शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Indian Railway Kavach: काय आहे भारतीय रेल्वेचं सुरक्षा ‘कवच’?; समोरासमोर येणाऱ्या वेगवान ट्रेनलाही क्षणात रोखतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 13:37 IST

रेल्वेमंत्र्यांच्या उपस्थितीत कवच कार्यप्रणालीची चाचणी करण्यात आली. गुल्लागुडा ते चिटगिड्डा येणाऱ्या रेल्वे इंजिनवर स्वत: रेल्वेमंत्री हजर होते

नवी दिल्ली – रेल्वे सुरक्षेला प्राधान्य देत केंद्र सरकारनं आणि भारतीय रेल्वेने एकत्रित येत नवं तंत्रज्ञान आणत आहेत. देशात होणाऱ्या रेल्वे अपघातांना आळा बसवण्यासाठी रेल्वेची ‘कवच’ प्रणाली पुढे येत आहे. ज्याच्या मदतीनं रेल्वे अपघातावर नियंत्रण मिळवणं शक्य होणार आहे. शुक्रवारी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कवचची चाचणी घेतली. यावेळी रेल्वेचे इतर अधिकारीही उपस्थित होते.

कवचमुळे समोरा-समोर येणाऱ्या ट्रेन्स आपोआप थांबतात

रेल्वेमंत्र्यांच्या उपस्थितीत कवच कार्यप्रणालीची चाचणी करण्यात आली. गुल्लागुडा ते चिटगिड्डा येणाऱ्या रेल्वे इंजिनवर स्वत: रेल्वेमंत्री हजर होते. चाचणी वेळी वेगाने येणाऱ्या ट्रेन्स एकमेकांवर आदळवण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी वेगात असणाऱ्या ट्रेन्स आमनेसामने आल्या तेव्हा कवच प्रणालीनं काम सुरू केले. स्वयंचलित ब्रेकिंग सिस्टमचा वापर केला आणि इंजिन ३८० मीटर अंतरावर थांबवले. गेट सिग्नलजवळ येताच इंजिनची स्वयंचलित शिट्टी जोरात आणि स्पष्ट वाजली. चाचणी दरम्यान चालकाने आवाज आणि ब्रेकिंग सिस्टमला हातही लावला नाही. लूप लाइनवर इंजिन चालवताना ३० किमी प्रतितास वेग मर्यादा तपासण्यात आली. कवचने आपोआप ६० किमी प्रतितास इंजिनाचा वेग ३० किमी प्रतितास कमी करून लूप लाइनमध्ये प्रवेश केला.

काय आहे कवच?

‘कवच’ ही भारतीय उद्योगाच्या सहकार्याने रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (RDSO) द्वारे स्वदेशी विकसित केलेली ATP प्रणाली आहे. भारतीय रेल्वेमधील ट्रेन ऑपरेशन्समध्ये सुरक्षिततेचे एकत्रित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेने चाचणी केली आहे. संपूर्ण सुरक्षा स्तर-४ मानकांसह ही एक अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक प्रणाली आहे.

धोक्याचा (Red Signal) सिग्नल ओलांडणाऱ्या गाड्यांना संरक्षण देण्यासाठी आणि टक्कर टाळण्यासाठी हे कवच काम करतं. वेगमर्यादेनुसार ड्रायव्हर ट्रेनवर नियंत्रण ठेवू शकला नाही, तर ते आपोआप ट्रेन ब्रेकिंग सिस्टम सक्रिय करते. तसेच, ते दोन इंजिनांमधील टक्कर होण्यापासून रोखते. ज्यामध्ये कवच प्रणाली कार्यरत आहे.

‘कवच’ हे १० हजार वर्षांमध्ये त्रुटीच्या संभाव्यतेसह सर्वात परवडणारे, संपूर्ण संरक्षण स्तर 4 (SIL-4) प्रमाणित तंत्रज्ञानांपैकी एक आहे. तसेच, यामुळे रेल्वेसाठी स्वदेशी तंत्रज्ञानाच्या निर्यातीचे मार्ग खुले झाले आहेत.

काय आहे कवचचं वैशिष्टे?

१. रेड सिग्नल ओलांडण्यापासून रोखणे (SPAD)

२. ड्रायव्हर मशीन इंटरफेस (DMI) / लोको पायलट ऑपरेशन कम इंडिकेशन पॅनेल (LPOCIP) मध्ये दर्शविलेल्या सिग्नल पोझिशनसह ट्रेनच्या हालचालीचे सतत अपडेट

३. ओव्हर स्पीडिंग टाळण्यासाठी स्वयंचलित ब्रेकिंग

४. लेव्हल क्रॉसिंग गेट्सजवळ जाताना ऑटोमॅटिक शिट्टी वाजते

५. कार्यरत कवच प्रणालीसह सुसज्ज दोन इंजिनमधील टक्कर रोखण्यास सक्षम

६. आणीबाणीच्या परिस्थितीत SOS संदेश

७. नेटवर्क मॉनिटर सिस्टमद्वारे ट्रेनच्या वाहतुकीवर लाईव्ह निरीक्षण ठेवता येते.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे