शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
3
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
4
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
5
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
6
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
7
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
9
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
10
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
11
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
12
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
13
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
14
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
15
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
16
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
17
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
18
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
19
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
20
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!

काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर ४ वर्षात काय बदललं?, भाजपकडून व्हिडिओ शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 15:15 IST

मोदी सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयाला आता ४ वर्षे झाली आहेत

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा असलेलं कलम ३७० हटवण्याच्या निर्णय घेतला. देशाच्या स्वातंत्र्यापासून काश्मीर राज्याला असलेले काही विशेषाधिकार या कलमान्वये काढून घेण्यात आले. मोदी सरकारच्या या निर्णयाला अनेकांनी विरोध केला. मात्र, संपूर्ण सुरक्षा यंत्रणा कामाला लावून आणि कुठेही अनुचित प्रकार न घडता कलम ३७० हटविण्यात आल्याची माहितीही देण्यात आली. आता, गेल्या ४ वर्षात काश्मीरमध्ये नेमकं काय बदललंय, याची माहितीच भाजपने व्हिडिओच्या माध्यमातून दिलीय. 

मोदी सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयाला आता ४ वर्षे झाली आहेत. त्यामुळे, या निर्णयाचा तेथील जनसामान्यांवर आणि देशावर काय परिणाम झाला, याची चर्चाही नेहमीच होत असते. यासंदर्भात भाजपने एक् व्हिडिओ ट्विटरवरुन शेअर केला आहे. त्यामध्ये, या निर्णयामुळे काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित झाली असून विकासाने गती पकडल्याचं म्हटलं आहे. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही पार पडत असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे, असे या व्हिडिओतून सांगण्यात आलंय. 

या निर्णयामुळे काश्मीरसाठी वेगळा झेंडा आणि वेगळे कायदे रद्द झाले. काश्मीरच्या नागरिकांचं दुहेरी नागरिकत्व संपुष्टात आलं आणि जम्मू काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्याचा अधिकार सर्व भारतीयांना मिळाला. या ४ वर्षांत काश्मीरमधल्या दगडफेकीच्या घटना कमी झाल्या आणि दहशतवाद्यांच्या कारवायादेखिल कमी झाल्या आहेत. याशिवाय काश्मिरी नागरिक भारतीयांच्या आणखी जवळ आले. मोदी सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयाला ४ वर्षे पूर्ण झाले असून भाजपने व्हिडिओच्या माध्यमातून याची माहिती दिली. गेल्या ४ वर्षात काश्मीरचं नशिब आणि चित्र बदललंय. काश्मीरमध्ये आता शाळा बंद आणि आंदोलनं इतिहास जमा झालं आहे. घुसकोरी करण्याची हिंमत आता दशतवाद्यांमध्ये राहिली नाही. कलम ३७० हटताच ९०० केंद्रीय कायदे काश्मीरमध्ये लागू करण्यात आले. तसेच, ५७,५०० कोटी रुपयांच्या विकास कामांना गती मिळाली आहे. चेनाना-नाशरी या देशातील सर्वात मोठा हायवे बोगदा येथे बनला आहे. दिल्ली-अमृतसर-कटरा एक्सप्रेस वे काश्मीरची ओळख बनलीय. तसेच, चिनाब ब्रीज हा जगातील सर्वात उंच पुलही याच खोऱ्यात बांधून पूर्ण झाला आहे, अशी माहिती या व्हिडिओत देण्यात आली आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी