शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

‘देवाची करणी’ कायद्यात काय असते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 11:22 IST

परमेश्वर जगाचा कारभार चालवतो, असे आस्तिक मानतात. ॲक्ट ऑफ गाॅड या कायद्याच्या तत्त्वाचा या संकल्पनेशी तसा संबंध नाही. पण ‘ईश्वरेच्छा बलियसी’ हे दैनंदिन व्यवहारातले तत्त्व कायद्यातील या संकल्पनेच्या जरा जवळ आहे, कसे? ते पाहू. 

ॲड. नितीन देशपांडे आपल्या राज्यघटनेशी या संकल्पनेचा काहीच संबंध नाही. ॲक्ट ऑफ गॅाड म्हणजे, अचानक उद्भवलेली नैसर्गिक आपत्ती. उदा. भूकंप, आग, पूर, अतिवृष्टी इ. अशा घटनांचा आपापसातील कायदेशीर कर्तव्यांवर होणारा परिणाम. इंग्रजी कायद्यात पूर्वी आपापसात केलेल्या करारांमधून उद्भवणारी कर्तव्ये ही कोणत्याही परिस्थितीत बंधनकारक मानली जात होती. १८६३ मध्ये टेलर विरुद्ध काल्डवेल खटल्यात न्यायालयाने करारातून उद्भवलेली कर्तव्यपूर्ती करणे अशक्यप्राय झाले म्हणून त्याच्या बंधनातून सुटका दिली. हेच तत्त्व भारतीय करार कायदा, १८८२च्या कलम ५६ मध्ये अंतर्भूत आहे.

विमा कंपन्या आपल्या करारांमुळे या संकल्पनेचा समावेश करतात. एकदा एका डिफ्युजर सिस्टीमला जहाजाच्या धक्क्याने धोका पोहोचला. विमा कंपनीचे म्हणणे की, अचानक आलेल्या लाटेमुळे हे घडले. कंपनीविरुद्ध दावा लावणारा वादी हे सिद्ध करू शकला नाही की, जहाज निष्काळजीपणे हाकले जात होते. त्यामुळे ॲक्ट ऑफ गॅाड या तत्त्वाखाली विमा कंपनीची सुटका झाली. मात्र कधी कधी अशा आपत्तीने होणाऱ्या संभाव्य नुकसानीपासून सुटका होण्यासाठीच विमा असतो.

सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे की, अशा नैसर्गिक आपत्तीची थोडीदेखील शक्यता असता कामा नये. असे असेल तर हा बचाव होत नाही (उत्तर प्रदेश सरकार विरुद्ध मॅकडॉवेल (२०२२) तसेच व्होरा सादिकभाई विरुद्ध गुजरात सरकार (२०१६) या खटल्यात असे झाले होते की, सरकारने बांधलेल्या धरणातून सोडलेल्या ६० हजार क्यूसेक्स पाण्याने लागवडीचे नुकसान झाले म्हणून जमीनमालकाने नुकसानभरपाई मागितली. सरकारचे म्हणणे होते की, अचानक झालेल्या वृष्टीमुळे धरणाचे पाणी सोडावे लागले, अन्यथा धरण फुटले असते. सर्वोच्च न्यायालयापुढे हे मुद्दे होते की, धरणातील पाणी अचानक सोडण्याची कृती निष्काळजीपणात मोडेल का? अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे तसे करणे भाग पडले का? (ॲक्ट ऑफ गॅाड)यासंबंधात ब्रिटिश न्यायालयाने रेलंडस विरुद्ध फ्लेचर खटल्यातील कायदे तत्त्वाखाली या प्रकरणातील निकाल दिला.

ते तत्त्व असे की, एखाद्याने आपल्या जागेत एखादी बाब राखली आणि अशी बाब जागेबाहेर आल्याने नुकसान होणार असेल तर तसे होऊ नये म्हणून त्या व्यक्तीने योग्य ती काळजी घेतली होती का? हे तपासले जाते. जर तशी काळजी घेतली नसेल तर दुसऱ्याचे नुकसान भरून देण्याची जबाबदारी त्या व्यक्तीवर पडते. उदा. आवाराबाहेर येऊन एखाद्याचा न बांधलेला  कुत्रा बाहेरील व्यक्तीस चावणे. बहुसंख्य खटल्यांविषयी जे म्हटले जाते तेच या खटल्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. उभयपक्षांनी हा खटला अभ्यास न करता पुरेसे पुरावे न देता चालवला. अर्जदारांचा दावा होता की, सरकारने पाण्याची पातळी अशी ठेवली नाही की, वृष्टी झाली तरी धरणातील पाणी बाहेर येणार नाही. हे सरकारने नीट खोडले नव्हते. म्हणून न्यायालयाने अर्जदारास ५ लाख नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. 

नैसर्गिक आपत्तीमुळे...बचाव यशस्वी करण्यासाठी हे सिद्ध केले पाहिजे की, प्रतिवादीने योग्य ती सर्व काळजी घेतली होती. तरीसुद्धा नैसर्गिक आपत्तीमुळे वादीचे नुकसान झाले. हा बचाव घेण्यासाठी किंवा परतवून लावण्यासाठी आवश्यक तो पुरावा न्यायालयापुढे येणे जरुरीचे आहे.

टॅग्स :Lifestyleलाइफस्टाइलCourtन्यायालय