शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 17:51 IST

मणिपूरमधील हिंसाचारात ६ जणांचा मृत्यू झाला.

गेल्या काही दिवसापासून मणिपूरमध्ये मोठा हिंसाचार सुरू झाला आहे. कुकी उग्रवाद्यांनी सहा जणांची हत्या केली होती. मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी या प्रकरणी दु:ख व्यक्त केले असून या  गुन्ह्यासाठी जबाबदार असलेल्यांना लवकरच न्यायाच्या कठड्यात आणले जाईल, असे सांगितले.

हिंसाचारावर बोलताना बिरेन सिंह म्हणाले की, गेल्या आठवड्यात जिरीबाम जिल्ह्यातील एका नदीतून ज्यांचे मृतदेह सापडले होते, त्या तीन महिला आणि मुलांच्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी महिला आणि मुलांची हत्या हा मानवतेविरुद्धचा गुन्हा असल्याचे सांगितले.

पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू

मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली. या पोस्टमध्ये म्हटले की, कुकी दहशतवाद्यांनी जिरीबाममध्ये तीन निष्पाप मुलांची आणि ओलिस ठेवलेल्या तीन महिलांच्या भीषण हत्येचा निषेध करतो. असंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

मुख्यमंत्री बिरेन सिंह म्हणाले,"कोणत्याही सुसंस्कृत समाजात अशा रानटी कृत्यांना जागा नाही. मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की या दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे आणि त्यांना लवकरच न्याय मिळवून दिला जाईल. तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही." त्यांच्या अमानुष कृत्यांसाठी जबाबदार धरले जाते."

मणिपूरमध्ये जवळपास १८ महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे, जातीय संघर्ष कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर, केंद्राने गेल्या आठवड्यात सहा भागात AFSPA पुन्हा लागू केला, जिथून तो एका वर्षापूर्वी उठवला गेला होता, त्यामुळे इम्फाळ खोऱ्यात निषेधाची एक नवीन लाट निर्माण झाली.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार