शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरमध्ये हिंसाचार थांबविण्यास काय केले?; अहवाल द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 09:24 IST

सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती पी.एस. नरसिम्हा आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने या मुद्द्यावर याचिकांची १० जुलै रोजी सुनावणी ठेवली आहे.

नवी दिल्ली/इंफाळ : जातीय हिंसाचारग्रस्त राज्यात पुनर्वसन सुनिश्चित करण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी घेतलेल्या पावलांचा तपशीलवार अद्ययावत स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मणिपूर सरकारला दिले. दरम्यान, दिवसभरात बिष्णुपूरमध्ये ४ जणांची हत्या करण्यात आली आहे.

सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती पी.एस. नरसिम्हा आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने या मुद्द्यावर याचिकांची १० जुलै रोजी सुनावणी ठेवली आहे. खंडपीठाने राज्य सरकारतर्फे हजर असलेले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना अद्ययावत स्थिती अहवाल दाखल करण्यास सांगितले. त्यामध्ये पुनर्वसन शिबिरे, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उचललेली पावले आणि शस्त्रे जप्त करणे, यांसारखे तपशील असावेत, असे खंडपीठाने म्हटले आहे.दरम्यान, काँग्रेसने मणिपूरमध्ये सुरू असलेल्या वांशिक हिंसाचाराबद्दल मणिपूरचे मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नवी दिल्लीत निदर्शने केली.

सरकार काय म्हणाले?मेहता यांनी सुरक्षा दलांची तैनाती आणि अलीकडील कायदा व सुव्यवस्थेची माहिती दिली. राज्यातील संचारबंदीचा कालावधी आता २४ तासांवरून पाच तासांवर आणण्यात आला आहे. राज्यात पोलिस, भारतीय राखीव बटालियन आणि सीएपीएफच्या ११४ कंपन्याही तैनात आहेत. 

कुकी गटाने काय म्हटले?कुकी गटांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कॉलिन गोन्साल्विस यांनी या प्रकरणाला जातीय रंग देऊ नये, असेही ते म्हणाले.अतिरेकी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात दिसले आणि त्यांनी ते  कुकी गटांचा नाश करतील, अशी धमकी दिली, परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही. कुकी गटांविरुद्धचा हिंसाचार राज्य प्रायोजित आहे.

उद्योजक संकटातदोन महिन्यांहून अधिक काळ हिंसाचार होत असताना, राज्यातील व्यापारी, उद्योजकांचे भवितव्य अंधारात आहे. राज्याचे अर्थचक्र ठप्प झाले आहे. हिंसाचारामुळे आम्ही कित्येक वर्षे मागे पडलो आहोत, असे व्यापाऱ्यांनी म्हटले.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार