शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

"आरएसएसला काय करायचं आहे?"; सरसंघचालक मोहन भागवतांनी दिलं एका वाक्यात उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 15:07 IST

RSS Chief Mohan Bhagwat: पश्चिम बंगालमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. 

RSS Mohan Bhagwat News: हिंदूत्व काय आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला काय करायचं आहे, या मुद्द्यांवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाष्य केले. पश्चिम बंगालमधील पूर्व वर्धमान जिल्ह्यात संघाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भागवत यांनी स्वयंसेवकांना हिंदूत्वाबद्दल मार्गदर्शन केलं. 

सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, "अनेक अडचणी आल्या असतील, त्या ते अडथळ पार करून सर्वजण उपस्थित आहेत. हा आग्रह का आहे? संघाला (RSS) काय करायचं आहे? एका वाक्यात या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल, तर संघ संपूर्ण हिंदू समाजाचं संघटन करू इच्छितो."

आरएसएसला हिंदू समाजाचं संघटन का करायचं?

या मुद्द्यावर भाष्य करताना ते पुढे म्हणाले, "हिंदू समाजाचं संघटन का? कारण या देशाचा उत्तरदायी समाज हिंदू समाज आहे. अमृत वचन तुम्ही ऐकलं. भारतवर्ष हे केवळ भुगोल नाहीये. भुगोल छोटा मोठा होत राहतो. पण, भारत तेव्हा म्हटले जाते, जेव्हा त्याचा एक स्वभाव असतो. भारताचा एक स्वभा आहे. त्या स्वभावासोबत आपण राहू शकत नाही, असे ज्यांना वाटले, त्यांनी त्यांचा वेगळा देश बनवला", असे भाष्य सरसंघचालक भागवत यांनी केले. 

भारत-पाक फाळणीवर सरसंघचालकांचं भाष्य

"स्वाभाविक हे आहे की, जे वेगळे झाले नाहीत, त्या सगळ्यांना भारत नावाचा स्वभाव हवा आहे. हा भारत नावाचा स्वभाव आजचा नाहीये. १५ ऑगस्ट १९९४७ नंतर असे नाही. तो त्यापेक्षाही प्राचीन आहे. जेव्हा जगाच्या इतिहासाने डोळे उघडले, त्याने या भूभागावर; ज्याला भुगोलामध्ये इंडो-इराणीय प्लेट म्हणतात, त्या भूभागावर राहणाऱ्या सगळ्यांमध्ये हाच स्वभाव असल्याचे बघितले", असे मोहन भागवत इतिहासातील दाखला देत म्हणाले. 

"तो स्वभाव काय आहे, जगाची विविधता स्विकारून हिंदू वाटचाल करतो. सगळ्यांची आपापली वैशिष्ट्ये असतात. हिंदूंना माहितीये की, ही वैशिष्ट्ये ज्या एका सत्याचा आविष्कार आहे, ते सत्य एकच आहे; सृष्टीच्या चराचरात तेच एक आहे, जे बदलत नाही... जे आधीही होतं, आजही आणि नंतरही राहील. तेच शाश्वत आहे. बाकी सगळं बदलत राहते. तो बदलही त्या एकाची अभिव्यक्ती असते. त्यामुळे हल्ली म्हणतात विविधतेमध्ये एकता! पण हिंदू हे जाणतो. त्याला हे समजते की, एकतेची ही विविधता आहे, वैशिष्ट्ये आहेत", असे मोहन भागवत म्हणाले. 

तोच खरा मोठेपणा असतो -सरसंघाचालक भागवत

"हा एकतेचा शृंगार आहे. त्यामुळे आपापल्या वैशिष्ट्यांसोबत श्रद्धेने चालत रहा. सगळ्यांच्या वेगळेपणाचा सन्मान करा. मनुष्याला व्यक्ती म्हणून जगायचं असतं, पण फक्त व्यक्तीच्या नात्याने जगायचं नाही. व्यक्ती कुटुंबासाठी आहे. कुटुंब समाजासाठी आहे. समाज मानवतेसाठी आहे. सर्व जीवन सृष्टीच्या जीवनाशी निगडित आहे. त्यामुळे पर्यावरणासोबत मैत्रही त्या स्वभावात पहिल्यापासूनच आहे. व्यक्ती मोठा की समाज, हा वाद इथे नाहीये. सगळ्यांजवळ आपापली सत्ता आहे, ती सत्ता दुसऱ्यांची सत्ता मोठी करण्यासाठी कामाला आली पाहिजे. आपण मोठे असाल, तर दुसऱ्यांनाही मोठे करा. तोच खरा मोठेपणा आहे", मोहन भागवत म्हणाले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवतHinduहिंदूwest bengalपश्चिम बंगाल