शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
4
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
5
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
6
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
7
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
8
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
9
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
10
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
11
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
12
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
13
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
14
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
15
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
16
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
17
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
18
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
19
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
20
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा

बाबरी मशीद पाडल्यानंतर दुसऱ्या दिवशी कॅबिनेटच्या बैठकीत काय घडले? सलमान खुर्शिद यांचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 21:08 IST

Demolition of Babri Masjid: काँग्रेस नेते Salman Khurshid  यांनी लिहिलेले ‘Sunrise over Ayodhya: Nationhood in Our Times’ हे पुस्तक सध्या खूप चर्चेत आहे. दरम्यान, अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्यानंतर दुसऱ्या दिवशी केंद्र सरकारच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये काय घडले होते, याचे वर्णनही या पुस्तकात करण्यात आले आहे.

नवी दिल्ली -  काँग्रेस नेते सलमान खुर्शिद  यांनी लिहिलेले ‘सनराईझ ओव्हर अयोध्या, नेशनहुड इन आर टाइम्स’ हे पुस्तक सध्या खूप चर्चेत आहे. दरम्यान, अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्यानंतर दुसऱ्या दिवशी केंद्र सरकारच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये काय घडले होते, याचे वर्णनही या पुस्तकात करण्यात आले आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडल्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांनी ते सर्वजण पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्यासाठी काय विचार करत आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र नरसिंह राव यांनी मला तुमच्या सहानुभूतीची गरज नाही, असे सांगितले.  खुर्शिद यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले की, या अकल्पनिय घटनेने हळुहळू सर्वांना सुन्न केले. रविवारी मशीद पाडली गेली आणि ७ डिसेंबर रोजी सकाळी मंत्रिमंडळातील सदस्य संसद भवनातील कक्षात एकत्र झाले. सर्व उदास होते. तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत भयाण शांतता पसरली होती.  घडलेल्या घटनेचे वर्णन करण्यासाठी मंत्रिमंडळातील सदस्यांकडे शब्दही नव्हते. मात्र माधवराव शिंदे यांनी कोंडी फोडत पंतप्रधानांप्रति सहानूभूती व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र मला तुमच्या सहानूभूतीची गरज नाही, असे त्यांनी सांगितले.  चिंतीत पंतप्रधानांच्या प्रतिक्रियेने  आम्हाला आश्चर्यचकीत केले. नरसिंह राव यांच्या या कठोर प्रतिक्रियेनंतर याविषयावर पुन्हा चर्चा करण्याचे काही औचित्यच उरले नाही आणि ती बैठक समाप्त झाली.

या पुस्तकात सलमान खुर्शिद लिहितात की, कल्याण सिंह यांच्या नेतृत्वातील उत्तर प्रदेश सरकार ६ डिसेंबर रोजीच बरखास्त करण्यात आले.  आठवडाभरानंतर राष्ट्रपतींनी कॅबिनेटच्या सल्ल्यानुसार हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील भाजपाशासित सरकारे बरखास्त करण्यात आली.  मात्र मंदिर-मशिदीच्या राजकारणाने काँग्रेसचे उत्तर प्रदेशमधील अस्तित्व संकटात आणले. समाजवादी पक्ष आणि बसपाच्या अस्थायी सशक्तीकरणानंतर भाजपाला राज्य आणि केंद्रात वर्चस्व प्रस्थापित करण्याची संधी मिळाली, असे मतही सलमान खुर्शिद यांनी मांडले.  

टॅग्स :salman khurshidसलमान खुर्शिदbabri masjidबाबरी मस्जिदAyodhyaअयोध्या