शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
4
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
5
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
6
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
7
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
8
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
9
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
10
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
11
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
12
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
13
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
14
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
15
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
16
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
17
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
18
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
19
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
20
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा

"आरएसएसला काय करायचं आहे?"; सरसंघचालक मोहन भागवतांनी दिलं एका वाक्यात उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 15:07 IST

RSS Chief Mohan Bhagwat: पश्चिम बंगालमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. 

RSS Mohan Bhagwat News: हिंदूत्व काय आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला काय करायचं आहे, या मुद्द्यांवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाष्य केले. पश्चिम बंगालमधील पूर्व वर्धमान जिल्ह्यात संघाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भागवत यांनी स्वयंसेवकांना हिंदूत्वाबद्दल मार्गदर्शन केलं. 

सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, "अनेक अडचणी आल्या असतील, त्या ते अडथळ पार करून सर्वजण उपस्थित आहेत. हा आग्रह का आहे? संघाला (RSS) काय करायचं आहे? एका वाक्यात या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल, तर संघ संपूर्ण हिंदू समाजाचं संघटन करू इच्छितो."

आरएसएसला हिंदू समाजाचं संघटन का करायचं?

या मुद्द्यावर भाष्य करताना ते पुढे म्हणाले, "हिंदू समाजाचं संघटन का? कारण या देशाचा उत्तरदायी समाज हिंदू समाज आहे. अमृत वचन तुम्ही ऐकलं. भारतवर्ष हे केवळ भुगोल नाहीये. भुगोल छोटा मोठा होत राहतो. पण, भारत तेव्हा म्हटले जाते, जेव्हा त्याचा एक स्वभाव असतो. भारताचा एक स्वभा आहे. त्या स्वभावासोबत आपण राहू शकत नाही, असे ज्यांना वाटले, त्यांनी त्यांचा वेगळा देश बनवला", असे भाष्य सरसंघचालक भागवत यांनी केले. 

भारत-पाक फाळणीवर सरसंघचालकांचं भाष्य

"स्वाभाविक हे आहे की, जे वेगळे झाले नाहीत, त्या सगळ्यांना भारत नावाचा स्वभाव हवा आहे. हा भारत नावाचा स्वभाव आजचा नाहीये. १५ ऑगस्ट १९९४७ नंतर असे नाही. तो त्यापेक्षाही प्राचीन आहे. जेव्हा जगाच्या इतिहासाने डोळे उघडले, त्याने या भूभागावर; ज्याला भुगोलामध्ये इंडो-इराणीय प्लेट म्हणतात, त्या भूभागावर राहणाऱ्या सगळ्यांमध्ये हाच स्वभाव असल्याचे बघितले", असे मोहन भागवत इतिहासातील दाखला देत म्हणाले. 

"तो स्वभाव काय आहे, जगाची विविधता स्विकारून हिंदू वाटचाल करतो. सगळ्यांची आपापली वैशिष्ट्ये असतात. हिंदूंना माहितीये की, ही वैशिष्ट्ये ज्या एका सत्याचा आविष्कार आहे, ते सत्य एकच आहे; सृष्टीच्या चराचरात तेच एक आहे, जे बदलत नाही... जे आधीही होतं, आजही आणि नंतरही राहील. तेच शाश्वत आहे. बाकी सगळं बदलत राहते. तो बदलही त्या एकाची अभिव्यक्ती असते. त्यामुळे हल्ली म्हणतात विविधतेमध्ये एकता! पण हिंदू हे जाणतो. त्याला हे समजते की, एकतेची ही विविधता आहे, वैशिष्ट्ये आहेत", असे मोहन भागवत म्हणाले. 

तोच खरा मोठेपणा असतो -सरसंघाचालक भागवत

"हा एकतेचा शृंगार आहे. त्यामुळे आपापल्या वैशिष्ट्यांसोबत श्रद्धेने चालत रहा. सगळ्यांच्या वेगळेपणाचा सन्मान करा. मनुष्याला व्यक्ती म्हणून जगायचं असतं, पण फक्त व्यक्तीच्या नात्याने जगायचं नाही. व्यक्ती कुटुंबासाठी आहे. कुटुंब समाजासाठी आहे. समाज मानवतेसाठी आहे. सर्व जीवन सृष्टीच्या जीवनाशी निगडित आहे. त्यामुळे पर्यावरणासोबत मैत्रही त्या स्वभावात पहिल्यापासूनच आहे. व्यक्ती मोठा की समाज, हा वाद इथे नाहीये. सगळ्यांजवळ आपापली सत्ता आहे, ती सत्ता दुसऱ्यांची सत्ता मोठी करण्यासाठी कामाला आली पाहिजे. आपण मोठे असाल, तर दुसऱ्यांनाही मोठे करा. तोच खरा मोठेपणा आहे", मोहन भागवत म्हणाले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवतHinduहिंदूwest bengalपश्चिम बंगाल