शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 17:51 IST

मणिपूरमधील हिंसाचारात ६ जणांचा मृत्यू झाला.

गेल्या काही दिवसापासून मणिपूरमध्ये मोठा हिंसाचार सुरू झाला आहे. कुकी उग्रवाद्यांनी सहा जणांची हत्या केली होती. मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी या प्रकरणी दु:ख व्यक्त केले असून या  गुन्ह्यासाठी जबाबदार असलेल्यांना लवकरच न्यायाच्या कठड्यात आणले जाईल, असे सांगितले.

हिंसाचारावर बोलताना बिरेन सिंह म्हणाले की, गेल्या आठवड्यात जिरीबाम जिल्ह्यातील एका नदीतून ज्यांचे मृतदेह सापडले होते, त्या तीन महिला आणि मुलांच्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी महिला आणि मुलांची हत्या हा मानवतेविरुद्धचा गुन्हा असल्याचे सांगितले.

पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू

मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली. या पोस्टमध्ये म्हटले की, कुकी दहशतवाद्यांनी जिरीबाममध्ये तीन निष्पाप मुलांची आणि ओलिस ठेवलेल्या तीन महिलांच्या भीषण हत्येचा निषेध करतो. असंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

मुख्यमंत्री बिरेन सिंह म्हणाले,"कोणत्याही सुसंस्कृत समाजात अशा रानटी कृत्यांना जागा नाही. मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की या दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे आणि त्यांना लवकरच न्याय मिळवून दिला जाईल. तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही." त्यांच्या अमानुष कृत्यांसाठी जबाबदार धरले जाते."

मणिपूरमध्ये जवळपास १८ महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे, जातीय संघर्ष कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर, केंद्राने गेल्या आठवड्यात सहा भागात AFSPA पुन्हा लागू केला, जिथून तो एका वर्षापूर्वी उठवला गेला होता, त्यामुळे इम्फाळ खोऱ्यात निषेधाची एक नवीन लाट निर्माण झाली.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार