शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
5
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
6
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
7
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
8
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
9
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
10
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
11
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
12
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
13
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
14
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
15
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
16
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
17
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
18
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
19
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
20
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

चार वर्षांनंतर काय? अग्निवीरांसाठी राज्य सरकारांकडून धडाधड घोषणा, ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 16:28 IST

Agnipath Scheme: चार वर्षांच्या नोकरीनंतर पुढे काय? 10 वी, १२ वी झालेल्या तरुणांना पुढे कोण उभे करणार, यावरून नाराजी पसरली होती. 

केंद्र सरकारने अग्निपथ स्कीमची घोषणा केली आणि सैन्यात नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्यांच्या मनात हजारो शंका आल्या. बिहार, युपीमध्ये तर तरुणांनी रेल्वेवर दगडफेक केली, गाड्या अडविल्या. हा सारा गोंधळ एकाच प्रश्नावरून होता, चार वर्षांच्या नोकरीनंतर पुढे काय? 10 वी, १२ वी झालेल्या तरुणांना पुढे कोण उभे करणार, यावरून नाराजी पसरली होती. 

मोदींच्या अग्निपथ योजनेवरून वातावरण तापले; तरुणांकडून दगडफेक, रेल्वे रोखल्यायावर आता लगेचच राज्यांनी धडाधड घोषणा, ऑफर देण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने सैन्यातून चार वर्षांनी सेवा संपणाऱ्या ७५ टक्के अग्निवीरांना केंद्रीय सशस्त्र पोलीस दले आणि आसाम रायफल्समध्ये भरतीवेळी प्राधान्य देण्याची घोषणा केली आहे. याचबरोबर राज्यांनी देखील वेगवेगळ्या घोषणा केल्या आहेत. 

उत्तर प्रदेश सरकार पोलिस आणि संबंधित सेवांमध्ये भरतीसाठी 'अग्निवीरांना' प्राधान्य देईल, अशी घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी केली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील यानंतर लगेचच अग्निवीरांना मध्य प्रदेश पोलिसांच्या भरतीमध्ये प्राधान्य देणार असल्याचे जाहीर केले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी देखील राज्य पोलिस भरतीमध्ये या उमेदवारांना प्राधान्य देण्याचे जाहीर केले आहे. हरियाणा सरकारनेही अग्निवीरांना नोकरीत प्राधान्य देण्याची घोषणा केली आहे.

दगडफेक, रेलरोकोबिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये केंद्राच्या या योजनेविरोधात वातावरण तापले आहे. या योजनेविरोधात संतप्त झालेल्या तरुणांनी बिहारच्या बक्सरमध्ये ट्रेनवर दगडफेक केली आहे. तर मुजफ्फरपुरमध्ये देखील तरुण रस्त्यावर उतरले आहेत. अनेक ठिकाणी या उमेदवारांनी चक्काजाम केले आहे.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानUttar Pradeshउत्तर प्रदेशMadhya Pradeshमध्य प्रदेश