शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

भारताच्या 10 वर्षातील कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं? PM मोदींनी मागितला फीडबॅक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 15:21 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NaMo अॅपद्वारे देशातील नागरिकांना आपली मते नोंदवण्याचे आवाहन केले आहे.

नवी दिल्ली: लवकरच लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळए सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भाजप सत्तेची हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहे, तर भाजपचा विजय रथ रोखण्यासाठी विरोधी पक्षांची इंडिया आघाडी पूर्ण जोर लावत आहे. अशातच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दहा वर्षांच्या कामाबद्दल जनतेकडून फीडबॅक(प्रतिक्रिया) मागवल्या आहेत.

पंतप्रधान मोदींनी भाजप सरकारने गेल्या दहा वर्षांत देशातील विविध क्षेत्रात केलेल्या कामाबाबत जनतेकडून प्रतिक्रिया मागवल्या आहेत. पीएम मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया साइट X (पूर्वी ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी, गेल्या 10 वर्षांत भारताने विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीबद्दल तुम्हाला काय वाटते? असे विचारले आहे.

नमो अॅपवर जन-मन सर्वेक्षणपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमो अॅपवर जन-मन सर्वेक्षण सुरू केले आहे. ज्याद्वारे त्यांना भाजपच्या दहा वर्षांच्या कार्यकाळातील प्रगती जाणून घ्यायची आहे. नमो अॅपवर #JanManSurvey च्या माध्यमातून तुमचा फीडबॅक थेट माझ्याशी शेअर करा, असे पंतप्रधानांनी सोशल मीडियाद्वारे आवाहन केले आहे. 

यापूर्वीही अभिप्राय मागविण्यात आले होतेयाआधीही पीएम मोदींनी भारताच्या विकासाबाबत जनतेकडून त्यांची मते मागवली होती. त्यांनी आपल्या खासदारांच्या कामावरदेखील प्रतिक्रिया मागितल्या होत्या. याशिवाय लोकांना त्यांच्या भागातील सर्वात लोकप्रिय स्थानिक नेत्याबद्दलही सांगण्यास सांगितले होते. 

जनतेची नाडी जाणण्याचा प्रयत्न जन-मन सर्वेक्षणाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जनतेची नाडी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तीन राज्यांतील नेत्रदीपक विजयानंतर भाजपचे मनोबल उंचावलेले आहे. त्यामुळे आता पक्षाला लोकसभा निवडणुकीत कुठलीही चुकी करायची नाही. आता भाजप विजयाची हॅट्रिक मारणार की, इंडिया आघाडी मोदींचा विजयरथ रोखणार, हे येत्या काही दिवसात कळेल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारlok sabhaलोकसभा