शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

रेल्वे अपघातात जखमींनी भरपाईसाठी काय करावे? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 07:57 IST

अपघातात झालेल्या नुकसानीमुळे प्रवाशांना भरपाई देता यावी, यासाठी रेल्वेने नियमांमध्ये वेळोवेळी बदल केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क: ओडिशाच्या बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या २८८ च्या पुढे गेली आहे. तर ११,३४० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. पंतप्रधान कार्यालयाने मृत्यू झालेल्यांच्या नातेवाइकांना २ लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाखांची आर्थिक मदत देण्याची घोषणा रेल्वे मंत्रालयाने केली आहे. अपघातात झालेल्या नुकसानीमुळे प्रवाशांना भरपाई देता यावी, यासाठी रेल्वेने नियमांमध्ये वेळोवेळी बदल केले आहेत.

अपघात कशाला समजावे? 

- याची माहिती रेल्वे कायदा १९८९ च्या १३ व्या प्रकरणात दिली आहे. ट्रेनमध्ये काम करताना अपघात, प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांमधील टक्कर किंवा प्रवाशांना घेऊन जाणारी ट्रेन रुळावरून घसरल्यास याला अपघात समजून जखमींना भरपाई दिली जाते. 

- यात नमूद आहे की, अपघातामुळे एखाद्या प्रवाशाचा मृत्यू झाल्यास आणि गंभीर शारीरिक इजा झाल्यास रेल्वे विभाग जबाबदार राहील.

कुणाला किती मदत? 

अपघातात एखाद्याची दृष्टी गेली किंवा श्रवणशक्ती कमी झाली किंवा चेहरा विद्रूप झाला, तर ८ लाखांची भरपाई दिली जाते. दुखापतीच्या तीव्रतेनुसार जखमी प्रवाशाला ३२ हजार ते ८ लाख रुपयांपर्यंतची भरपाई दिली जाते.

या प्रकरणात भरपाई नाही 

आत्महत्येचा प्रयत्न, त्यात झालेली इजा, बेकायदा कृत्याने झालेली दुखापत, अस्वस्थ मनाने कृत्य करून इजा पोहोचविल्यास या बाबी अपघात म्हणून ग्राह्य धरल्या जात नाहीत. यात नुकसानभरपाई दिली जात नाही.

भरपाईसाठी काय करावे लागते?

- पीडित व्यक्ती किंवा मृत व्यक्तीचे कुटुंबीय भरपाईसाठी रेल्वे दावा न्यायाधिकरणाकडे (आरसीटी) अर्ज करू शकतात.

- अपघात किंवा अनुचित घटनेत मृत किंवा जखमी व्यक्तीची माहिती लगेच आरसीटीला कळवावी. 

- भरपाईसाठी दावे सादर केल्यावर त्यांची चौकशी होते. 

- आरसीटीकडून नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसांत या प्रकरणांमध्ये रेल्वेला लेखी निवेदन द्यावे लागते. 

- दाव्याच्या रकमेच्या मंजुरीनंतर १५ दिवसांच्या आत जारी केलेल्या किंवा पाठवलेल्या धनादेशाच्या तपशिलाची पुष्टी केली जाते. 

- मुख्य हक्क अधिकाऱ्यांना ८ लाख रुपयांपर्यंतच्या अपघाती नुकसानभरपाईचे दावे निकाली काढण्याचे अधिकार आहेत.

- अर्जदाराचे राहण्याचे ठिकाण, तिकीट खरेदी केलेले ठिकाण, अपघात किंवा अनुचित घटना घडलेली जागा आदी तपशील अर्जात नमूद करावा. 

- आरसीटीसमोर दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी २१ दिवसांच्या आत पूर्ण करणे आवश्यक असते. 

- सविस्तर माहितीसाठी  www.indianrailways.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी. विविध स्वरूपाचे अर्ज येथून डाऊनलोड करता येतात.

 

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातIndian Railwayभारतीय रेल्वे