शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

भारतीय मातांपासून जन्मलेल्या मुलांचे करायचे काय? अधिकाऱ्यांना पडला प्रश्न; केंद्र सरकारचे मत घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 10:07 IST

पंतप्रधान संकटाच्या काळात ‘बेपत्ता’ नेता म्हणून दाखविण्याच्या प्रयत्नात असलेल्या पोस्टरवरून भाजपने काँग्रेसवर टीका केली.

भोपाळ : पाकिस्तानी नागरिकांनी भारतातून निघून जावे, असा आदेश केंद्र सरकारने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दिला. त्या पार्श्वभूमीवर भारतीय माता व पाकिस्तानी वडिलांपासून जन्मलेल्या नऊ मुलांच्या बाबतीत काय कारवाई करावी, असा प्रश्न मध्य प्रदेशातील अधिकाऱ्यांसमोर उभा राहिला आहे. देशातील अनेक राज्यांत हा प्रश्न उभा राहिला आहे.

दीर्घकालीन व्हिसासाठी २५ एप्रिल रोजी अर्ज करणाऱ्या पाकिस्तानी नागरिकाच्या प्रकरणावरही तोडगा शोधला जात आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, भारतीय माता व पाकिस्तानी वडील अशा दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या नऊ मुलांविषयी काय निर्णय घ्यावा याबद्दल केंद्र सरकारचे मत आम्ही मागविले आहे.

शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...

जवानाच्या पत्नीला पाकला धाडले

केंद्रीय राखीव पोलिस दलातील एका जवानाशी विवाह केलेली पाकिस्तानी महिला मंगळवारी जम्मूमधून मायदेशात रवाना झाली. मीनल खान, असे तिचे नाव असून तिच्या पतीचे नाव मुनीर खान आहे. या दोघांचा ऑनलाइन विवाह झाला होता. आम्हाला कुटुंबासोबत राहण्याची परवानगी द्यावी, अशी तिने सरकारला विनंती केली होती.

‘बेपत्ता’ नेता फोटोवरून वाद

पंतप्रधान संकटाच्या काळात ‘बेपत्ता’ नेता म्हणून दाखविण्याच्या प्रयत्नात असलेल्या पोस्टरवरून भाजपने काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींचे नाव न घेता त्यांचा एक जुना फोटो दाखवण्यात आला होता. नंतर ही पोस्ट डीलीट करण्यात आली.

काँग्रेस ही ‘लष्कर-ए-पाकिस्तान काँग्रेस’ असून, ते पाकसोबत असल्याचे दाखवायचे असल्याचे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी केली आहे.

पर्यटकांच्या सुरक्षेतील त्रुटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित

पहलगाममधील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोणीही का नव्हते? काही व्यक्ती नंतर फसव्या निघतात, त्यांना सरकारने सुरक्षा का दिली? किरण पटेलने अधिकारी असल्याचे भासवत कडक सुरक्षा मिळविली. त्याला सुरक्षा मिळते तर पर्यटकांना का नाही, असा सवाल सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला.

राहुल गांधी मृताच्या कुटुंबीयांना भेटणार

राहुल गांधी बुधवारी कानपूरला जाणार आहेत. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले शुभम द्विवेदी यांच्या कुटुंबीयांना ते भेटणार आहेत. रायबरेली आणि अमेठीचा दौरा पूर्ण केल्यानंतर ते कानपूरमध्ये शुभम यांच्या कुटुंबीयांना भेटणार आहेत, असे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी सांगितले.

भारतीयांशी विवाह; त्यांची हकालपट्टी करू नका

पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी सरकारला आवाहन केले की, जे पाकिस्तानी नागरिक भारतीय नागरिकांशी विवाह करून अनेक वर्षांपासून इथे राहत आहेत, त्यांना भारतातून हकालपट्टी करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा. आता ज्यांना पाकिस्तानमध्ये पाठविले जात आहे, त्यातील अनेक महिला ३०-४० वर्षांपूर्वी भारतात आल्या. त्यांनी इथे विवाह केला, मुलांना जन्म दिला. आता अचानक त्यांना पुन्हा पाकिस्तानात पाठविणे अयोग्य आहे.

हाशिम मुसा हा पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार?

पाकिस्तानचा माजी एसएसजी कमांडर हाशिम मुसा हा पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असल्याचा गुप्तचर यंत्रणांचा कयास आहे. तो सध्या लष्कर-ए-तयबामध्ये सक्रिय आहे. सुरक्षा दले, बिगरकाश्मिरी लोकांवर हल्ले करण्यासाठी त्याला जम्मू काश्मीरमध्ये पाठवण्यात आले. मुसाने ऑक्टोबर २०२४ मध्ये गंदरबलमधील गगनगीर येथे हल्ला केला. यामध्ये अनेक कामगार आणि एका स्थानिक डॉक्टरला आपला जीव गमवावा लागला.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानbhopal-pcभोपाळ