शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

कसले ते स्वीत्झर्लंड? आता काश्मीर, ३७० हाच होता सर्वात मोठा अडथळा; पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 06:00 IST

येथील जाहीर सभेत मोदी म्हणाले की, सरकार पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये लोकांच्या दारापर्यंत पोहोचले आहे.

जम्मू : ‘जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे आणि २०१९ मध्ये रद्द करण्यात आलेले कलम ३७० हे पूर्वीच्या राज्याच्या विकासातील सर्वांत मोठा अडथळा होता, आता तो दूर झाला आहे. जम्मू-काश्मीरचा असा विकास करू की, लोक स्वीत्झर्लंडला जाणे विसरून जातील,’ असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे व्यक्त केला.

येथील जाहीर सभेत मोदी म्हणाले की, सरकार पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये लोकांच्या दारापर्यंत पोहोचले आहे. ही मोदींची ‘गॅरंटी’ आहे आणि हीच कायम राहील. आम्ही जम्मू आणि काश्मीरचा विकास करण्याचा संकल्प केला आहे आणि मला विश्वास आहे की, येत्या काही वर्षांत तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करू. आम्ही अशा पायाभूत सुविधा निर्माण करू की, पर्यटक स्वीत्झर्लंडला जाणे विसरून जातील.

जम्मू आणि काश्मीरमध्ये ५० नवीन पदवी महाविद्यालये स्थापन करण्यात आली, अशी माहितीही त्यांनी दिली. जम्मू आणि काश्मीरमधील सुमारे १५०० नव्याने नियुक्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटपही केले.

३२,००० कोटींचे विकास प्रकल्प

मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये ३२००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या शिक्षण, रेल्वे, विमान वाहतूक आणि रस्ते क्षेत्रांसह अनेक विकास प्रकल्पांचा प्रारंभ केला.

पंतप्रधानांनी १३,५०० कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण किंवा पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये आयआयटी, आयआयएम आणि केंद्रीय विद्यापीठांचा समावेश आहे.

काँग्रेस विकास करू शकत नाही : गृहमंत्री

काँग्रेस भारताचा विकास करू शकत नाही. काँग्रेस हा घराणेशाहीचा पक्ष आहे. तो दिशाहीन पक्ष आहे. काँग्रेसने राममंदिराचा मुद्दा लटकत ठेवला,

- अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी