शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानशी मानवतेने व्यवहार करण्यात काय अर्थ- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 11:29 IST

भारताविरोधात सातत्याने दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा सज्जड इशारा दिला आहे.

ठळक मुद्देपाकिस्तानचे वर्तन असेच राहिले. ते दहशतवाद्यांना पाठिंबा देत राहिले. त्यांच्यासोबत मानवतेने व्यवहार करण्यात काय अर्थ आहेसध्या भारत केवळ आपल्या वाट्याचे पाणी रोखत आहे. मात्र  पाकिस्तानचा व्यवहार न सुधारल्यास त्यांना एक थेंबही देणार नाही

नवी दिल्ली - भारताविरोधात सातत्याने दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा सज्जड इशारा दिला आहे. पाकिस्तानचे वर्तन असेच राहिले. ते दहशतवाद्यांना पाठिंबा देत राहिले. त्यांच्यासोबत मानवतेने व्यवहार करण्यात काय अर्थ आहे, असा सवाल नितीन गडकरी यांनी केली आहे. तसेच सध्या भारत केवळ आपल्या वाट्याचे पाणी रोखत आहे. मात्र  पाकिस्तानचा व्यवहार न सुधारल्यास त्यांना एक थेंबही देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.  पाकिस्तानचे पाणी रोखण्याच्या प्रश्नाबाबत गडकरी म्हणाले की, पाकिस्तानचे पाणी रोखण्याचा निर्ण हा केवळ माझ्या खात्याचा नसेल. सरकार, पंतप्रधान यांच्या स्तरावर हा निर्णय होईल. पण मी माझ्या खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या खात्यांना पाकिस्तानमध्ये जाणारे पाणी कुठे कुठे रोखता येईल, याबाबत तांत्रिक आराखडा बनवण्याची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत.'' 

दरम्यान,  पाकिस्तानची सार्वत्रिक कोंडी करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास भारताने तयारी सुरू आहे. आता सिंधू जल करारातून माघार घेण्याच्या दिशेने भारताने पावले उचलली असून, त्यानुसार काश्मीर खोऱ्यातून पाकिस्तानकडे वाहत जाणाऱ्या नद्यांचे पाणी मोठी धरणे बांधून पूर्वेकडे वाहत येणाऱ्या नद्यांमध्ये वळवण्यात येणार आहे. त्याचा फायदा जम्मू काश्मीर आणि पंजाबसह इतर राज्यांना होणार आहे, असे ट्विट नितीन गडकरी यांनी काल केले होते. 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला युद्धखोरीची धमकी दिलेली असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तोंडचे पाणी पळविण्याचा थेट इशाराच देऊन टाकला होता. पुलवामा आत्मघाती हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर गडकरी यांनी केलेले महत्वाचे मानले जात होते. दरम्यान, आज अखेरीस यासंदर्भातील घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासंर्भातील माहिती ट्विटरवरून दिली आहे.

 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरNitin Gadkariनितीन गडकरीPakistanपाकिस्तान