शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

जीडीपी म्हणजे नेमके काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 05:29 IST

एकूण देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) हे देशाच्या अर्थव्यवस्थेची प्रकृती जोखण्याचे सर्वच देशांमध्ये वापरले जाणारे प्रमुख साधन आहे.

एकूण देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) हे देशाच्या अर्थव्यवस्थेची प्रकृती जोखण्याचे सर्वच देशांमध्ये वापरले जाणारे प्रमुख साधन आहे. देशात निर्माण झालेली सर्वच उत्पादने आणि सेवा यांची ठराविक कालावधीसाठी एकत्रित केलेली ठराविक चलनातील आकडेवारी म्हणजे एकूण देशांतर्गत उत्पादन होय.

जीडीपी मोजण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जात असला तरी भारतात खालील सुत्रानुसार त्याची मोजणी केली जाते.जीडीपी = खासगी उपयोग+ त्यामध्ये झालेली एकूण गुंतवणूक + सरकारी गुंतवणूक + सरकारी खर्च + (निर्यात - आयात)जीडीपीमध्ये होणारी वाढ अथवा घट ही देशाच्या सामाजिक व आर्थिक बदलाला कारणीभूत ठरत असते. देशातील गरीबी, बेरोजगारी, जीवनाची पातळी, साक्षरता आणि आरोग्यसेवा या विविध बाबी जीडीपीवर अवलंबून असतात. जीडीपी वाढला की या विविध सेवांवरील सरकारी खर्चासाठी अधिक रक्कम उपलब्ध होते. मात्र जीडीपी कमी झाल्यास सामाजिक सेवांवरील खर्चात कपात करणे सरकारला भाग पडते. त्यामुळे देशाचा विकास कमी प्रमाणात होताना दिसतो.

जीडीपीची मोजणीकोणाकडून?भारतात सांख्यीकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय हे जीडीपीच्या मोजणीसाठी जबाबदार असते. केंद्रीय सांख्यीकी कार्यालयातील अकाऊंट विभाग हा जीडीपीची मोजणी करीत असतो. जीडीपीची मोजणी ही दर ३ महिन्यांनी केली जाते. दरवर्षी ३१ मे रोजी वार्षिक जीडीपीची घोषणा केली जात असते. विविध वस्तूंच्या स्थिर किमती आणि सध्याच्या बाजारभावानुसार असलेल्या किमती या दोन्ही पद्धतींनी जीडीपी मोजला जातो.कोणत्या क्षेत्राचा किती वाटादेशाच्या जीडीपीमध्ये विविध क्षेत्रांचा वेगवेगळा वाटा असतो. भारताच्या जीडीपी मोजणीमध्येकृषी क्षेत्राचा वाटा १७ टक्के तर औद्योगिक क्षेत्राचा वाटा २९ टक्के आहे. सर्वाधिक ३० टक्के वाटा हा सेवा क्षेत्राकडे आहे.१९९१ मध्ये भारताने खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचे धोरण स्विकारल्यानंतर पुढील दशकात जीडीपीचा वाढीचा दर दरवर्षी सरासरी ६ ते ७ टक्के राहिला. सन २०१४ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्वाधिक वाढ देणारी अर्थव्यवस्था होती.सन २०१० मध्ये सर्वाधिक वाढभारताच्या जीडीपीमध्ये सन २०१० मध्ये सर्वाधिक म्हणजे १०.३ टक्के एवढी वाढ झाली होती. त्याआधी सन २००७ मध्ये ९.८ टक्के तर १९८८ मध्ये ९.६ टक्यांनी जीडीपी वाढला होता. याशिवाय २००५ आणि २००६ या दोन वर्षात जीडीपी वाढीचा दर ९.३ टक्के होता.भारतीय अर्थव्यवस्थेला नविन दिशा देणारे सन १९९१ मध्ये जीडीपीच्या वाढीचा दर १.१ टक्का असा सर्वात कमी राहिला. याआधी १९८२ मध्ये ३.५, १९८४ मध्ये ३.८, २००२ व २००८ मध्ये ३.९ असाही जीडीपीच्या वाढीचा दर राहिला.