शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

जनसेवेसाठी धर्मांतर करण्याची गरज काय?

By admin | Updated: March 24, 2015 02:14 IST

अल्पसंख्यकांच्या संपूर्ण संरक्षणाची ग्वाही देत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी सोमवारी धर्मांतरविरोधी कायद्याची गरज व्यक्त केली.

नवी दिल्ली : अल्पसंख्यकांच्या संपूर्ण संरक्षणाची ग्वाही देत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी सोमवारी धर्मांतरविरोधी कायद्याची गरज व्यक्त केली. धर्मांतर कार्यक्रमात सहभागी झाल्याशिवाय लोकांची सेवा करता येणार नाही का, असा सवालही त्यांनी केला. राज्य अल्पसंख्यक आयोगाच्या संमेलनात राजनाथ बोलत होते. ‘घर वापसी’ आणि धर्मांतराबाबत कधी कधी अफवा पसरतात व वाद निर्माण होतात. कुठल्याही प्रकारच्या धर्मांतराची गरजच काय? सेवा करायची असेल तर त्यांचा धर्म न बदलताही ती केली जाऊ शकते. लोकांनी त्यांचा धर्म बदलावा, म्हणून सेवा केली जाते का? धर्मांतराचा मुद्दा संसदेतही उपस्थित झाला होता. सरकारने या मुद्यावर काहीतरी करावे, असे विचार अनेकांनी मांडले होते; मात्र माझ्या मते, यात समाजाचीही भूमिका आहे. परस्परांच्या श्रद्धेचा आदर करून आपण जगू शकत नाही का, असे अनेक सवाल राजनाथसिंग यांनी यावेळी केले.संघ परिवाराने धर्मांतराच्या मुद्यावर ख्रिश्चनांवर हल्ले चालवले असताना, राजनाथसिंग यांचे हे वक्तव्य आले आहे. मदर टेरेसांच्या सेवाभावी कार्यामागे धर्मांतराचा उद्देश असल्याची टीका अलीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)४लखनौ/जयपूर : केंद्रातील भाजपप्रणीत रालोआ सरकार सत्तेवर आल्यानंतर देशातील सांप्रदायिक वातावरण बिघडले आहे. मुस्लिमच नव्हे, तर ख्रिश्चनही या वातावरणात स्वत:ला असुरक्षित समजू लागले आहेत, अशा आशयाचा ठराव आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने रविवारी पारित केला.४देशातील मुस्लिमांची सर्वोच्च संस्था असलेल्या आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या १२४ व्या अधिवेशनात हा ठराव पारित करण्यात आला. देशातील हिंदुत्ववादी शक्ती ‘विष’ ओकत आहेत. केवळ मुस्लिमच नाहीत, तर ख्रिश्चनही स्वत:ला असुरक्षित समजत आहेत, असे या ठरावात म्हटले आहे. बोर्डाचे सह महासचिव मोहंमद अब्दुल रहीम कुरैशी यांनी याबाबत माहिती दिली. ४मी सर्व राज्य सरकारांना अल्पसंख्यकांच्या संरक्षणासाठी यथाशक्ती ठोस पावले उचलण्याची विनंती करतो. मी व माझे सरकार अल्पसंख्यकांच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहोत. परमेश्वराच्या शपथेपूर्वक मी हे सांगू इच्छितो, अशी ग्वाही राजनाथसिंग यांनी यावेळी दिली.