शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

कसले ते स्वीत्झर्लंड? आता काश्मीर, ३७० हाच होता सर्वात मोठा अडथळा; पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 06:00 IST

येथील जाहीर सभेत मोदी म्हणाले की, सरकार पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये लोकांच्या दारापर्यंत पोहोचले आहे.

जम्मू : ‘जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे आणि २०१९ मध्ये रद्द करण्यात आलेले कलम ३७० हे पूर्वीच्या राज्याच्या विकासातील सर्वांत मोठा अडथळा होता, आता तो दूर झाला आहे. जम्मू-काश्मीरचा असा विकास करू की, लोक स्वीत्झर्लंडला जाणे विसरून जातील,’ असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे व्यक्त केला.

येथील जाहीर सभेत मोदी म्हणाले की, सरकार पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये लोकांच्या दारापर्यंत पोहोचले आहे. ही मोदींची ‘गॅरंटी’ आहे आणि हीच कायम राहील. आम्ही जम्मू आणि काश्मीरचा विकास करण्याचा संकल्प केला आहे आणि मला विश्वास आहे की, येत्या काही वर्षांत तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करू. आम्ही अशा पायाभूत सुविधा निर्माण करू की, पर्यटक स्वीत्झर्लंडला जाणे विसरून जातील.

जम्मू आणि काश्मीरमध्ये ५० नवीन पदवी महाविद्यालये स्थापन करण्यात आली, अशी माहितीही त्यांनी दिली. जम्मू आणि काश्मीरमधील सुमारे १५०० नव्याने नियुक्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटपही केले.

३२,००० कोटींचे विकास प्रकल्प

मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये ३२००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या शिक्षण, रेल्वे, विमान वाहतूक आणि रस्ते क्षेत्रांसह अनेक विकास प्रकल्पांचा प्रारंभ केला.

पंतप्रधानांनी १३,५०० कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण किंवा पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये आयआयटी, आयआयएम आणि केंद्रीय विद्यापीठांचा समावेश आहे.

काँग्रेस विकास करू शकत नाही : गृहमंत्री

काँग्रेस भारताचा विकास करू शकत नाही. काँग्रेस हा घराणेशाहीचा पक्ष आहे. तो दिशाहीन पक्ष आहे. काँग्रेसने राममंदिराचा मुद्दा लटकत ठेवला,

- अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी