शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

कसले ते स्वीत्झर्लंड? आता काश्मीर, ३७० हाच होता सर्वात मोठा अडथळा; पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 06:00 IST

येथील जाहीर सभेत मोदी म्हणाले की, सरकार पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये लोकांच्या दारापर्यंत पोहोचले आहे.

जम्मू : ‘जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे आणि २०१९ मध्ये रद्द करण्यात आलेले कलम ३७० हे पूर्वीच्या राज्याच्या विकासातील सर्वांत मोठा अडथळा होता, आता तो दूर झाला आहे. जम्मू-काश्मीरचा असा विकास करू की, लोक स्वीत्झर्लंडला जाणे विसरून जातील,’ असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे व्यक्त केला.

येथील जाहीर सभेत मोदी म्हणाले की, सरकार पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये लोकांच्या दारापर्यंत पोहोचले आहे. ही मोदींची ‘गॅरंटी’ आहे आणि हीच कायम राहील. आम्ही जम्मू आणि काश्मीरचा विकास करण्याचा संकल्प केला आहे आणि मला विश्वास आहे की, येत्या काही वर्षांत तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करू. आम्ही अशा पायाभूत सुविधा निर्माण करू की, पर्यटक स्वीत्झर्लंडला जाणे विसरून जातील.

जम्मू आणि काश्मीरमध्ये ५० नवीन पदवी महाविद्यालये स्थापन करण्यात आली, अशी माहितीही त्यांनी दिली. जम्मू आणि काश्मीरमधील सुमारे १५०० नव्याने नियुक्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटपही केले.

३२,००० कोटींचे विकास प्रकल्प

मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये ३२००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या शिक्षण, रेल्वे, विमान वाहतूक आणि रस्ते क्षेत्रांसह अनेक विकास प्रकल्पांचा प्रारंभ केला.

पंतप्रधानांनी १३,५०० कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण किंवा पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये आयआयटी, आयआयएम आणि केंद्रीय विद्यापीठांचा समावेश आहे.

काँग्रेस विकास करू शकत नाही : गृहमंत्री

काँग्रेस भारताचा विकास करू शकत नाही. काँग्रेस हा घराणेशाहीचा पक्ष आहे. तो दिशाहीन पक्ष आहे. काँग्रेसने राममंदिराचा मुद्दा लटकत ठेवला,

- अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी