शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

"कृषीमंत्र्यांनी जे लेखी वचन दिलं होतं, त्याचं काय?"; उपराष्ट्रपती धनकड यांनी सरकारचे पिळले कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 10:40 IST

विविध मागण्यांसाठी शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला असून, यावर उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी चिंता व्यक्त केली आहे. धनकड यांनी सरकारला धारेवर धरत काही सवाल केले आहेत. 

Jagdeep Dhankhar News: "आता शेतकऱ्यांचं एकच काम राहिले आहे. त्याला मर्यादित करून टाकलं आहे. एकतर शेतात धान्य पिकवा आणि त्याला योग्य दर मिळवण्यासाठी सोसत रहा. आपण फॉर्म्युल्याची अंमलबजावणी का करत नाही, हे मला कळत नाहीये", असे म्हणत उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी मोदी सरकार आणि कृषी मंत्र्यांचे कान पिळले. 

मोबदला सोडा, थकीत पैसैही दिले जात नाहीये -धनकड

एका कार्यक्रमात बोलताना जगदीप धनकड म्हणाले, "अर्थशास्त्रज्ञ, थिंक टँकसोबत फॉर्म्युला अंमलबजावणीबद्दल चर्चा का करत नाही. आपण शेतकऱ्यांना चांगला मोबदला दिला पाहिजे. पण, आम्ही तर चांगला मोबदला सोडा, त्याचे थकीत पैसेही देत नाहीये. त्यातही कंजूषपणा करत आहोत. ज्याची तरतूद केली गेली आहे. आणि मला समजत नाहीये की, शेतकऱ्यांशी चर्चा का केली जात नाहीये", अशा शब्दात धनकड यांनी सरकारला खडेबोल सुनावले.

 उपराष्ट्रपती धनकड म्हणाले, "समजून चला की तुम्ही रस्ता भरकटला आहात. आपण त्या रस्त्यावर गेला आहात, जो खतरनाक आहे आणि माझं म्हणणं आहे की, याचं समाधान करण्याचा उपाय पंतप्रधानांनी सांगितला आहे की, चर्चा झाली पाहिजे." 

"मला खूप चांगलं वाटलं की, जगजीत सिंह यांनी जाहीरपणे माहिती घेतली की मी काय म्हणालो? त्यानंतर त्यांनी तीन गोष्टी सांगितल्या की, शेतकऱ्याला हमीभाव देणारा कायदा पाहिजे. उदार मनाने बघा. उदार मनाने विचार करा", अशा शब्दात धनकड यांनी सरकारचे कान टोचले. 

लेखी वचनाचे काय झालं, उपराष्ट्रपतींचा कृषीमंत्र्यांना सवाल

"समजून घ्या. देण्याचे काय फायदे आणि न देण्याचे काय नुकसान आहे. तुम्हाला कळेल यात नुकसानच नुकसान आहे. दुसरं म्हणजे कृषी मंत्र्यांनी जे लेखी वचन दिलं होतं, त्याचं काय?", असा सवाल करत उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोंडीत पकडलं.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनCentral Governmentकेंद्र सरकारFarmerशेतकरीshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानNarendra Modiनरेंद्र मोदी