शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

काय होता स्वामीनाथन अहवाल?; अद्यापही शेतकऱ्यांना लाभ नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 06:03 IST

ज्यांच्या नावावर झाले वर्षानुवर्षे राजकारण, तरीही शेतकऱ्यांना लाभ नाही

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारताच्या हरित क्रांतीचे जनक, प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ एम. एस. स्वामीनाथन यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले.  दूरदर्शी शास्त्रज्ञ आणि हरितक्रांतीचे जनक म्हटले जाणाऱ्या स्वामीनाथन यांच्या अहवालावर शेतकऱ्यांसाठी वर्षानुवर्षे राजकारण करण्यात आले. मात्र, शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकला नाही. 

स्वामीनाथन यांच्या नेतृत्वाखालील  आयोगाने शेतकऱ्यांना दुष्काळ अथवा पुराच्या आपत्तीमध्ये पिके नष्ट झाल्यानंतर मदत मिळत नाही. त्यांना बियाणे आणि इतर गोष्टींसाठी पैसे लागतात. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबतात. कर्जाच्या बोजाने ते आत्महत्यादेखील करतात. त्यामुळे जोखीम फंडातून त्यांना मदत करता येईल, अशी शिफारस केली होती.

मनकोम्बू सांबशिवन स्वामीनाथन ऊर्फ एम. एस. स्वामीनाथन यांचा कुंभकोणम (तामिळनाडू) येथे जन्म ७ ऑगस्ट १९२५ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण तेथेच झाले. वडील एम. के. सांबासिवन हे वैद्यकीय डॉक्टर होते आणि त्यांची आई पार्वती थंगम्मल होती.  त्यांनी कोईम्बतूर कृषी महाविद्यालय (तामिळनाडू कृषी विद्यापीठ) येथे शिक्षण घेतले. देशात हरित क्रांती घडवून आणण्यासाठी सी. सुब्रमण्यम आणि जगजीवन राम या दोन कृषी मंत्र्यांसह स्वामीनाथन यांनी अविश्रांत परिश्रम केले. रासायनिक-जैविक तंत्राचा वापर करून भात आणि गव्हाच्या उत्पादनात प्रचंड वाढ करण्याचा मार्ग या हरितक्रांतीमधून मोकळा झाला. स्वामीनाथन यांनी भारतीय कृषी संशोधन संस्थेचे संचालकपदासह  अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले.

या गोष्टींवर भरस्वामीनाथन यांच्या नेतृत्वाखालील आयोगाने राज्य स्तरावर शेतकरी कमिशन स्थापन करावे, सुविधा वाढवणे आणि अर्थ पुरवठा आणि विमा या संदर्भात  शिफारशी केल्या होत्या. महिला शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले जावे, नैसर्गिक संकटावेळी मदत करण्यासाठी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कृषी जोखीम फंड निर्माण करावा असे सूचविण्यात आले होते. 

अशा आहेत शिफारशी...काँग्रेसच्या, यूपीएच्या सत्ताकाळात २००४ मध्ये शेतकऱ्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी एका आयोगाची स्थापन करण्यात आली.  राष्ट्रीय शेतकरी आयोग (एनसीएफ) असे या आयोगाचे नाव होते. या आयोगाचे प्रमुख म्हणून एम. एस. स्वामीनाथन यांची निवड करण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वाखालील आयोगाने दोन वर्षांत सरकारला ५ अहवाल सादर केले. या अहवालांना स्वामीनाथन अहवाल असे ओळखले जाते. शेतकऱ्यांची स्थिती सुधारावी, यासाठी या अहवालाने अनेक शिफारशी केल्या. सरकारला विविध स्तरांवर सुधारण्याचे सूचना करण्यात आल्या होत्या. यापैकी शेतकऱ्यांच्या पिकाच्या उत्पादनाला किमान आधारभूत किंमत अर्थात एमएसपी ही या अहवालातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक महत्त्वाची सूचना ठरली. शेतकऱ्यांना पिकाच्या खर्चावर ५० टक्के नफ्यासह एमएसपी मिळावी, असे मत व्यक्त करण्यात आले होते. 

टॅग्स :FarmerशेतकरीPoliticsराजकारण