शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

त्या रात्री जलवायू विहारच्या एल-32 बंगल्यात काय घडल होतं ? आज येणार आरुषी-हेमराज हत्याकांडाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 09:36 IST

संपूर्ण देशभरात गाजलेल्या आरुषी आणि हेमराज हत्याकांड प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालय आज  निकाल देणार आहे.

ठळक मुद्देराजेश आणि नुपूर तलवार सध्या गाजियाबादच्या डासना जेलमध्ये बंद आहेत.आरुषी तलवार दांम्पत्याची एकुलती एक मुलगी होती.

नवी दिल्ली - संपूर्ण देशभरात गाजलेल्या आरुषी आणि हेमराज हत्याकांड प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालय आज  निकाल देणार आहे. या प्रकरणात सीबीआय न्यायालयाने 26 नोव्हेंबर 2013 रोजी आरुषीचे आई-वडिल राजेश आणि नुपूर तलावर यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या निर्णया विरोधात राजेश आणि नुपूर तलवार यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर आज निकाल येणार आहे. 

राजेश आणि नुपूर तलवार सध्या गाजियाबादच्या डासना जेलमध्ये बंद आहेत. न्यायमूर्ती बीके नारायण आणि न्यायमूर्ती एके मिश्रा यांच्या खंडपीठाने सात सप्टेंबरला निर्णय राखून ठेवला होता. आरुषी तलवार दांम्पत्याची एकुलती एक मुलगी होती. नोएडा जलवायू विहार एल-32 मध्ये हे कुटुंब राहत होते. 16 मे 2008 च्या सकाळी आरुषी तिच्या बेडरुममध्ये मृतावस्थेत सापडली. तिची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. 

तलवार यांच्या घरी काम करणारा नोकर हेमराज गायब असल्याने सर्वप्रथम त्याच्यावर हत्येचा संशय होता. पण दुस-या दिवशी 17 मे रोजी घराच्या गच्चीवर हेमराजचा मृतदेह सापडला. या प्रकरणात न्यायालयाने आरुषीच्या आई-वडिलांना दोषी ठरवले असले तरी, अजूनही या संपूर्ण प्रकरणाबद्दल रहस्य कायम आहे. उच्च न्यायालय निकाल सुनावताना या दोन्ही हत्या का झाल्या? त्यामागे काय उद्देश होता? त्याबद्दल निरीक्षण नोंदवू शकते. 

एकूणच या दोन्ही हत्यांभोवती रहस्य असल्याने प्रसारमाध्यमांनी त्यावेळी हे प्रकरण उचलून धरले होते. एक प्रकारची मीडिया ट्रायल सुरु असल्याने पोलिसांवर दबाव होता. उत्तरप्रदेश पोलिसांनी ऑनर किलिंगमधून या दोन्ही हत्या झाल्याचा निष्कर्ष काढला होता. अखेर तत्कालिन मुख्यमंत्री मायावतींनी हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपवले. 

या प्रकरणाच्या तपासात अनेक नाटयमय वळणे आली. सीबीआयच्या दोन प्रमुख अधिका-यांनी परस्परविरुद्ध निष्कर्ष काढला. अरुण कुमार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने वैज्ञानिक पुरावे गोळा करण्यावर भर दिला. तलवार यांचा कम्पाऊंडर क्रिष्णा, शेजारच्या बंगल्यात काम करणारे दोन नोकर विजय मंडल आणि राजकुमार यांना अटक केली. त्यांची नार्को चाचणी केली. पण सीबीआयला तिघांविरोधात आरोपपत्र दाखल करता न आल्याने त्यांची सुटका झाली. 

दुस-या टीमला आरुषीच्या आई-वडिलांवर संशय होता. पण सबळ पुराव्याअभावी त्यांनी क्लोजर रिपोर्ट सादर केला. पण सीबीआयच्या विशेष न्यायालयाने हा क्लोजर रिपोर्ट फेटाळून लावला. 

टॅग्स :Aarushi murderआरुषी हत्याhemraj murderहेमराज हत्या