शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे अपघातात जखमींनी भरपाईसाठी काय करावे? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 07:57 IST

अपघातात झालेल्या नुकसानीमुळे प्रवाशांना भरपाई देता यावी, यासाठी रेल्वेने नियमांमध्ये वेळोवेळी बदल केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क: ओडिशाच्या बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या २८८ च्या पुढे गेली आहे. तर ११,३४० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. पंतप्रधान कार्यालयाने मृत्यू झालेल्यांच्या नातेवाइकांना २ लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाखांची आर्थिक मदत देण्याची घोषणा रेल्वे मंत्रालयाने केली आहे. अपघातात झालेल्या नुकसानीमुळे प्रवाशांना भरपाई देता यावी, यासाठी रेल्वेने नियमांमध्ये वेळोवेळी बदल केले आहेत.

अपघात कशाला समजावे? 

- याची माहिती रेल्वे कायदा १९८९ च्या १३ व्या प्रकरणात दिली आहे. ट्रेनमध्ये काम करताना अपघात, प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांमधील टक्कर किंवा प्रवाशांना घेऊन जाणारी ट्रेन रुळावरून घसरल्यास याला अपघात समजून जखमींना भरपाई दिली जाते. 

- यात नमूद आहे की, अपघातामुळे एखाद्या प्रवाशाचा मृत्यू झाल्यास आणि गंभीर शारीरिक इजा झाल्यास रेल्वे विभाग जबाबदार राहील.

कुणाला किती मदत? 

अपघातात एखाद्याची दृष्टी गेली किंवा श्रवणशक्ती कमी झाली किंवा चेहरा विद्रूप झाला, तर ८ लाखांची भरपाई दिली जाते. दुखापतीच्या तीव्रतेनुसार जखमी प्रवाशाला ३२ हजार ते ८ लाख रुपयांपर्यंतची भरपाई दिली जाते.

या प्रकरणात भरपाई नाही 

आत्महत्येचा प्रयत्न, त्यात झालेली इजा, बेकायदा कृत्याने झालेली दुखापत, अस्वस्थ मनाने कृत्य करून इजा पोहोचविल्यास या बाबी अपघात म्हणून ग्राह्य धरल्या जात नाहीत. यात नुकसानभरपाई दिली जात नाही.

भरपाईसाठी काय करावे लागते?

- पीडित व्यक्ती किंवा मृत व्यक्तीचे कुटुंबीय भरपाईसाठी रेल्वे दावा न्यायाधिकरणाकडे (आरसीटी) अर्ज करू शकतात.

- अपघात किंवा अनुचित घटनेत मृत किंवा जखमी व्यक्तीची माहिती लगेच आरसीटीला कळवावी. 

- भरपाईसाठी दावे सादर केल्यावर त्यांची चौकशी होते. 

- आरसीटीकडून नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसांत या प्रकरणांमध्ये रेल्वेला लेखी निवेदन द्यावे लागते. 

- दाव्याच्या रकमेच्या मंजुरीनंतर १५ दिवसांच्या आत जारी केलेल्या किंवा पाठवलेल्या धनादेशाच्या तपशिलाची पुष्टी केली जाते. 

- मुख्य हक्क अधिकाऱ्यांना ८ लाख रुपयांपर्यंतच्या अपघाती नुकसानभरपाईचे दावे निकाली काढण्याचे अधिकार आहेत.

- अर्जदाराचे राहण्याचे ठिकाण, तिकीट खरेदी केलेले ठिकाण, अपघात किंवा अनुचित घटना घडलेली जागा आदी तपशील अर्जात नमूद करावा. 

- आरसीटीसमोर दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी २१ दिवसांच्या आत पूर्ण करणे आवश्यक असते. 

- सविस्तर माहितीसाठी  www.indianrailways.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी. विविध स्वरूपाचे अर्ज येथून डाऊनलोड करता येतात.

 

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातIndian Railwayभारतीय रेल्वे