निरंजनने व्यक्त केले.पदवी प्रवेशासाठी राज्यातील विद्यापीठांत आणि नामांकित महाविद्यालयांत सीबीएसई, आयसीएसई आणि राज्य मंडळ विद्यार्थ्यांमध्ये विशेष चढाओढ असते. त्यामुळे बारावीच्या परीक्षा रद्द केल्याने पुढील पदवीचे प्रथम वर्ष प्रवेशासाठी गुण समानीकरण कसे करणार आणि प्रवेशाची प्रक्रिया कशी राबविणार, याकडेही विद्यार्थ्यांचे लक्ष आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची गुणवत्ता आणि यंदाच्या वर्षाची मेहनत यांची सांगड घातली जाईल असा फॉर्म्युला ठरवून त्यावरच पदवी प्रवेशाची प्रक्रिया राबवावी. सीईटी परीक्षांचा विविध शाखा आणि विविध अभ्यासक्रमांसाठीचा घाट घातल्यास गुंता वाढेल, असे पालकांनी सांगितले.