शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
7
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
8
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
9
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
10
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
11
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
12
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
13
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
14
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
15
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
16
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
17
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
18
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
19
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
20
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!

"कृषीमंत्र्यांनी जे लेखी वचन दिलं होतं, त्याचं काय?"; उपराष्ट्रपती धनकड यांनी सरकारचे पिळले कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 10:40 IST

विविध मागण्यांसाठी शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला असून, यावर उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी चिंता व्यक्त केली आहे. धनकड यांनी सरकारला धारेवर धरत काही सवाल केले आहेत. 

Jagdeep Dhankhar News: "आता शेतकऱ्यांचं एकच काम राहिले आहे. त्याला मर्यादित करून टाकलं आहे. एकतर शेतात धान्य पिकवा आणि त्याला योग्य दर मिळवण्यासाठी सोसत रहा. आपण फॉर्म्युल्याची अंमलबजावणी का करत नाही, हे मला कळत नाहीये", असे म्हणत उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी मोदी सरकार आणि कृषी मंत्र्यांचे कान पिळले. 

मोबदला सोडा, थकीत पैसैही दिले जात नाहीये -धनकड

एका कार्यक्रमात बोलताना जगदीप धनकड म्हणाले, "अर्थशास्त्रज्ञ, थिंक टँकसोबत फॉर्म्युला अंमलबजावणीबद्दल चर्चा का करत नाही. आपण शेतकऱ्यांना चांगला मोबदला दिला पाहिजे. पण, आम्ही तर चांगला मोबदला सोडा, त्याचे थकीत पैसेही देत नाहीये. त्यातही कंजूषपणा करत आहोत. ज्याची तरतूद केली गेली आहे. आणि मला समजत नाहीये की, शेतकऱ्यांशी चर्चा का केली जात नाहीये", अशा शब्दात धनकड यांनी सरकारला खडेबोल सुनावले.

 उपराष्ट्रपती धनकड म्हणाले, "समजून चला की तुम्ही रस्ता भरकटला आहात. आपण त्या रस्त्यावर गेला आहात, जो खतरनाक आहे आणि माझं म्हणणं आहे की, याचं समाधान करण्याचा उपाय पंतप्रधानांनी सांगितला आहे की, चर्चा झाली पाहिजे." 

"मला खूप चांगलं वाटलं की, जगजीत सिंह यांनी जाहीरपणे माहिती घेतली की मी काय म्हणालो? त्यानंतर त्यांनी तीन गोष्टी सांगितल्या की, शेतकऱ्याला हमीभाव देणारा कायदा पाहिजे. उदार मनाने बघा. उदार मनाने विचार करा", अशा शब्दात धनकड यांनी सरकारचे कान टोचले. 

लेखी वचनाचे काय झालं, उपराष्ट्रपतींचा कृषीमंत्र्यांना सवाल

"समजून घ्या. देण्याचे काय फायदे आणि न देण्याचे काय नुकसान आहे. तुम्हाला कळेल यात नुकसानच नुकसान आहे. दुसरं म्हणजे कृषी मंत्र्यांनी जे लेखी वचन दिलं होतं, त्याचं काय?", असा सवाल करत उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोंडीत पकडलं.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनCentral Governmentकेंद्र सरकारFarmerशेतकरीshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानNarendra Modiनरेंद्र मोदी