शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
3
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
4
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
5
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
6
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
7
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
8
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
9
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
10
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
11
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
12
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
13
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
14
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
15
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
16
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
17
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
18
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
19
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
20
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख

CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 15:27 IST

चीफ जस्टिस ऑफ इंडिया जेव्हा एखाद्या राज्याचा दौरा करत असतात तेव्हा त्यांच्या स्वागतापासून राहण्यापर्यंत सर्व प्रोटोकॉलचे पालन करावे लागते

मुंबई - सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई रविवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यावेळी प्रोटोकॉल पालन न झाल्याने गवई यांनी नाराजी व्यक्त केली. न्या. गवई मुंबईत पोहचल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त अथवा कुणीही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हता. सरन्यायाधीश गवई यांनी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँन्ड गोवातर्फे आयोजित सत्कार समारंभाला हजेरी लावली होती. सरन्यायाधीशांच्या नाराजीनंतर तिन्ही अधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

सरन्यायाधीशांसाठी काय आहे प्रोटोकॉल?

चीफ जस्टिस ऑफ इंडिया जेव्हा एखाद्या राज्याचा दौरा करत असतात तेव्हा त्यांच्या स्वागतापासून राहण्यापर्यंत सर्व प्रोटोकॉलचे पालन करावे लागते. यावेळी राज्याचे प्रमुख अधिकारी, डीजीपी आणि अन्य अधिकाऱ्यांना त्यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित राहावे लागते. त्याशिवाय राज्य सरकारमधील ज्येष्ठ मंत्रीही उपस्थित राहू शकतात. 

एअरपोर्ट ते कार्यक्रम स्थळापर्यंत सीजीआयच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेतली जाते. सरन्यायाधीश ज्या कार्यक्रमाला हजेरी लावतात तिथे राज्याचे प्रमुख पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणे गरजेचे असते. राज्य सरकारकडून त्यांच्यासाठी व्हिआयपी गेस्ट हाऊसची व्यवस्था केली जाते. भारताचे सरन्यायाधीश हे पद महत्त्वाचे असल्याने त्यांना कायम झेड अथवा झेड प्लस सुरक्षा पुरवली जाते. सीजीआयकडे त्यांची सुरक्षा वाढवण्याचा आणि घटवण्याचा अधिकार असतो. 

माझ्या जागी अन्य कुणी असता तर...

प्रोटोकॉलचे पालन करण्याचा आग्रह मी धरत नाही. इतक्या किरकोळ बाबींमध्ये पडायचे नसले तरी लोकांना त्याबाबत माहिती म्हणून नमूद करत आहे. माझ्या जागी अन्य कुणी असता तर राज्यघटनेचा अनुच्छेद १४२ चा वापर केला असता अशी तीव्र नाराजी सरन्यायाधीश गवई यांनी व्यक्त केली. 

काय आहे अनुच्छेद १४२?

भारतीय संविधान अनुच्छेद १४२ नुसार सुप्रीम कोर्टाला न्यायिक कार्यवाहीत पूर्ण न्याय देण्यासाठी आवश्यक आदेश जारी करण्याचा अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालय या अंतर्गत कोणत्याही व्यक्तीला न्यायालयात उपस्थित राहण्याचा आदेश देऊ शकतात. बी.आर गवई यांनी १४ मे रोजी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय