शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

लग्नसोहळ्यावर कारवाई केलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना का मागावी लागली माफी?; उच्चस्तरीय चौकशीही सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 23:29 IST

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या वागणुकीवर संताप व्यक्त केला

ठळक मुद्देबंगळुरूहून नवरदेव लग्नासाठी त्रिपुरा येथे आला होता. याठिकाणी प्रसिद्ध डॉक्टरच्या मुलीसोबत त्याचे लग्न होते. रात्री लग्नाचे विधी सुरू असताना अचानक जिल्हाधिकारी शैलेश कुमार यादव पोलिसांच्या गराड्यात मॅरेज हॉलला पोहचले तिथे गोंधळ झाला.शैलेश यांनी नवरदेवाला धक्के मारून बाहेर काढलं. या प्रकरणी आपत्ती प्रतिबंधात्मक अधिनियमांच्या अंतर्गत अनेकांवर गुन्हे दाखल केले

अगरताळा – देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यात बहुतांश राज्यात नाईट कर्फ्यूही लावण्यात आला आहे. यात गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ जिल्हाधिकारी एक लग्न समारंभात जाऊन तेथील सर्व मंडळींवर गुन्हा दाखल करून अनेकांची खरडपट्टी काढताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या वागणुकीवर संताप व्यक्त केला. याबाबत ५ आमदारांनी मुख्य सचिवांना पत्र लिहून जिल्हाधिकारी शैलेश यादव यांच्या निलंबनाची मागणी केली होती. त्यानंतर आयएएस शैलेश यादव यांच्या प्रकरणात उच्च स्तरीय चौकशी होऊन त्यानंतर पुढील कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले. याबाबत शैलेश यादव म्हणाले की, मी जे काही केले लोकांच्या हितासाठीच केले. माझा हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा कोणाचाही अपमान करण्याचा नव्हता. कोविड मार्गदर्शक सूचनेचं पालन करणं माझं कर्तव्य होतं. मी उच्चस्तरीय समितीच्या चौकशीसमोर माझं म्हणणं मांडेन असं सांगितले आहे.

लग्नासाठी बंगळुरूहून आला होता नवरदेव

बंगळुरूहून नवरदेव लग्नासाठी त्रिपुरा येथे आला होता. याठिकाणी प्रसिद्ध डॉक्टरच्या मुलीसोबत त्याचे लग्न होते. मुलीच्या घरच्यांकडून जिल्हा प्रशासन ते मॅरेज हॉलपर्यंत सर्वांची परवानगी घेतली होती. रात्री लग्नाचे विधी सुरू असताना अचानक जिल्हाधिकारी शैलेश कुमार यादव पोलिसांच्या गराड्यात मॅरेज हॉलला पोहचले तिथे गोंधळ झाला. जिल्हाधिकाऱ्यांनी पंडितच्या कानशिलात लगावली. नवरदेव आणि पाहुणे मंडळींना धक्का मारून बाहेर काढलं होतं. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांच्या कृत्याचा निषेध केला होता.

काय होतं प्रकरण?

व्हायरल व्हिडीओमध्ये शैलेश कुमार एका हॉलमध्ये जाऊन लग्न सोहळा थांबवताना दिसत आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांनी उपस्थितांना कठोर शब्दांत सुनावलं. यावेळी त्यांनी वापरलेल्या भाषेवर आता टीका होऊ लागली आहे. शैलेश यांनी नवरदेवाला धक्के मारून बाहेर काढलं. या प्रकरणी आपत्ती प्रतिबंधात्मक अधिनियमांच्या अंतर्गत अनेकांवर गुन्हे दाखल केले. त्यांनी ३० जणांना अटक केली. मात्र थोड्याच वेळात त्यांची सुटका झाली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या